शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

३५० मुलांना वाचवणारे कौतुकापासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 02:04 IST

शहापूर तालुक्यातील भातसई येथील परिसरात आलेल्या पुरात बुडालेल्या शाळेतून तब्ब्ल साडेतीनशे मुलांना सुखरूप बाहेर काढणारे वेहळोली गावाचे सुपुत्र मात्र कौतुकापासून कोसो दूर राहिले आहेत.

भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसई येथील परिसरात आलेल्या पुरात बुडालेल्या शाळेतून तब्ब्ल साडेतीनशे मुलांना सुखरूप बाहेर काढणारे वेहळोली गावाचे सुपुत्र मात्र कौतुकापासून कोसो दूर राहिले आहेत.तालुक्यात पाच व सहा तारखेला आलेल्या महापुरात भातसई गाव भातसा नदीच्या रौद्र रूपाने व्यापला होता. तालुक्याचे भाजप अध्यक्ष भास्कर जाधव तहसीलदार व आदिवासी विकासाचे संजय मीना यांच्या संपर्कात होते. ध्येय एकच होते भातसई येथील आश्रमशाळेतील मुलांना कोणत्याही परिस्थिती सुरक्षितबाहेर काढणे. पण रस्ताच नसल्याने जायचे कसे हा मोठा प्रश्न समोर असताना ठाणे येथील प्रकल्प अधिकारी शशिकांत पाटील, शहापूराचे सहायक प्रकल्प अधिकारी विजय भडगावकर व वेहळोली गावचे सुपुत्र बाळू वेखंडे जे शहापूर येथील म.ना. बरोरा माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून काम करतात. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ अशोक वेखंडे,परेश भोईर यांना ही बातमी समजताच त्यांनी जीवाची पर्वा न करता या मुलांना पाण्याबाहेर काढण्याचा संकल्प केला.मोठे ओढे, नाले पार करत ही मंडळी कशीबशी शाळेजवळ पोहचली आणि चार ते पाच फूट पाण्याखाली गेलेल्या शाळेतून साडेतीनशे मुलांना पाण्याबाहेर सुरक्षितस्थळी आणण्याची कामिगरी या टीमने चोख बजावली. आदिवासी विभागाने या कामिगरीबद्दल शशिकांत पाटील, विजय भडगावकर यांना आदिवासी दिनी विशेष पुरस्कार देऊन गौरवले. मात्र वेहळोलीचे हे सुपुत्र मात्र अशा गौरवापासून दूरच राहिल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :floodपूरShahapurशहापूरthaneठाणे