शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

घोडबंदर, चिराग नगर आणि देसाई गावात महापालिकेची नवीन अग्निशमन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 16:09 IST

ठाण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे १४ फायर स्टेशनची आवश्यकता आहे. त्यानुसार आता नव्याने तीन फायर स्टेशन येत्या काळात कार्यान्वित होणार आहेत. या संदर्भातील प्रस्तावांना नुकतीच मान्यता मिळाली असून पावसाळ्यानंतर केंद्राच्या कामांना सुरवात होणार आहे.

ठळक मुद्देवाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तीन नवीन फायर स्टेशनदिव्यातील देसाई गावातही नवीन केंद्र

ठाणे - मान्सूनमध्ये घडणाऱ्या आत्पतींचा सामना करण्यासाठी आणि प्रतीसाद कालावधी कमी करण्याच्या दृष्टीकोणातून ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने मान्सूनच्या कालावधीसाठी तीन तात्पुरती बीट फायर स्टेशन कार्यान्वित केली आहेत. परंतु आता त्यातील ओवळा येथील फायर स्टेशन कायम स्वरुपी उभारण्यात येणार आहे. तसेच चिराग नगर आणि देसाई गाव येथे देखील नव्याने कायमस्वरुपी फायर स्टेशन सुरु करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. या संदर्भातील प्रस्तावांना नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता येत्या काही महिन्यात ही स्टेशन सुरु होतील असा विश्वास ठाणे अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.                      ठाणे शहराची लोकसंख्या आजच्या घडीला २२ लाखांच्या घरात गेली आहे. या लोकसंख्येला १४ फायर स्टेशनची गरज आहे. परंतु सध्या ६ फायरस्टेशन कार्यान्वीत असून, आता नव्याने तीन फायरस्टेशन नव्याने तयार होणार आहे. तसेच आनंद नगर, माजिवडा, दिवा, रुस्तमजी, हिरानंदानी इस्टेट, देसाई गाव आदी ठिकाणी देखील फायर स्टेशन मंजूर झाली असून त्यांच्या कामांच्या वर्कआॅर्डर देखील काढण्यात आल्या आहेत. परंतु या सर्व फायरस्टेशनची कामे पावसाळ्यानंतर सुरु केली जाणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.दरम्यान पावसाळ्यासाठी घोडबंदर भागातील ओवळा (कावेसर) भागात तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आलेले अग्निशमन केंद्र आता कायमस्वरुपात सुरु करण्यात येणार आहे. येथील आरक्षित भुखंडावर हे केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ६.७७ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तसेच चिराग नगर येथील सर्व्हीस रस्ता भागातील आरक्षित भुखंडावर देखील नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी ०७ लाख ९९ हजार ९०१ रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तर दिव्या पाठोपाठ देसाई गाव येथे देखील अशा प्रकारे नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. दिवा आणि आजूबाजूची लोकसंख्या वाढत असल्याने येथे केवळ मुंब्य्राचेच अग्निशमन केंद्र सध्या अस्तित्वात आहे. परंतु एखादी घटना घडल्यास येथील केंद्रातून गाडी जाण्यासाठी तासाचा अवधी जात होता. त्यामुळे या भागाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन येथे दिव्या पाठोपाठ देसाई गावात देखील नव्याने केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी ३० लाख ९६ हजार १७ रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर या केंद्राच्या कामांना सुरवात होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त