शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘शहापूरमधील एकही ग्रामस्थ पाण्यावाचून राहू नये’; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासनाला कानपिचक्या

By सुरेश लोखंडे | Updated: April 1, 2024 16:09 IST

शहापूर पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेऊन प्रशासनाची कानउघडणी केली

सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: जिल्ह्यातील शहापूर तालुका तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहे. या टंचाईग्रस्त गांवपाड्यांचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी रविवारी प्रत्यक्ष शहापूरला खास भेट देऊन प्रशासनाची झाडाझडती घेतली. तालुक्यातील एकही ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यावाचून वंचित राहू नये,अशी दक्षता घेण्यासाठी त्यांनी प्रशासनाला तंबी देऊन चांगलेच धारेवर धरले.

'शहापूर तालुक्यातील २५ गांवपाडे तहानलेली' या मथळ्याखाली लोकमतने ३० मार्च रोजी प्रसिद्ध करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकार्यांनी रविवारी शहापूरचा ग्रामीण, दुर्गम भाग गाठला आणि पाणी टंचाईग्रस्त गांवपाड्यांची पहाणी केली. दरम्यान त्यांनी शहापूर पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेऊन प्रशासनाची कान उघडणी केली. यावेळी टँकर ग्रस्त ९१ गाव पाड्याची माहिती उघकीस आली. या समस्यांवर त्वरित उपाययोजना करा, अशा सुचना ही त्यांनी यावेळी दिल्या. ग्रामस्थांच्या जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. त्यामुळे कोणताही ग्रामस्थ पाण्यावाचून राहता नये. ज्या गावात पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई आढळून येण्याची शक्यता आहे, त्या गाव पाड्यासाठी पंधरा दिवस आधी प्रस्ताव सादर करा आणि एक दिवस आधीच टॅंकरने पाणी पुरवठा करा,असेही त्यांना यावेळी आदेश दिले.

शहापूर पंचायत समिती सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे, उपविभागीय अधिकारी भिवंडी अमित सानप, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ ठाणे तन्मय कांबळे, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी, शहापूर गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, उप अभियंता विकास जाधव, स्वच्छ भारत मिशनचे एबीडीओ पंडित राठोड आदींसह ग्रामस्थ माेठ्यासंख्येने उपस्थित हाेते. गावातील लोकसंख्या, गावातील हातपंप संख्या, विहीरीची संख्या आणि पाण्याच्या इतर पर्याय तपासून पुढील पंधरा दिवसांत शहापूर तालुक्यातील पाणी पुरवठा संदर्भात नियोजन करण्यात यावे, अशा सुचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या. शहापूर तालुक्यात स्वच्छता प्रश्न महत्त्वाचा आहे. कचऱ्याची विल्हेवाट वेळोवेळी लावणे गरजेचे आहे. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्यात यावे. कचरा उचलला गेल्यानंतर व आधी असे फोटो काढून फोटो संकलन करण्यात आले पाहिजे. ग्रामसेवकांनी ज्या ठिकाणी ग्रामस्थ किंवा इतर कोणी कचरा टाकत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, असे यावेळी शिसोदे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे