शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

नव्या काँक्रिट रस्त्यांवर अडथळे कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 00:13 IST

ठाकुर्ली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलामुळे जोशी हायस्कूल आणि बावनचाळ परिसरांतील वाहनांची वाहतूक वाढली आहे.

डोंबिवली : ठाकुर्ली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलामुळे जोशी हायस्कूल आणि बावनचाळ परिसरांतील वाहनांची वाहतूक वाढली आहे. पश्चिमेतील पुलानजीकच्या तीन रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. आता त्यावरून वाहने जाऊ लागली आहेत. मात्र, जेथे हे रस्ते अन्य रस्त्यांना जोडले जातात, तेथे मातीचे ढिगारे आहेत. तसेच दोन्ही रस्त्यांची पातळीही समसमान नाही. त्यामुळे वाहनचालकांपुढील अडथळे कमी झालेले नाहीत.ठाकुर्ली उड्डाणपूल मागील वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाहनांसाठी खुला करण्यात आला. उड्डाणपुलामुळे का होईना रेल्वेच्या हद्दीतील बावनचाळ परिसरातील रस्त्यांच्या कामाला चालना मिळाली आहे. प्रारंभी या परिसरातील रस्त्यांना डांबरीकरणाचा साज चढवण्यात आला होता. त्यानंतर, आता रेल्वेने चार महिन्यांपासून रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले. प्रारंभी दोन रस्त्यांची कामे हाती घेतली होती. त्यामुळे चिंचोळ्या गल्लीतून कच्च्या रस्त्यावरून वाहनांना वाट काढावी लागली होती. मात्र, या दोन्ही रस्त्यांची कामे संथगतीने का होईना पूर्ण झाली. परंतु, उड्डाणपूल उतरल्यानंतर उजवीकडे जाणाºया नव्याने झालेल्या काँक्रिट रस्त्यावर मधोमध उभे असलेले विजेचे लोखंडी खांब अजूनही हटवलेले नाहीत. तरीही, हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. त्यापाठोपाठ पुलासमोरील रस्त्याचे खोदकाम सुरू करण्यात आले. हा रस्ता बंद असताना वाहतुकीसाठी त्याच्या बाजूने पर्यायी रस्ता दिला होता. ओबडधोबड आणि धुळीचा असल्याने तो रस्ता गैरसोयीचा ठरत होता. अखेर, या मुख्य रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने तो वाहनांसाठी खुला केला आहे.मातीचे ढिगारे, उंचसखल पातळीमुळे दुचाकी व छोट्या वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. धुळीच्या त्रासातून मुक्तता झाली असली तरी नव्या काँक्रिट रस्त्यांवर अडथळे कायम असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.>मार्गदर्शक फलक, प्रखर दिवे हवेतरेल्वेने रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले असले, तरी या रस्त्यांवर आणि पुलावर पश्चिमेकडे मार्गदर्शक फलक नाहीत. त्यामुळे ते लावण्याची मागणी होत आहे. वाहनचालक सध्या वेगाने वाहने हाकत असल्याने गतिरोधक बसवावेत. तसेच प्रखर दिवे लावावेत, अशी मागणी नागरिकांकडूनहोत आहे.