शहरं
Join us  
Trending Stories
1
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
2
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
3
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
5
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
7
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
8
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
9
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
10
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
11
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
12
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
13
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
14
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
15
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
16
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
17
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
20
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल

घोडबंदर, चिराग नगर आणि देसाई गावात महापालिकेची नवीन अग्निशमन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 16:09 IST

ठाण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे १४ फायर स्टेशनची आवश्यकता आहे. त्यानुसार आता नव्याने तीन फायर स्टेशन येत्या काळात कार्यान्वित होणार आहेत. या संदर्भातील प्रस्तावांना नुकतीच मान्यता मिळाली असून पावसाळ्यानंतर केंद्राच्या कामांना सुरवात होणार आहे.

ठळक मुद्देवाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तीन नवीन फायर स्टेशनदिव्यातील देसाई गावातही नवीन केंद्र

ठाणे - मान्सूनमध्ये घडणाऱ्या आत्पतींचा सामना करण्यासाठी आणि प्रतीसाद कालावधी कमी करण्याच्या दृष्टीकोणातून ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने मान्सूनच्या कालावधीसाठी तीन तात्पुरती बीट फायर स्टेशन कार्यान्वित केली आहेत. परंतु आता त्यातील ओवळा येथील फायर स्टेशन कायम स्वरुपी उभारण्यात येणार आहे. तसेच चिराग नगर आणि देसाई गाव येथे देखील नव्याने कायमस्वरुपी फायर स्टेशन सुरु करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. या संदर्भातील प्रस्तावांना नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता येत्या काही महिन्यात ही स्टेशन सुरु होतील असा विश्वास ठाणे अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.                      ठाणे शहराची लोकसंख्या आजच्या घडीला २२ लाखांच्या घरात गेली आहे. या लोकसंख्येला १४ फायर स्टेशनची गरज आहे. परंतु सध्या ६ फायरस्टेशन कार्यान्वीत असून, आता नव्याने तीन फायरस्टेशन नव्याने तयार होणार आहे. तसेच आनंद नगर, माजिवडा, दिवा, रुस्तमजी, हिरानंदानी इस्टेट, देसाई गाव आदी ठिकाणी देखील फायर स्टेशन मंजूर झाली असून त्यांच्या कामांच्या वर्कआॅर्डर देखील काढण्यात आल्या आहेत. परंतु या सर्व फायरस्टेशनची कामे पावसाळ्यानंतर सुरु केली जाणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.दरम्यान पावसाळ्यासाठी घोडबंदर भागातील ओवळा (कावेसर) भागात तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आलेले अग्निशमन केंद्र आता कायमस्वरुपात सुरु करण्यात येणार आहे. येथील आरक्षित भुखंडावर हे केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ६.७७ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तसेच चिराग नगर येथील सर्व्हीस रस्ता भागातील आरक्षित भुखंडावर देखील नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी ०७ लाख ९९ हजार ९०१ रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तर दिव्या पाठोपाठ देसाई गाव येथे देखील अशा प्रकारे नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. दिवा आणि आजूबाजूची लोकसंख्या वाढत असल्याने येथे केवळ मुंब्य्राचेच अग्निशमन केंद्र सध्या अस्तित्वात आहे. परंतु एखादी घटना घडल्यास येथील केंद्रातून गाडी जाण्यासाठी तासाचा अवधी जात होता. त्यामुळे या भागाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन येथे दिव्या पाठोपाठ देसाई गावात देखील नव्याने केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी ३० लाख ९६ हजार १७ रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर या केंद्राच्या कामांना सुरवात होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त