शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन ठाण्याचा प्रस्ताव गोंधळात मंजूर;विशेष नियोजन प्राधिकरणाला हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:23 IST

ठाणे शहरापासून जवळ असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे या महसुली गावांचा विकास नवीन ठाणे म्हणून करण्याचा प्रस्ताव सोमवारी महासभा संपत असताना सत्ताधाऱ्यांनी मंजूर केला.

ठाणे : ठाणे शहरापासून जवळ असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे या महसुली गावांचा विकास नवीन ठाणे म्हणून करण्याचा प्रस्ताव सोमवारी महासभा संपत असताना सत्ताधाऱ्यांनी मंजूर केला. या प्रस्तावाला सुरुवातीपासूनच राष्टÑवादी काँग्रेस आणि भाजपाने विरोध केला होता. मात्र, विरोधकांचा विरोध डावलून शिवसेनेने प्रस्ताव रेटला. सध्या ठाण्यात समस्यांचा डोंगर असताना नवे ठाणे विकसित करण्यामागे बिल्डरहित दडले असल्याचे आरोप होत आहेत.खारबाव आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांचा समावेश नवीन ठाणेमध्ये करून या भागाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून ठाणे महापालिका व एमएमआरडीए यांची संयुक्त नेमणूक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत ठाणे महापालिकेने मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. विरोधक आपली भूमिका मांडणार, त्याआधीच आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपली भूमिका विशद केली. हा प्रस्ताव मंजूर केला किंवा नामंजूर केला तरीसुद्धा या भागाचा विकास होणार असल्याचे मत आयुक्तांनी मांडले. परंतु, महापालिकेला एकही पैसा खर्च न करता या योजनेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेतल्यास ठाण्याचेही नाव होईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. नवीन ठाण्याचा विकास होताना सध्याच्या ठाणे शहराच्या विकासालाही चालना मिळणार आहे. ठाण्याचे २०० हेक्टर क्षेत्र विकसित होण्यास हातभार लागणार असल्याकडे आयुक्तांनी लक्ष वेधले. शहर विकास विभागाचे अधिकारी प्रमोद निंबाळकर यांनीही या भागाच्या विकासाची का गरज आहे, हे सांगितले. शहराचा डीपीआर मंजूर झाल्यानंतर आजही काही आरक्षणांचा विकास करता आलेला नाही. नव्या प्रस्तावामुळे आरक्षणे विकसित होण्यास चालना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सत्ताधाºयांविरोधात विरोधकांच्या घोषणाआयुक्त आणि शहर विकास अधिकारी यांच्या युक्तिवादाने विरोधी पक्षाचे समाधान झाले नाही. राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी एमएमआरडीएने येथील सर्व्हे करताना अर्धा भाग का वगळला, असा सवाल केला.नजीब मुल्ला यांनी इतर मुद्दे मांडण्याचाही प्रयत्न केला. मात्र नरेश म्हस्के यांनी वेळेचे कारण देत विरोधकांना रोखले. विरोधकांनी अगोदर आयुक्तांचे कौतुक केले आणि आता त्यांना विरोध करत असल्याकडे म्हस्के यांनी लक्ष वेधले.नवीन ठाण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा केली. त्यानंतर, सभागृहात चांगलाच गोंधळ झाला. विरोधकांनी सत्ताधाºयांविरोधात घोषणाबाजी करत या विषयावर सखोल चर्चेची मागणी केली.नवीन ठाण्याच्या विषयासह कोस्टल रोड, खाडीवरील उड्डाणपूल या विषयांवर महासभेत मोठा गदारोळ झाला. या गोंधळातच मंजुरी घेऊन सत्ताधाºयांनी महासभा आटोपती घेतली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका