शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात

By नितीन पंडित | Updated: May 17, 2024 20:58 IST

'या देशातील मंदिर मस्जिद सुरक्षित ठेवणे हे सर्वांची जबाबदारी, भाजपा दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.'

भिवंडी: देशाची राज्यघटना बदलण्यासाठी ४०० पार चा नारा देणाऱ्या भाजपाच्या एकाधिकारशाहीला संपवण्याची गरज आहे,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेतील उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या प्रचारासाठी पोगावं येथे आयोजित परिवर्तन सभेत बोलत होते. या सभेस दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्लीचे खासदार संजय सिंह,खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड,अनिल देशमुख,राजेश टोपे,आरपीआय सेक्युलरचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड, समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख, ठाकरे गटाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे,भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे,जिल्हा प्रमुख विश्वास थळे,काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहीर यांसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

या देशातील मंदिर मस्जिद सुरक्षित ठेवणे हे सर्वांची जबाबदारी असताना भाजपा जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील पवारांनी केला.

निवडणुकीत पराभव समोर दिसत असताना मोदी यांनी खोट्या केसेस मध्ये अडकवून मला कारागृहात टाकले,जामिनावर बाहेर असताना दिवसरात्र मेहनत करून २१ दिवसात भाजपाला पराभूत करूनच कारागृहात परत जाईल असा निर्धार व्यक्त करीत देशाला वाचविण्यासाठी मतदानाची भिक मागण्यासाठी मी भिवंडीत आलो आहे असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.दिल्लीत गरिबांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण, मोफत वीज,मोफत रुग्णालय उपचार मोफत औषध देण्याचे काम आम्ही करतो दिल्लीमध्ये ५०० मोहल्ला क्लिनिक बनवल्या मोदी यांनी देशभरात ५ हजार मोहल्ला क्लिनिक सुरू केल्या असता तर त्यांचा सन्मान केला असता.

रशियाचा नेता पुतीन याने विरोधकांना मारले कारागृहात टाकले,बांगलादेश व पाकिस्तान मध्ये सुध्दा असेच करुंन सत्ता हस्तगत केली ,भारताकडून जग शिकते पण मोदी बांगलादेश पाकिस्तान यांच्या कडून शिकून तसेच काम भारतात करू इच्छितात असा आरोप केजरीवाल यांनी यावेळी केला.नरेंद्र मोदी हे भयग्रस्त असून पक्षात ७५ वर्षांवरील नेत्यांना राजकारणातून निवृत्ती देणारे मोदी देखील पुढील वर्षी ७५ वर्षांचे होणार असल्याने ते मत मागत आहेत ते अमित शहा यांना प्रधानमंत्री बनवण्यासाठी असा आरोप देखील केजरीवाल यांनी केला.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sharad Pawarशरद पवारMumbaiमुंबई