शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 05:44 IST

भार्इंदरच्या पंडित जोशी रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आई-वडिलांनी रुग्णालयातील भोंगळ कारभार यास जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जोशी रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

मीरा रोड : भार्इंदरच्या पंडित जोशी रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आई-वडिलांनी रुग्णालयातील भोंगळ कारभार यास जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जोशी रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.भार्इंदर पुर्वेच्या इंद्रलोक फेस २ मध्ये राहणाराया मंगला विक्रम चाड यांना प्रसुती वेदना होऊ लागल्याने शनिवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रुग्णालयात सोनोग्राफी सुरु नसल्याने त्यांना फाटकाजवळील एका बिल्डरने सुरु केलेल्या सोनोग्राफी केंद्रात तपासणीसाठी पाठवण्यात आले. तेथे सोनोग्राफी करुन झाल्यानंतर त्या परत रुग्णालयात आल्या. ५ मे रोजीच्या पहाटे दीडच्या सुमारास मंगला बाळंत झाल्या. पण बाळ हालचाल करत नव्हते. डॉक्टरांनी प्रयत्न करुनदेखील हालचाल नसल्याने बाळास मृत घोषित करण्यात आले.चाड दाम्पत्यास दहा वर्षांनी पहिल्यांदाच बाळ झाले होते. पण ते मृत झाल्याने त्यांच्यावर शोककळा पसरली. दरम्यान, इतक्या मोठ्या रुग्णालयात सोनोग्राफी सुरु नसल्याने पत्नीस त्या अवस्थेतदेखील खाजगी केंद्रात सोनोग्राफीसाठी पाठवण्यात आले. परंतु तेथे जाण्यासाठी रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. सोनोग्राफीचा अहवाल व्यवस्थित होता. मग बाळ मृत कसे झाले, असे सांगत विक्रम यांनी प्रशासन बाळाच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.नवघर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून उपनिरीक्षक विजय टक्के हे तपास करत आहे. पालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांच्याशी महापालिकेच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी कॉल घेतला नाही. रूग्णालयात आवश्यक सुविधा नसल्याची बाब प्रशासनानाला सतत कळवली आहे. पण प्रशासनाकडूनच आवश्यक आयसीयू, एनआयसीयू आदी सुविधाच दिल्या जात नसल्याने डॉक्टरांनी तरी काय करायचे, असा सवाल एका डॉक्टरने केला. या आधीही जोशी रुग्णालयात काही रुग्णांचे मृत्यू झाले असून, याबाबत महापालिकेवर तसेच शासनावर सातत्याने आरोप होत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू