शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठाण्यात नऊ दुचाकी जाळल्या, आरोपींचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 00:58 IST

एकीकडे राज्यातील पुणे आणि नाशिक शहरांत वाहने पेटवून देण्याचे प्रकार घडले असतानाच ठाणे शहरातही हे लोण पसरल्याने संताप व्यक्त होत आहे.

ठाणे : एकीकडे राज्यातील पुणे आणि नाशिक शहरांत वाहने पेटवून देण्याचे प्रकार घडले असतानाच ठाणे शहरातही हे लोण पसरल्याने संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या सेवारस्त्यावरील गणेशवाडीमध्ये नऊ मोटारसायकलींना आगी लावण्याचे प्रकार घडले. यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.वर्षभरापूर्वी नौपाड्यात अंतर्गत वादातून एका रिक्षासह पाच वाहने जाळण्यात आली होती. यात तिघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर वागळे इस्टेट, कोपरी आणि ठाणे रेल्वेस्थानक भागातही असेच मोटारसायकली जाळपोळीचे प्रकार घडले होते. गुरुवारी पाचपाखाडीतील कौशल्या हॉस्पिटलजवळ पहाटे २ ते ३ च्या सुमारास पुन्हा हा प्रकार घडला. यामध्ये सुरेखा अहिरे, अमित खापरे, चंद्रकांत जोशी आणि संतोष भोईर आदी नऊ जणांच्या दुचाकींना लक्ष करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच अग्निशमन दलाने या दुचाकींना लागलेली आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतल्यामुळे पेटलेल्या वाहनांच्या बाजूला असलेल्या दुचाकी आणि काही कार सुरक्षित राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरु वारी पहाटे २ वाजताच्या दरम्यान एक दुचाकी जळत असल्याची माहिती पाचपाखाडी भागातील एका रहिवाशाने पाचपाखाडी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर, घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. या घटनेने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरातील सीसीटीव्ही तसेच खबऱ्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.