शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

ना मुबलक पाणी, ना अखंडित वीज, विकसित बदलापूरच्या नुसत्याच गप्पा

By पंकज पाटील | Updated: August 24, 2024 05:39 IST

बदलापूरकरांनी आंदोलनातून राजकारण्यांना दाखवला आरसा

- पंकज पाटील

बदलापूर : बदलापूर शहर जसे झपाट्याने वाढले आणि त्यासोबत लोकसंख्याही वाढली. या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मुबलक पाणी, अखंडित वीज या मूलभूत सुविधा देण्यात प्रशासनाला, राजकारण्यांना अपयश आले.  ‘आमचे बदलापूर, विकसित बदलापूर’, असा टेंभा मिरवणाऱ्या राजकारण्यांना बदलापूरकरांनी आंदोलनातून आरसा दाखवला. आपला संताप दाखवण्यात बदलापूरकर कमी पडले नाहीत.एकेकाळी ग्रामपंचायत असलेल्या बदलापूर आणि त्याच्या परिसराचा गाव एकत्रित करून नगरपालिका करण्यात आली.

त्यामुळे या नगरपालिकेचे नेतृत्व करणारे स्थानिक ग्रामस्थ राहिले. मात्र, आज शहर वाढत असताना, या वाढत्या शहराला मुबलक पाणी देण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना मिळून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत १६० दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहरातील गळतीचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांच्या घरात असल्यामुळे पाणी असताना शहरवासीयांना पाणी देण्यात अपयश येते. 

सोसायट्या टँकरवर अवलंबूनशहरात नव्याने विकसित होणाऱ्या कात्रप, शिरगाव, मांजर्ली, वालीवली या भागांत पाणीपुरवठा नावाला आहे. त्यामुळे नव्याने विकसित होणाऱ्या इमारतींना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

वाढीव पाणी मंजुरी कागदावरचबदलापूरला पाच दशलक्ष लिटर इतके वाढीव पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी एमआयडीसीकडे अनेकवेळा बैठका झाल्या. मात्र, त्यातील केवळ दोन दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे अपुऱ्या पाणीपुरवठामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे.

हे तर लोड शेडिंगचे शहर...बदलापूरमध्ये विजेची समस्याही कायम आहे. अखंडित वीजपुरवठा करणे अपेक्षित असताना दीड लाखांहून अधिक शहरवासीयांना मुबलक वीजपुरवठा होत नाही. अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे बदलापूरचे नावही ‘लोड शेडिंगचे शहर’, असे झाले आहे. नव्याने विकसित होणाऱ्या इमारतींना विजेची जोडणी देणे बंधनकारक असले, तरी वाढीव वीज उपलब्ध होत नसल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होतात. यासोबतच वीजपुरवठा करणारी यंत्रणादेखील अपुरी असल्यामुळे विजेचा खेळखंडोबा कायम असतो.

शिरगाव भागात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावते. आम्हाला या ठिकाणी टँकरवर अवलंबून राहावे लागते. काही भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असला, तरी तो नियमित येत नाही.- मनोज राजगुरू, बदलापूर.

दिवसातून एक ते दोन वेळा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार बदलापुरात सतत घडत असतो. पावसाळ्यात, तर वीजपुरवठा खंडित होण्याची गणनाच करू शकत नाही. त्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.- प्रदीप जाधव, बदलापूर.

टॅग्स :badlapurबदलापूर