शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

नितीन जंक्शनचा पूल धोकादायक, श्वेतपत्रिका न काढल्यास हायवे जॅम करण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 04:57 IST

कोपरीच्या धोकादायक पुलाबाबतीत ठामपा, एमएसआरडीसी आणि बांधकाम खात्याने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसतानाच आता ठाणे शहरातील सर्वात मोठा समजला जाणारा नितीन जंक्शनचा उड्डाणपूलही धोकादायक झाल्याचा अहवाल आयआयटीने दिला आहे.

ठाणे - कोपरीच्या धोकादायक पुलाबाबतीत ठामपा, एमएसआरडीसी आणि बांधकाम खात्याने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसतानाच आता ठाणे शहरातील सर्वात मोठा समजला जाणारा नितीन जंक्शनचा उड्डाणपूलही धोकादायक झाल्याचा अहवाल आयआयटीने दिला आहे. मात्र, रस्ते विकास महामंडळाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. ‘नागरिक मरायचे तर मरू दे. आमची सत्ता येऊ दे’ असाच नारा या सरकारचा आहे; अशी टीका करून पुलांची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी सोमवारी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. आठ दिवसांत ती जारी केली नाही, तर आम्ही हायवे बंद करू, असा इशाराही त्यांनी दिला.ठाणे-मुंबई जोडणारा कोपरी पूल धोकादायक झाल्याने त्यावर गतिरोधक आणि उंचीरोधक बसवून धोक्याचा इशारा देणारा फलक लावण्याच्या सूचना रेल्वेने केल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अशातच नितीन जंक्शन-कॅडबरी पूल धोकादायक झाल्याचा अहवाल आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ सविक बॅनर्जी आणि आर. एस. जहाँगीर यांनी एमएसआरडीसीला सादर केला आहे. तो अहवालच त्यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत सादर केला.आयआयटीने नितीन जंक्शन पुलाचे २०१७ मध्ये परीक्षण करून २२ नोव्हेंबर २०१७ ला अहवाल सादर केला. त्यात पुलाच्या सर्व गर्डरना बाक येऊन तडेही गेले आहेत. त्याच्या स्लॅबसाठी वापरलेले काँक्रिटही सुमार दर्जाचे असल्याचे नमूद केलेले आहे. मुंबईतील पुलाची दुर्घटना अशाच त्रुटींमुळे घडली आहे. त्यामुळे हा पूलही कोसळण्याची दाट शक्यता आहे. तो कोसळल्यास अनेकांचे जीव तर जातीलच, शिवाय नाशिकमार्गे होणारी उत्तरेकडील वाहतूकही ठप्प होईल. शरद पवार यांनीही या पुलांच्या बाबतीत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांना त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही, अशी जोरदार टीका आव्हाड यांनी यावेळी केली.तर ‘तेच’ जबाबदारएमएसआरडीसीने नितीन जंक्शन पुलाचे आॅडिट केले आहे का? केले असल्यास काय उपाययोजना केल्या? याची विचारणाही आव्हाड यांनी केली आहे.आयआयटीने आपला अहवाल एमएसआरडीसीला म्हणजेच या खात्याचा कारभार सांभाळणाऱ्या पालकमंत्र्यांना सादर केला आहे. त्यामुळे जर दुर्घटना घडली, तर तेच जबाबदार असतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणे