शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

निळजे रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीस खुला; अवघ्या १५ दिवसांत केली दुरुस्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 11:59 IST

१५ जूनपासून हा रस्ता बंद केल्यामुळे इथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पण एमएसआरडीसीने नियोजनबद्ध पद्धतीने दुरुस्ती काम करून फक्त १५ दिवसांत पूल पुन्हा सुरू केला.

मुंबईः कल्याण -शीळ रस्त्यावरील निळजे रेल्वे उड्डाणपूल शनिवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचा अहवाल आयआयटी मुंबईने दिल्यानंतर १५ जूनपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरांना जोडणारा कल्याण-शीळ रस्ता आणि त्यावरचा निळजे रेल्वे उड्डाणपूल इथल्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. पण १५ जूनपासून हा रस्ता बंद केल्यामुळे इथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पण एमएसआरडीसीने नियोजनबद्ध पद्धतीने दुरुस्ती काम करून फक्त १५ दिवसांत पूल पुन्हा सुरू केला.उड्डाणपूल कमकुवत असला, तरी किमान हलक्या वाहनांसाठी तरी त्याचा उपयोग करता येईल का? याचा विचार सुरू झाला. खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. अखेर एमएसआरडीसीने रेल्वे अभियंत्यांशी चर्चा करून दुरुस्तीची योजना तीन टप्प्यात  आखली.

तीन टप्प्यात दुरुस्ती१. पुलावरचा अतिरिक्त भार कमी करणे२. काँक्रिट स्लॅब मजबूत करणे३. कमकुवत झालेल्या स्टील गर्डरचं मजबुतीकरण करणे

  • टप्पे निश्चित झाल्यानंतर एमएसआरडीसी आणि रेल्वे अभियंते कामाला लागले.
  • सर्वात आधी पुलावरचा अतिरिक्त ८० मिमी डांबराचा थर काढला. १० मेट्रिक टन भार हलका झाला
  • इपॉस्की ग्राऊटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून पुलाच्या काँक्रिट स्लॅबचं मजबुतीकरण केलं
  • पुलाच्या पृष्ठभागावर फक्त ३० मिमी मास्टीक थर दिला

पुलाच्या ४ पैकी २ गर्डरमध्ये गंज बसलेल्या ठिकाणी किती प्रमाणात हानी झाली आहे हे तपासण्यात आले व त्या लांबीमध्ये  बोल्टिंग करून स्टील प्लेट बसवण्यात आल्या. यापुढेही गर्डर गंजू नयेत. म्हणून अँटि कोरोशन पेंट देखील देण्यात आला.  पण चाचणीशिवाय पूल वाहतुकीसाठी खुला करणं शक्यच नव्हतं. दुरुस्ती नीट झाली की नाही, हे तपासण्यासाठी प्रत्यक्ष लोडटेस्ट देखील घेण्यात आली. काम पूर्ण झालं. कल्याण-डोंबिवलीमधला सक्तीचा लॉकडाऊन आणि वरून धो धो कोसळणारा पाऊस, या अडचणी असून देखील एमएसआरडीसी आणि रेल्वे विभागाच्या अभियंत्यांनी फक्त १५ दिवसांत पुलाची दुरुस्ती करून हलक्या वाहनांसाठी तो खुला देखील केला.