शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भिवंडीत रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष, कंपनी दहा वर्षांपासून करतेय टोल वसुली    

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 17:14 IST

विशेष म्हणजे कामे अपूर्ण असूनही या कंपनीने १९ जानेवारी २०१२ पासून मोठ्या प्रमाणात टोल वसूल करण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देभिवंडीत चिंचोटी-अंजुफाटा ते माणकोली असे रस्ता रुंदीकरणाच काम हे  बी. ओ. टी. तत्वावर सुरुवातीला मे.भारत उद्योग लिमिटेड या कंपनीने घेतले होते.

भिवंडीभिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या दुरावस्था झाली आहे. त्यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या रस्त्याकडे पुरते दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची बरीचशी कामे अपूर्ण असतांनाही सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची ९८ टक्के कामे पूर्ण असल्याचा अहवाल दहा वर्षापूर्वीच शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागास सादर केल्याची माहिती भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाने एका माहिती अधिकार अर्जदाराला दिलेल्या उत्तराद्वारे मिळाली आहे.  

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अहवालामुळेच चिंचोटी अंजूरफाटा माणकोली रस्त्याची सध्या दुरावस्था झाली असल्याचे वास्तव समोर आले आहे. भिवंडीत चिंचोटी-अंजुफाटा ते माणकोली असे रस्ता रुंदीकरणाच काम हे  बी. ओ. टी. तत्वावर सुरुवातीला मे.भारत उद्योग लिमिटेड या कंपनीने घेतले होते. भारत उद्योग कंपनीने रस्त्याची कामे अपूर्ण ठेवल्यांनंतर व रस्त्याची झालेल्या दुरवस्थेमुळे हा ठेका भरड उद्योग कंपनीने सुप्रीम कंपनीला दिला. सध्या सुप्रीम कंपनी या रस्त्यावर टोल वसुली करत आहे. चिंचोटी अंजूरफाटा ते मानकोली या रस्ता रुंदीकरण कामाला २८ ऑगस्ट २००९ पासून सुरुवात करण्यात आली होती. हे काम पूर्ण करण्यासाठी शासनाने कंपनीला २ वर्ष ६ महिन्यांचा कालावधी दिला होता. परंतु ही अडीच वर्षांची मुदत पूर्ण होऊनही कंपनीने रस्त्याची आवश्यक असलेली बरीचशी कामे आजपर्यंत अपूर्ण ठेवलेली आहेत. 

विशेष म्हणजे कामे अपूर्ण असूनही या कंपनीने १९ जानेवारी २०१२ पासून मोठ्या प्रमाणात टोल वसूल करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे कंपनीला टोल वसूल करण्याचा कंत्राट हा तब्बल २४ वर्ष ३ महिन्यांकरता देण्यात आला आहे, परंतु टोल वसुली सुरू केल्यापासूनच या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तर आजही अनेक कामे अपूर्ण आहेत, त्यामुळे कंपनीने केलेल्या या कामाच्या गुणवत्ते बाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे एवढे होऊनही कंपनीने केलेल्या कामाची गुणवत्ता योग्यच आहे व रस्त्याची ९८ टक्के कामे पूर्ण असल्याचा लेखी खुलासा व खळबळजनक माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिवंडी कार्यालयातून मिळाली आहे . 

विशेष म्हणजे या रस्त्यांची बरीचशी कामे अजूनही अपूर्ण आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेली हि उत्तरे कंपनी व अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध जोपासणारी असल्यासारखी असल्याने शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभागच टोलवसुली करणाऱ्या कंपनीस पाठीशी घालत असल्यासारखे वाटत असल्याने या संपूर्ण कामाची व सार्वजनिक बांधकाम विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांची खाते निहाय चौकशी करावी, अशी मागणी गाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.  

टॅग्स :thaneठाणेroad safetyरस्ते सुरक्षाbhiwandiभिवंडी