शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भिवंडीत रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष, कंपनी दहा वर्षांपासून करतेय टोल वसुली    

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 17:14 IST

विशेष म्हणजे कामे अपूर्ण असूनही या कंपनीने १९ जानेवारी २०१२ पासून मोठ्या प्रमाणात टोल वसूल करण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देभिवंडीत चिंचोटी-अंजुफाटा ते माणकोली असे रस्ता रुंदीकरणाच काम हे  बी. ओ. टी. तत्वावर सुरुवातीला मे.भारत उद्योग लिमिटेड या कंपनीने घेतले होते.

भिवंडीभिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या दुरावस्था झाली आहे. त्यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या रस्त्याकडे पुरते दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची बरीचशी कामे अपूर्ण असतांनाही सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची ९८ टक्के कामे पूर्ण असल्याचा अहवाल दहा वर्षापूर्वीच शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागास सादर केल्याची माहिती भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाने एका माहिती अधिकार अर्जदाराला दिलेल्या उत्तराद्वारे मिळाली आहे.  

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अहवालामुळेच चिंचोटी अंजूरफाटा माणकोली रस्त्याची सध्या दुरावस्था झाली असल्याचे वास्तव समोर आले आहे. भिवंडीत चिंचोटी-अंजुफाटा ते माणकोली असे रस्ता रुंदीकरणाच काम हे  बी. ओ. टी. तत्वावर सुरुवातीला मे.भारत उद्योग लिमिटेड या कंपनीने घेतले होते. भारत उद्योग कंपनीने रस्त्याची कामे अपूर्ण ठेवल्यांनंतर व रस्त्याची झालेल्या दुरवस्थेमुळे हा ठेका भरड उद्योग कंपनीने सुप्रीम कंपनीला दिला. सध्या सुप्रीम कंपनी या रस्त्यावर टोल वसुली करत आहे. चिंचोटी अंजूरफाटा ते मानकोली या रस्ता रुंदीकरण कामाला २८ ऑगस्ट २००९ पासून सुरुवात करण्यात आली होती. हे काम पूर्ण करण्यासाठी शासनाने कंपनीला २ वर्ष ६ महिन्यांचा कालावधी दिला होता. परंतु ही अडीच वर्षांची मुदत पूर्ण होऊनही कंपनीने रस्त्याची आवश्यक असलेली बरीचशी कामे आजपर्यंत अपूर्ण ठेवलेली आहेत. 

विशेष म्हणजे कामे अपूर्ण असूनही या कंपनीने १९ जानेवारी २०१२ पासून मोठ्या प्रमाणात टोल वसूल करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे कंपनीला टोल वसूल करण्याचा कंत्राट हा तब्बल २४ वर्ष ३ महिन्यांकरता देण्यात आला आहे, परंतु टोल वसुली सुरू केल्यापासूनच या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तर आजही अनेक कामे अपूर्ण आहेत, त्यामुळे कंपनीने केलेल्या या कामाच्या गुणवत्ते बाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे एवढे होऊनही कंपनीने केलेल्या कामाची गुणवत्ता योग्यच आहे व रस्त्याची ९८ टक्के कामे पूर्ण असल्याचा लेखी खुलासा व खळबळजनक माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिवंडी कार्यालयातून मिळाली आहे . 

विशेष म्हणजे या रस्त्यांची बरीचशी कामे अजूनही अपूर्ण आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेली हि उत्तरे कंपनी व अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध जोपासणारी असल्यासारखी असल्याने शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभागच टोलवसुली करणाऱ्या कंपनीस पाठीशी घालत असल्यासारखे वाटत असल्याने या संपूर्ण कामाची व सार्वजनिक बांधकाम विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांची खाते निहाय चौकशी करावी, अशी मागणी गाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.  

टॅग्स :thaneठाणेroad safetyरस्ते सुरक्षाbhiwandiभिवंडी