शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

ना मुबलक पाणी, ना अखंडित वीज, विकसित बदलापूरच्या नुसत्याच गप्पा

By पंकज पाटील | Updated: August 24, 2024 05:39 IST

बदलापूरकरांनी आंदोलनातून राजकारण्यांना दाखवला आरसा

- पंकज पाटील

बदलापूर : बदलापूर शहर जसे झपाट्याने वाढले आणि त्यासोबत लोकसंख्याही वाढली. या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मुबलक पाणी, अखंडित वीज या मूलभूत सुविधा देण्यात प्रशासनाला, राजकारण्यांना अपयश आले.  ‘आमचे बदलापूर, विकसित बदलापूर’, असा टेंभा मिरवणाऱ्या राजकारण्यांना बदलापूरकरांनी आंदोलनातून आरसा दाखवला. आपला संताप दाखवण्यात बदलापूरकर कमी पडले नाहीत.एकेकाळी ग्रामपंचायत असलेल्या बदलापूर आणि त्याच्या परिसराचा गाव एकत्रित करून नगरपालिका करण्यात आली.

त्यामुळे या नगरपालिकेचे नेतृत्व करणारे स्थानिक ग्रामस्थ राहिले. मात्र, आज शहर वाढत असताना, या वाढत्या शहराला मुबलक पाणी देण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना मिळून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत १६० दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहरातील गळतीचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांच्या घरात असल्यामुळे पाणी असताना शहरवासीयांना पाणी देण्यात अपयश येते. 

सोसायट्या टँकरवर अवलंबूनशहरात नव्याने विकसित होणाऱ्या कात्रप, शिरगाव, मांजर्ली, वालीवली या भागांत पाणीपुरवठा नावाला आहे. त्यामुळे नव्याने विकसित होणाऱ्या इमारतींना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

वाढीव पाणी मंजुरी कागदावरचबदलापूरला पाच दशलक्ष लिटर इतके वाढीव पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी एमआयडीसीकडे अनेकवेळा बैठका झाल्या. मात्र, त्यातील केवळ दोन दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे अपुऱ्या पाणीपुरवठामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे.

हे तर लोड शेडिंगचे शहर...बदलापूरमध्ये विजेची समस्याही कायम आहे. अखंडित वीजपुरवठा करणे अपेक्षित असताना दीड लाखांहून अधिक शहरवासीयांना मुबलक वीजपुरवठा होत नाही. अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे बदलापूरचे नावही ‘लोड शेडिंगचे शहर’, असे झाले आहे. नव्याने विकसित होणाऱ्या इमारतींना विजेची जोडणी देणे बंधनकारक असले, तरी वाढीव वीज उपलब्ध होत नसल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होतात. यासोबतच वीजपुरवठा करणारी यंत्रणादेखील अपुरी असल्यामुळे विजेचा खेळखंडोबा कायम असतो.

शिरगाव भागात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावते. आम्हाला या ठिकाणी टँकरवर अवलंबून राहावे लागते. काही भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असला, तरी तो नियमित येत नाही.- मनोज राजगुरू, बदलापूर.

दिवसातून एक ते दोन वेळा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार बदलापुरात सतत घडत असतो. पावसाळ्यात, तर वीजपुरवठा खंडित होण्याची गणनाच करू शकत नाही. त्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.- प्रदीप जाधव, बदलापूर.

टॅग्स :badlapurबदलापूर