शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर, चिराग नगर आणि देसाई गावात महापालिकेची नवीन अग्निशमन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 16:09 IST

ठाण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे १४ फायर स्टेशनची आवश्यकता आहे. त्यानुसार आता नव्याने तीन फायर स्टेशन येत्या काळात कार्यान्वित होणार आहेत. या संदर्भातील प्रस्तावांना नुकतीच मान्यता मिळाली असून पावसाळ्यानंतर केंद्राच्या कामांना सुरवात होणार आहे.

ठळक मुद्देवाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तीन नवीन फायर स्टेशनदिव्यातील देसाई गावातही नवीन केंद्र

ठाणे - मान्सूनमध्ये घडणाऱ्या आत्पतींचा सामना करण्यासाठी आणि प्रतीसाद कालावधी कमी करण्याच्या दृष्टीकोणातून ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने मान्सूनच्या कालावधीसाठी तीन तात्पुरती बीट फायर स्टेशन कार्यान्वित केली आहेत. परंतु आता त्यातील ओवळा येथील फायर स्टेशन कायम स्वरुपी उभारण्यात येणार आहे. तसेच चिराग नगर आणि देसाई गाव येथे देखील नव्याने कायमस्वरुपी फायर स्टेशन सुरु करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. या संदर्भातील प्रस्तावांना नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता येत्या काही महिन्यात ही स्टेशन सुरु होतील असा विश्वास ठाणे अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.                      ठाणे शहराची लोकसंख्या आजच्या घडीला २२ लाखांच्या घरात गेली आहे. या लोकसंख्येला १४ फायर स्टेशनची गरज आहे. परंतु सध्या ६ फायरस्टेशन कार्यान्वीत असून, आता नव्याने तीन फायरस्टेशन नव्याने तयार होणार आहे. तसेच आनंद नगर, माजिवडा, दिवा, रुस्तमजी, हिरानंदानी इस्टेट, देसाई गाव आदी ठिकाणी देखील फायर स्टेशन मंजूर झाली असून त्यांच्या कामांच्या वर्कआॅर्डर देखील काढण्यात आल्या आहेत. परंतु या सर्व फायरस्टेशनची कामे पावसाळ्यानंतर सुरु केली जाणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.दरम्यान पावसाळ्यासाठी घोडबंदर भागातील ओवळा (कावेसर) भागात तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आलेले अग्निशमन केंद्र आता कायमस्वरुपात सुरु करण्यात येणार आहे. येथील आरक्षित भुखंडावर हे केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ६.७७ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तसेच चिराग नगर येथील सर्व्हीस रस्ता भागातील आरक्षित भुखंडावर देखील नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी ०७ लाख ९९ हजार ९०१ रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तर दिव्या पाठोपाठ देसाई गाव येथे देखील अशा प्रकारे नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. दिवा आणि आजूबाजूची लोकसंख्या वाढत असल्याने येथे केवळ मुंब्य्राचेच अग्निशमन केंद्र सध्या अस्तित्वात आहे. परंतु एखादी घटना घडल्यास येथील केंद्रातून गाडी जाण्यासाठी तासाचा अवधी जात होता. त्यामुळे या भागाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन येथे दिव्या पाठोपाठ देसाई गावात देखील नव्याने केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी ३० लाख ९६ हजार १७ रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर या केंद्राच्या कामांना सुरवात होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त