शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

ना मुबलक पाणी, ना अखंडित वीज, विकसित बदलापूरच्या नुसत्याच गप्पा

By पंकज पाटील | Updated: August 24, 2024 05:39 IST

बदलापूरकरांनी आंदोलनातून राजकारण्यांना दाखवला आरसा

- पंकज पाटील

बदलापूर : बदलापूर शहर जसे झपाट्याने वाढले आणि त्यासोबत लोकसंख्याही वाढली. या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मुबलक पाणी, अखंडित वीज या मूलभूत सुविधा देण्यात प्रशासनाला, राजकारण्यांना अपयश आले.  ‘आमचे बदलापूर, विकसित बदलापूर’, असा टेंभा मिरवणाऱ्या राजकारण्यांना बदलापूरकरांनी आंदोलनातून आरसा दाखवला. आपला संताप दाखवण्यात बदलापूरकर कमी पडले नाहीत.एकेकाळी ग्रामपंचायत असलेल्या बदलापूर आणि त्याच्या परिसराचा गाव एकत्रित करून नगरपालिका करण्यात आली.

त्यामुळे या नगरपालिकेचे नेतृत्व करणारे स्थानिक ग्रामस्थ राहिले. मात्र, आज शहर वाढत असताना, या वाढत्या शहराला मुबलक पाणी देण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना मिळून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत १६० दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहरातील गळतीचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांच्या घरात असल्यामुळे पाणी असताना शहरवासीयांना पाणी देण्यात अपयश येते. 

सोसायट्या टँकरवर अवलंबूनशहरात नव्याने विकसित होणाऱ्या कात्रप, शिरगाव, मांजर्ली, वालीवली या भागांत पाणीपुरवठा नावाला आहे. त्यामुळे नव्याने विकसित होणाऱ्या इमारतींना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

वाढीव पाणी मंजुरी कागदावरचबदलापूरला पाच दशलक्ष लिटर इतके वाढीव पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी एमआयडीसीकडे अनेकवेळा बैठका झाल्या. मात्र, त्यातील केवळ दोन दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे अपुऱ्या पाणीपुरवठामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे.

हे तर लोड शेडिंगचे शहर...बदलापूरमध्ये विजेची समस्याही कायम आहे. अखंडित वीजपुरवठा करणे अपेक्षित असताना दीड लाखांहून अधिक शहरवासीयांना मुबलक वीजपुरवठा होत नाही. अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे बदलापूरचे नावही ‘लोड शेडिंगचे शहर’, असे झाले आहे. नव्याने विकसित होणाऱ्या इमारतींना विजेची जोडणी देणे बंधनकारक असले, तरी वाढीव वीज उपलब्ध होत नसल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होतात. यासोबतच वीजपुरवठा करणारी यंत्रणादेखील अपुरी असल्यामुळे विजेचा खेळखंडोबा कायम असतो.

शिरगाव भागात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावते. आम्हाला या ठिकाणी टँकरवर अवलंबून राहावे लागते. काही भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असला, तरी तो नियमित येत नाही.- मनोज राजगुरू, बदलापूर.

दिवसातून एक ते दोन वेळा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार बदलापुरात सतत घडत असतो. पावसाळ्यात, तर वीजपुरवठा खंडित होण्याची गणनाच करू शकत नाही. त्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.- प्रदीप जाधव, बदलापूर.

टॅग्स :badlapurबदलापूर