शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आवाज कमी डीजे तुझा...  गोंगाट होता, पण डीजेचा नव्हे; तर ढोलताशांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:36 IST

यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषण २५ टक्क्यांनी कमी झाले असल्याचे निरीक्षण डॉ. महेश बेडेकर यांनी नोंदवले. विसर्जन मिरवणुकीत गोंगाट होता, पण डीजेचा नव्हे तर ढोलताशांचा होता.

ठाणे : यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषण २५ टक्क्यांनी कमी झाले असल्याचे निरीक्षण डॉ. महेश बेडेकर यांनी नोंदवले. विसर्जन मिरवणुकीत गोंगाट होता, पण डीजेचा नव्हे तर ढोलताशांचा होता. यंदा डीजेचे प्रमाण बरेच कमी झाल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.डॉ. बेडेकर म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी शांतता असावी, याकरिता कोर्टाचे आदेश आहेत. रुग्णालयात स्वच्छता, उपचाराबरोबर शांतता पण असायला हवी. शाळेत विद्यार्थ्यांना शांततेत शिक्षण घेता यायला हवे. पण, दुर्दैवाने आतापर्यंत हा विचार केला जात नव्हता. म्हणूनच, कोर्टाने शांतता क्षेत्रे निश्चित केली. धार्मिकस्थळी आपण गोंगाट करायला जात नाही. शांतचित्ताने दर्शन मिळावे, हाच हेतू असतो. धार्मिक स्थळे, कोर्ट, शाळा आणि रुग्णालये या चारही ठिकाणी शांतता लागते. परंतु, दुर्दैवाने तो विचार आतापर्यंत झाला नाही. म्हणून, कायदे करावे लागले. आपली शहरे नियोजनबद्ध नाहीत. कुठेही शाळा, रुग्णालये आहेत. आमचे म्हणणे इतकेच आहे की, मिरवणुकीत धार्मिकतेच्या नावाखाली ज्या पद्धतीची गाणी वाजवली जातात व रुग्ण, विद्यार्थी यांना त्रास होतो, ते चुकीचे आहे. चुकीच्या प्रथा मिरवणुकीत शिरल्या आहेत. त्याच्यात बदल व्हावे, ही माफक अपेक्षा आहे. मिरवणुकीतील गोंगाटाचे समर्थन करताना धर्माचा आधार घेणे चुकीचे आहे. शांततेत मिरवणुका काढा. यंदाच्या मिरवणुकीत दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवल्या, त्या म्हणजे २५ टक्क्यांनी ध्वनिप्रदूषण कमी झाले. ढोलताशाचा भर ध्वनिप्रदूषणात पडला असला तरी डीजेचे प्रमाण मात्र कमी झाले होते. यापूर्वी मिरवणुकीत ६० ते ७० टक्के ध्वनिप्रदूषण डीजेमुळे होत असे. यावेळी ६० ते ७० टक्के ध्वनिप्रदूषण ढोलताशामुळे होते आणि २० ते ३० टक्के डीजेमुळे झाले. डीजेचे प्रमाण कमी झाले, हे मात्र निश्चित.ढोलताशा, बेंजो यांची भर यंदा ध्वनिप्रदूषणात पडली. अगोदर डीजेवर वाटेल त्या गाण्यांवर नाचायचे प्रमाण यंदा नक्कीच कमी झाले. फटाके फोडण्याचे प्रमाण मात्र कमी नव्हते. प्रामुख्याने जाणवले ते म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी-कार्यकर्ते वाहतूक व्यवस्थेचे नियोजित करत होते. वाहतुकीचे नियोजन यावेळी दिसून आले. एक दोन नव्हे तर १० ढोल वाजवले जात होते. त्यामुळे तक्रारी करण्याचे प्रमाणही वाढले.लोकांचे मला खूप फोन आले. लोकांमध्ये जागरूकता वाढली आणि जागरूकता वाढवणे, हाच आमचा हेतू आहे, तो साध्य झाला. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले होते की, डेसिबल पातळी मर्यादित ठेवा, पण लोकांनी ते ऐकले नाही. पोलीसही ही मर्यादा पाळा, असे सांगताना दिसले नाही. पोलिसांनी सांगितले असते, तर लोकांनी ऐकले असते, असे डॉ. बेडेकर म्हणाले.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन