शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

'अहिंसा, शांततामय आंदोलनाचा मार्ग कदापि सोडणार नाही'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:28 AM

भिवंडी, मुंब्य्रातील आंदोलकांची ग्वाही; दंगे घडवल्याची भावना

- नितीन पंडित/ कुमार बडदे भिवंडी/मुंब्रा : तीन दिवसांमध्ये दिल्लीत घडलेल्या घटनांमुळे अस्वस्थता आहे. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याबाबत हुरहुर आहे. मात्र, येथील आंदोलनातील शांतता ढळू द्यायची नाही आणि कुणी कितीही चिथावणी दिली तरी तोल ढळू द्यायचा नाही, यावर भिवंडीतील मिल्लतनगर आणि मुंब्रा येथील अग्निशमन केंद्रापाशी आंदोलनास बसलेल्या आंदोलकांचा निर्धार पक्का आहे.मुंब्य्रातील आंदोलनस्थळी दिल्लीतील हिंसाचाराच्या बातम्या पोहोचल्यावर दिल्ली पोलीस तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या असल्या, तरी आंदोलन अहिंसेच्याच मार्गाने सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलक महिलांनी व्यक्त केला. दोन महिन्यांपासून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागायला नको होते, असे मत आंदोलक महिलांनी व्यक्त केले. दिल्लीतील शाहीनबागच्या धर्तीवर मुंब्रा येथे ३९ दिवसांपासून एनआरसी, सीएए, एनपीआरविरोधात महिलांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील प्रमुख वक्त्यांपैकी एक रेहाना शेख म्हणाल्या की, दिल्लीत आंदोलनाला हिंसक वळण लागणार याची कुणकुण लागली होती. दिल्लीतील घटनांमुळे येथील आंदोलक विचलित झाले नसून, या घटना कोणी घडवून आणल्या, याची माहिती सर्वांना आहे, असे शेख म्हणाल्या. क्रि येवर प्रतिक्रि या व्यक्त न करता सत्य आणि अहिंसेच्या मार्गानेच उत्तर देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंब्रा येथे सर्वधर्मीय नागरिक एकोप्याने राहतात. अनेक कठीण प्रसंगांमध्ये एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतात. यापुढेही आम्ही सारे असेच एकोप्याने राहू, अशी ग्वाही आंदोलनात काही दिवस सहभागी झालेल्या संगीता पालेकर यांनी दिली.मुंब्य्रातील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी ‘लोकमत’ला दिली.संवेदनशील भिवंडी शहरात २७ दिवस सुरू असलेल्या आंदोलनात एकात्मतेची प्रचीती आली व दिल्लीतील घटनांनंतरही ते चित्र बदलणार नाही, अशी ग्वाही आंदोलक व अन्य नागरिकांनी दिली. सीएएच्या विरोधात भिवंडीत अनेक आंदोलने झाली. मात्र, शांततामय वातावरण कायम राहिले.भिवंडीसारख्या संवेदनशील शहरात हे आंदोलन इतक्या दीर्घकाळ शांततेत सुरू राहण्यामागे पोलिसांचा वाढत जनसंपर्क आणि पोलीस प्रशासनाने केलेले नियोजन हेच कारण असल्याचे दोन्हीकडील लोकांचे म्हणणे आहे. भिवंडीत १९८४ च्या दंगलीनंतर जी शांतता आहे, ती आजपर्यंत कायम आहे.दिल्लीतील आंदोलनाने हिंसक वळण घेतले असले, तरी भिवंडीत तशी परिस्थिती आम्ही येऊ देणार नाही. जर कुणी भडकावू प्रतिक्रि या देत असेल, तर अशांवर पोलिसांनी थेट कारवाई केली तरी हरकत नाही. शहरातील शांतता, अखंडता अबाधित राहिली पाहिजे, अशी प्रतिक्रि या इम्रानअली सय्यद यांनी दिली.आंदोलनामुळे सर्व समाजांतील नागरिकांमध्ये सध्या बंधुभावाचे नाते निर्माण झाले आहे. भिवंडीतील सर्व जाती-धर्मांचे लोक एकमेकांचा आदर करीत असून शहरात अखंड शांतता नांदेल, असे मत किरण चन्ने यांनी व्यक्त केले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकdelhi violenceदिल्ली