शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

आवाज कमी डीजे तुझा...  गोंगाट होता, पण डीजेचा नव्हे; तर ढोलताशांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:36 IST

यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषण २५ टक्क्यांनी कमी झाले असल्याचे निरीक्षण डॉ. महेश बेडेकर यांनी नोंदवले. विसर्जन मिरवणुकीत गोंगाट होता, पण डीजेचा नव्हे तर ढोलताशांचा होता.

ठाणे : यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषण २५ टक्क्यांनी कमी झाले असल्याचे निरीक्षण डॉ. महेश बेडेकर यांनी नोंदवले. विसर्जन मिरवणुकीत गोंगाट होता, पण डीजेचा नव्हे तर ढोलताशांचा होता. यंदा डीजेचे प्रमाण बरेच कमी झाल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.डॉ. बेडेकर म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी शांतता असावी, याकरिता कोर्टाचे आदेश आहेत. रुग्णालयात स्वच्छता, उपचाराबरोबर शांतता पण असायला हवी. शाळेत विद्यार्थ्यांना शांततेत शिक्षण घेता यायला हवे. पण, दुर्दैवाने आतापर्यंत हा विचार केला जात नव्हता. म्हणूनच, कोर्टाने शांतता क्षेत्रे निश्चित केली. धार्मिकस्थळी आपण गोंगाट करायला जात नाही. शांतचित्ताने दर्शन मिळावे, हाच हेतू असतो. धार्मिक स्थळे, कोर्ट, शाळा आणि रुग्णालये या चारही ठिकाणी शांतता लागते. परंतु, दुर्दैवाने तो विचार आतापर्यंत झाला नाही. म्हणून, कायदे करावे लागले. आपली शहरे नियोजनबद्ध नाहीत. कुठेही शाळा, रुग्णालये आहेत. आमचे म्हणणे इतकेच आहे की, मिरवणुकीत धार्मिकतेच्या नावाखाली ज्या पद्धतीची गाणी वाजवली जातात व रुग्ण, विद्यार्थी यांना त्रास होतो, ते चुकीचे आहे. चुकीच्या प्रथा मिरवणुकीत शिरल्या आहेत. त्याच्यात बदल व्हावे, ही माफक अपेक्षा आहे. मिरवणुकीतील गोंगाटाचे समर्थन करताना धर्माचा आधार घेणे चुकीचे आहे. शांततेत मिरवणुका काढा. यंदाच्या मिरवणुकीत दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवल्या, त्या म्हणजे २५ टक्क्यांनी ध्वनिप्रदूषण कमी झाले. ढोलताशाचा भर ध्वनिप्रदूषणात पडला असला तरी डीजेचे प्रमाण मात्र कमी झाले होते. यापूर्वी मिरवणुकीत ६० ते ७० टक्के ध्वनिप्रदूषण डीजेमुळे होत असे. यावेळी ६० ते ७० टक्के ध्वनिप्रदूषण ढोलताशामुळे होते आणि २० ते ३० टक्के डीजेमुळे झाले. डीजेचे प्रमाण कमी झाले, हे मात्र निश्चित.ढोलताशा, बेंजो यांची भर यंदा ध्वनिप्रदूषणात पडली. अगोदर डीजेवर वाटेल त्या गाण्यांवर नाचायचे प्रमाण यंदा नक्कीच कमी झाले. फटाके फोडण्याचे प्रमाण मात्र कमी नव्हते. प्रामुख्याने जाणवले ते म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी-कार्यकर्ते वाहतूक व्यवस्थेचे नियोजित करत होते. वाहतुकीचे नियोजन यावेळी दिसून आले. एक दोन नव्हे तर १० ढोल वाजवले जात होते. त्यामुळे तक्रारी करण्याचे प्रमाणही वाढले.लोकांचे मला खूप फोन आले. लोकांमध्ये जागरूकता वाढली आणि जागरूकता वाढवणे, हाच आमचा हेतू आहे, तो साध्य झाला. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले होते की, डेसिबल पातळी मर्यादित ठेवा, पण लोकांनी ते ऐकले नाही. पोलीसही ही मर्यादा पाळा, असे सांगताना दिसले नाही. पोलिसांनी सांगितले असते, तर लोकांनी ऐकले असते, असे डॉ. बेडेकर म्हणाले.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन