शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांना ना पाणी, ना खुर्च्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 00:28 IST

लसीकरण केंद्रांवर तिसऱ्या दिवशीही गोंधळ कायम : वयोवृद्धांच्या नशिबी गैरसोय कायम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : लसीकरणाच्या तिसऱ्या  दिवशीही पालिकेच्या अनेक केंद्रांवर गोंधळ दिसून आला. पोस्ट कोविड सेंटर, बाळकुम येथील कोविड सेंटर, मनोरमानगर, दादोजी कोंडदेव स्टेडिअमजवळील केंद्रासह इतर केंद्रांवर ज्येष्ठांना बसण्यासाठी खुर्च्या नसणे, वारंवार सर्व्हर डाउन होणे, पिण्यास पाणी उपलब्ध नसणे, असा सावळागोंधळ होता. त्यामुळे सलग तिसऱ्या  दिवशी लसीकरणाकरिता आलेल्या ज्येष्ठांना त्रासाला सामोरे जावे लागले.ठाणे  महापालिका हद्दीत खाजगी रुग्णालयांच्या ठिकाणी अद्यापही लसीकरण सुरू झालेले नाही. मात्र, महापालिकेने शहरातील १५ केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी या केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. मात्र, मंगळवारी दुसऱ्या दिवशी या केंद्रांवर सुमारे एक हजारांच्या आसपास ज्येष्ठांचे लसीकरण झाले. तिसऱ्या दिवशीदेखील अनेक केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसह दुसरा डोस घेणाऱ्यांनी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे गोंधळ उडाला होता. पोस्ट कोविड सेंटर येथे वेळेआधीच ज्येष्ठांनी रांग लावली होती. त्यांना बसण्यासाठी खुर्च्या नव्हत्या. त्यामुळे ते ताटकळल्याचे दिसून आले. अर्ध्या तासानंतर ज्येष्ठांना बसण्यासाठी खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या. सर्व्हर वरचेवर डाउन झाल्याचे दिसून आले. अशीच परिस्थिती दादोजी कोंडदेव येथील केंद्रावर होती. तेथेही ज्येष्ठांना नाना समस्यांना सामोरे जावे लागले. बसण्यासाठी खुर्च्या नसणे, उन्हाच्या झळांचा त्रास सुरू झालेला असताना पिण्यास स्वच्छ पाणी नसणे, या समस्यांमुळे ज्येष्ठांनी तीव्र नाराजी प्रकट केली. या संदर्भात जगदीश खैरालिया यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधून तक्रार केल्यावर खुर्च्या आणि पाण्याची व्यवस्था केली गेली. मनोरमानगर केंद्रावर सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत सर्व्हर डाउन असल्याने सकाळपासून आलेल्या ज्येष्ठांना मनस्ताप सहन करावा लागला. ॲप वारंवार डाउन होत असल्याने आपला नंबर केव्हा लागणार, अशी विचारणा ज्येष्ठ नागरिकांकडून केली जात होती.

नव्या वर्षात सापडले सर्वाधिक ८१८ रुग्णलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे नव्या वर्षातील सर्वाधिक ८१८ रुग्ण  आढळले.  यामुळे जिल्ह्यात आता २ लाख ६७ हजार ९१० रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात सहा जण दगावल्याने मृतांची संख्या ६ हजार २८६ झाली आहे.   ठाणे शहर परिसरात २३५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ६२ हजार ८८८ झाली. शहरात एकाच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूंची संख्या १ हजार ३९० वर गेली. कल्याण-डोंबिवलीत २४२ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत १५३ रुग्णांची वाढ झाली असून मृत्यूसंख्या दोन आहे. उल्हासनगरमध्ये २४ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू झाला नाही. भिवंडीत दोन बाधित असून एकही मृत्यूची नोंद नाही.  मीरा-भाईंदरमध्ये ६९ रुग्ण आढळले. अंबरनाथमध्ये २२ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. बदलापूरमध्ये ३९ रुग्णांची नोंद झाली असून एकाही मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये ३२ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू झाले आहेत.