शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बदलापूरच्या पूर नियंत्रण रेषांची नव्याने चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:33 AM

बदलापूर : बदलापूर शहरातील पुराची परिस्थिती पाहता दोन वर्षांपूर्वी लघुपाटबंधारे विभागाने नव्याने जाहीर केलेल्या पूर नियंत्रण रेषेवर आता चर्चा ...

बदलापूर : बदलापूर शहरातील पुराची परिस्थिती पाहता दोन वर्षांपूर्वी लघुपाटबंधारे विभागाने नव्याने जाहीर केलेल्या पूर नियंत्रण रेषेवर आता चर्चा सुरू झाली आहे. उल्हास नदीपात्रापासून पूर नियंत्रण रेषा शहराच्या दिशेने वाढविण्यात आल्याने त्याला राजकीय आणि बांधकाम व्यावसायिकांनी विरोध केला होता. मात्र पुन्हा पुराचा फटका बसल्याने आता पूर नियंत्रण रेषा योग्य असल्याची चर्चा रंगली आहे.

२०२० मध्ये लघू पाटबंधारे विभागाने पूर नियंत्रण रेषा जाहीर केली आहे. आतापर्यंत आलेल्या पुराचा आढावा घेऊन पाटबंधारे विभागाने ही पूर नियंत्रण रेषा निश्चित केली आहे. मात्र पूरनियंत्रण रेषा निश्चित करताना त्या ठिकाणी नव्याने विकसित होणाऱ्यांना कोणती संधी उपलब्ध झालेली नाही. मात्र त्या ठिकाणी असलेल्या जुन्या इमारतींबाबत पुनर्विकास करण्यासाठी अटी आणि शर्ती निश्चित केल्याने भविष्यात उल्हास नदीच्या काठावर असलेल्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास केल्याशिवाय या भागात होणारी आर्थिक हानी टाळता येणार नाही.

बदलापूर शहरातील पूर नियंत्रण रेषेला नागरिकांपेक्षा बांधकाम व्यावसायिकांचा विरोध जास्त असल्याने त्या विरोधाला शासन जुमानेल असे सद्य:स्थितीत तरी वाटत नाही. पूर नियंत्रण रेषेबाबत बदलापूरकरांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला जात असला तरी प्रत्यक्षात पुराच्या वेळी निर्माण होणारी परिस्थिती पाहता नदीकाठावर असलेल्या इमारती आणि नव्याने विकसित होणाऱ्या इमारतींनी याबाबत ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मंगळवारी पूर नियंत्रण रेषेबाबत मंत्रालयात बैठक सुरू असताना लगेच दुसऱ्या दिवशीपासून बदलापूर शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पूर नियंत्रण रेषांबाबत शासन सहानुभूतिपूर्वक विचार करण्याच्या मानसिकतेत असतानाच पुन्हा पुराचा फटका बसल्याने आता शासन यासंदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

-----------