शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

उमेदवार कोणीही असला तरी प्रत्येक जागेची जबाबदारी भाजपाची असेल- चंद्रशेखर बावनकुळे

By अजित मांडके | Updated: October 17, 2023 13:06 IST

लोकसभा प्रवास अंतर्गत मंगळवारी बावनकुळे हे ठाण्यात आले होते, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

ठाणे : कोण, कुठे उभा राहणार, कोणती जागा कोणाला मिळणार याचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी कमिटी, राज्यातील महायुतीचे तीन नेते आणि इतर घटक पक्षातील महत्त्वाचे नेते हा निर्णय घेतील. आमच्यात कुठेही मतभेद नाहीत किंवा मनभेदही नाहीत, उमेदवार कोणी जरी असला तरी प्रत्येक जागेची जबाबदारी ही भाजपचीच असेल असे मत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. 

लोकसभा प्रवास अंतर्गत मंगळवारी बावनकुळे हे ठाण्यात आले होते, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यात महाविजय २०२४ ची तयारी सुरू आहे त्यानुसार राज्यातून ४५ खासदार ५१ टक्के मते घेऊन मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.५१ टक्के मते ही भाजपची असतील मग महायुतीचा उमेदवार कोणी असेल त्याला भाजप निवडून आणेल असेही ठामपणे त्यांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीतही महायुतीचे 225 आमदार असतील असा दावाही त्यांनी केला.ठाणे असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल अथवा राज्यातील इतर ठिकाणी कुठेही कोणामध्ये मतभेद नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील यांच्या नाराजीबाबत त्यांना चिडले असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. ठाण्यात ६०० वॉरियर्स हे साडेतीन लाख घरापर्यंत जाऊन जनतेला सरकारने केलेला कामांची माहिती देतील तसेच जनतेच्या मनात असलेले गैरसमज ही दूर करतील असेही त्यांनी सांगितले.  

इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्व पक्षांची इच्छा आहे. यापूर्वीच मराठ्यांना आरक्षण मिळाले असते मात्र उद्धव ठाकरे यांनी केलेल्या चुकांमुळे ते आरक्षण मिळू शकले नाही. मात्र आता आमची भावना हीच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावे. परंतु हे आरक्षण देत असताना इतर समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू दिला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा