शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका हवी; पवारांकडे मागणी; आव्हाडांना दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 01:08 IST

राष्ट्रवादी काँग्रेसनेही वेधले लक्ष

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, या मागणीसाठी सरकारदरबारी आपण आग्रही असल्याचे मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतलेल्या जाहीर सभेत स्पष्ट केले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते डॉ. वंडार पाटील आणि राष्ट्रवादी युवक काँग्र्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनीही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना गावे वगळण्याबाबत निवेदन पाठविले आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले.

कल्याण तालुक्यातील २७ गावांचा विकास करण्यासाठी ही गावे केडीएमसीत समाविष्ट करण्यात आली. परंतु, महापालिकेचा नियोजनशून्य कारभार, भ्रष्टाचार, मालमत्ता वाढीव कर व शेतजमिनींवरील आरक्षणाच्या मुद्यावर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर १२ जुलै २००२ ला ही गावे महापालिकेतून वगळून ग्रामपंचायती स्थापन झाल्या. परंतु, राज्य सरकारच्या १४ मे २०१५ च्या अधिसूचनेनुसार ही २७ गावे कुणाचीही मागणी नसताना पुन्हा केडीएमसीत समाविष्ट करण्यात आली. तत्पूर्वी २७ गावांतील ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी ठरावांद्वारे या महापालिकेस कडाडून विरोध केला होता, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी, यासाठी ७ सप्टेंबर २०१५ ला अधिसूचना प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी हजारोंच्या संख्येने सूचना प्राप्त झाल्या होत्या. मात्र, विभागीय आयुक्तांनी आजपर्यंत सुनावणी न घेतल्यामुळे स्वतंत्र नगरपालिकेचा विषय प्रलंबित राहिला आहे. या अधिसूचनेच्या हरकती, सूचनांनुसार सुनावणी होत नाही, याविषयी विधिमंडळ अधिवेशन काळातही सभागृहात चर्चा झाल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. केवळ राजकीय स्वार्थापायी गावांना केडीएमसीत समाविष्ट केल्याचा आरोप पाटील यांचा आहे. २७ गावांच्या विकासासाठी ही गावे या महापालिकेतून वेगळी करणे अनिवार्य आहे, अशी मागणी पाटील यांनी निवेदनात केली आहे.

पाटील यांनी आव्हाड यांना निवेदन दिले. त्यावेळी माजी खासदार व राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि आ. जगन्नाथ शिंदे उपस्थित होते. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठविली आहे.

आव्हाड यांचा केला सत्कार

गृहनिर्माणमंत्रीपदी आव्हाड यांची निवड झाल्याबद्दल वंडार पाटील आणि सुधीर पाटील यांच्या वतीने पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारRaju Patilराजू पाटीलdombivaliडोंबिवली