शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आईवडिलांना पाहुणचार न केल्याने नवविवाहितेची ठाण्यात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 21:12 IST

अगदी क्षुल्लक कारणावरुन एका नवविवाहितेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना ठाण्याच्या ज्ञानेश्वरनगरमध्ये रविवारी घडली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस तपास करीत आहेत.

ठळक मुद्देजेवणासाठी विचारपूस न केल्याचा राग रुग्णलयात दाखल केल्यानंतर काही तासातच झाला मृत्युकुटूंबीयांमध्ये हळहळ

ठाणे : औरंगाबाद येथून ठाण्यात लेकीकडे आलेल्या सासू सास-यांना जावयाने पाहुणचारासाठी आग्रह न धरल्याच्या रागातून रविना बाबासाहेब राऊत (२२) या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना ज्ञानेश्वरनगर येथे रविवारी घडली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्ञानेश्वरनगरातील पंचपरमेश्वर चाळीत रविना आणि बाबासाहेब हे दाम्पत्य वास्तव्याला आहे. अवघ्या वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला आहे. त्यांच्यात २ मे रोजी क्षुल्लक कारणावरून आधीच वाद झाला होता. नेमकी त्याचवेळी औरंगाबाद येथून रविनाचे आईवडिल तिला भेटण्यासाठी आले. त्यावेळी जावई त्यांच्याशी फारसे काही बोलले नाही. शिवाय, त्यांना जेवण किंवा राहण्यासाठीही त्यांनी काहीच आग्रह धरला नाही. त्यामुळे ते ३ मे रोजी पुन्हा आपल्या गावी निघून गेले. यातून पुन्हा या दाम्पत्यामध्ये पुन्हा ४ आणि ५ मे रोजी वाद झाला. याच वादातून तिने उंदीर मारण्यासाठी आणलेले विष शनिवारी रात्री प्राशन केले. आपण विष घेतल्याचे तिने पतीला न सांगता रात्री केवळ अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले. त्यावर दवाखान्यात जाण्यासही तिने नकार दिला. दुसºया दिवशी ६ मे रोजी पुन्हा त्रास झाल्यानंतर सकाळीच ९ वाजण्याच्या सुमारास ते स्थानिक खासगी रुग्णालयात गेले. त्यावेळी मात्र तिने असे विष घेतल्याचे डॉक्टरांना सागितले. तिला तातडीने नौपाड्यातील ‘निपुण’ या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांनाच ६ मे रोजी रात्री ८.५० वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. घरात सासू सास-यांना राहण्यासाठी आग्रह न केल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता, अशी माहिती चौकशीत समोर आल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. हा संपूर्ण प्रकार वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेला असल्याने याप्रकरणी सोमवारी (७ मे रोजी ) वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाSuicideआत्महत्या