शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

जीएसटी नव्हे, हा तर ‘बीजेपी टॅक्स’- चिदंबरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 1:18 AM

लोकशाहीत लोकांनी, लोकांसाठी लोकांकडून राज्य चालविणे अपेक्षित असते. पण सध्या लोकशाही पाहायला मिळते का? खाण्यापासून जगण्यावर अनेक बंधने लादली जात आहेत. त्याला लोकशाही म्हणायचे का?

ठाणे : लोकशाहीत लोकांनी, लोकांसाठी लोकांकडून राज्य चालविणे अपेक्षित असते. पण सध्या लोकशाही पाहायला मिळते का? खाण्यापासून जगण्यावर अनेक बंधने लादली जात आहेत. त्याला लोकशाही म्हणायचे का? जीएसटी या करप्रणालीची मूळ कल्पना काँग्रेसची होती. तिला आधी भाजपाने तीव्र विरोध केला. पण आता तो ज्या अवस्थेत अंमलात आणला गेला, तो जीएसटी नव्हे तर गब्बरसिंग आणि बीजेपी टॅक्स असल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी रविवारी ठाण्यात केली.प्रदेश काँग्रेस समितीने डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील सभागृहात ‘डिव्हिसिव्ह पॉलिटिक्स, स्टॅगनन्ट इकॉनॉमी’ या विषयावर परिषद घेतली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि खासदार कुमार केतकर यांनीही विचार मांडले.चिदंबरम म्हणाले, केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना २००६ मध्ये काँग्रेसने जीएसटी करप्रणाली आणण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु, भाजपाने सतत आठ वर्षे त्यास तीव्र विरोध केला. त्या करप्रणालीमध्ये रिफंड मिळणार होता. पण भाजपाच्या जीएसटीमध्ये रिफंड मिळण्याची काहीच योजना नाही. व्हॅट, प्राप्तिकर, अबकारी कर या सर्व कर प्रणालीत रिफंड दिला जातो. पण जीएसटीत असे काहीच नाही. जीएसटी -१, जीएसटी -२ आणि जीएसटी -३ अशा तीन प्रकारांमध्ये हा टॅक्स होता. जून २०१८ उजाडला तरी उर्वरित दोन जीएसटींची काहीच अंमलबजावणी झालेली नाही. त्यातील ३-ब हे कलम तर पूर्णपणे बेकायदा असल्याचा दावा त्यांनी केला.विकासदरही ८.५ वरुन ६.३ वर आला आहे. नोटाबंदीने अनेक लघुउद्योग देशोधडीला लागले. नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेत केवळ ०.२ टक्के इतक्या बनावट नोटा जमा झाल्या. तीन दहशतवादी मारले गेले. त्यांच्याकडेही दोन हजारांच्या बनावट नोटा मिळाल्या, असे चिदंबरम म्हणाले. आगामी काळात बदल होणे अपरिहार्य असून एक महान राष्टÑ घडविण्याचे आवाहन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागलीदेशात १४ हजार शेतकºयांना या व्यवस्थेने आत्महत्या करायला लावली, असा ठपका खा. चव्हाण यांनी ठेवला. सुडाने वागल्याने जनता पक्षाचे सरकार बुडाले, तशीच वेळ मोदी सरकारवर येईल आणि पुढील निवडणुकीत भाजपाला १५० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत, असा दावा केतकर यांनी केला.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम