शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात

By नितीन पंडित | Updated: May 17, 2024 20:58 IST

'या देशातील मंदिर मस्जिद सुरक्षित ठेवणे हे सर्वांची जबाबदारी, भाजपा दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.'

भिवंडी: देशाची राज्यघटना बदलण्यासाठी ४०० पार चा नारा देणाऱ्या भाजपाच्या एकाधिकारशाहीला संपवण्याची गरज आहे,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेतील उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या प्रचारासाठी पोगावं येथे आयोजित परिवर्तन सभेत बोलत होते. या सभेस दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्लीचे खासदार संजय सिंह,खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड,अनिल देशमुख,राजेश टोपे,आरपीआय सेक्युलरचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड, समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख, ठाकरे गटाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे,भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे,जिल्हा प्रमुख विश्वास थळे,काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहीर यांसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

या देशातील मंदिर मस्जिद सुरक्षित ठेवणे हे सर्वांची जबाबदारी असताना भाजपा जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील पवारांनी केला.

निवडणुकीत पराभव समोर दिसत असताना मोदी यांनी खोट्या केसेस मध्ये अडकवून मला कारागृहात टाकले,जामिनावर बाहेर असताना दिवसरात्र मेहनत करून २१ दिवसात भाजपाला पराभूत करूनच कारागृहात परत जाईल असा निर्धार व्यक्त करीत देशाला वाचविण्यासाठी मतदानाची भिक मागण्यासाठी मी भिवंडीत आलो आहे असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.दिल्लीत गरिबांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण, मोफत वीज,मोफत रुग्णालय उपचार मोफत औषध देण्याचे काम आम्ही करतो दिल्लीमध्ये ५०० मोहल्ला क्लिनिक बनवल्या मोदी यांनी देशभरात ५ हजार मोहल्ला क्लिनिक सुरू केल्या असता तर त्यांचा सन्मान केला असता.

रशियाचा नेता पुतीन याने विरोधकांना मारले कारागृहात टाकले,बांगलादेश व पाकिस्तान मध्ये सुध्दा असेच करुंन सत्ता हस्तगत केली ,भारताकडून जग शिकते पण मोदी बांगलादेश पाकिस्तान यांच्या कडून शिकून तसेच काम भारतात करू इच्छितात असा आरोप केजरीवाल यांनी यावेळी केला.नरेंद्र मोदी हे भयग्रस्त असून पक्षात ७५ वर्षांवरील नेत्यांना राजकारणातून निवृत्ती देणारे मोदी देखील पुढील वर्षी ७५ वर्षांचे होणार असल्याने ते मत मागत आहेत ते अमित शहा यांना प्रधानमंत्री बनवण्यासाठी असा आरोप देखील केजरीवाल यांनी केला.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sharad Pawarशरद पवारMumbaiमुंबई