शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

समाजाला समृद्ध करणाऱ्या ग्रंथांची गरज ! - डॉ. अनंत देशमुख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 16:59 IST

 'प्रतिसादाचे हुंकार' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी डॉ. अनंत देशमुख उपस्थित होते. 

ठळक मुद्देसमाजाला समृद्ध करणाऱ्या ग्रंथांची गरज ! - डॉ. अनंत देशमुख 'प्रतिसादाचे हुंकार' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा लेखक जगाकडे फक्त स्वतःच्या डोळ्यांनी नाही तर दृष्टीने पाहत असतो : प्रा. प्रदीप ढवळ

ठाणे : समाजाचे अंतर्मन ढवळून काढून सामाजिक समरसतेचा  नवा आदर्श निर्माण करणाऱ्या,  समाजाला समृद्ध करणाऱ्या ग्रंथांची गरज असल्याचे मत  मराठी साहित्याचे गाढ़े अभ्यासक डॉ . अनंत देशमुख यांनी व्यक्त केले.  शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या लेखिका यामिनी पानगावकर यांच्या  'प्रतिसादाचे हुंकार' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्ष  म्हणून बोलत होते .

       यावेळी व्यासपीठावर लेखक  डॉ. प्रदीप ढवळ,  आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ख्यातनाम चित्रकार विजयराज बोधनकर , सामाजिक कार्यकर्ते विलास ठुसे , अत्रे कट्टयाच्या निर्मात्या विदुला ठुसे ,प्रकाशक प्रा. संतोष राणे , प्रा. प्रज्ञा पंडित इत्यादी मान्यवर उपस्थित होते . प्रकाशन सोहळा ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल  महाविद्यालयात  संपन्न झाला .कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनंत देशमुख यांनी आपल्या भाषणात यामिनी ताईंच्या वाचन सातत्याचं आणि गांभीर्याचं  कौतुक केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "जे वाचक वाचन, आस्वाद, आकलन आणि मूल्यमापन हे चारही टप्पे पार करतात तेच चांगले समीक्षक होऊ शकतात."  फक्त वाचनापुरतं मर्यादित न राहता, समिक्षक विषयाचा सखोल अभ्यास करतात आणि त्यांच्या लिखाणातून पुस्तकाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन जगाला देत असतात, असंही ते म्हणाले.  चित्रकार विजयराज बोधनकर आपले मनोगत व्यक्त करताना  म्हणाले, "आर्थिक परिस्थिती, वय, टक्के ह्या अशा चुकीच्या अनेक चौकटी आपण आपल्यासाठी लावून घेत असतो आणि त्यातून बाहेर पडत प्रत्येकाने व्यक्त झाले पाहिजे तरच त्यातूनच चांगले लेखक तयार होतील." व्यक्त होताना प्रत्येकानं आपल्या मातृभाषेलाच प्राधान्य द्यावे असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. " लेखक जगाकडे फक्त स्वतःच्या डोळ्यांनी नाही तर दृष्टीने पाहत असतो आणि म्हणूनच त्याला एक वेगळी अनुभूती येते आणि त्यातून एक दर्जेदार साहित्यकृती निर्माण होते. ती दृष्टी यामिनीताईंकडे आहे आणि म्हणूनच हे पुस्तक निश्चित वाचनीय असेल " असा विश्वास डॉ. प्रा. प्रदीप ढवळ यांनी या प्रकाशन सोहळ्यातील आपल्या मनोगतात व्यक्त केला. लेखिका यामिनी पानगावकर यांनीही ' रसिक प्रेक्षक - वाचकांच्या प्रतिसादाने आपण भारावून गेलो आहोत असे मनोगत व्यक्त केले. पुढे त्या असेही म्हणाल्या की वाचकांचे प्रेम आणि प्रतिसाद त्यांना यापुढेही अधिकाधिक सकस लेखन करण्यासाठी प्रोत्साहित करणारा आहे.

             कार्यक्रमाचा समारोप विलास ठूसे ह्यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने झाला.  विलास ठूसे व विदुला ठुसे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक