शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका हवी; पवारांकडे मागणी; आव्हाडांना दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 01:08 IST

राष्ट्रवादी काँग्रेसनेही वेधले लक्ष

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, या मागणीसाठी सरकारदरबारी आपण आग्रही असल्याचे मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतलेल्या जाहीर सभेत स्पष्ट केले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते डॉ. वंडार पाटील आणि राष्ट्रवादी युवक काँग्र्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनीही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना गावे वगळण्याबाबत निवेदन पाठविले आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले.

कल्याण तालुक्यातील २७ गावांचा विकास करण्यासाठी ही गावे केडीएमसीत समाविष्ट करण्यात आली. परंतु, महापालिकेचा नियोजनशून्य कारभार, भ्रष्टाचार, मालमत्ता वाढीव कर व शेतजमिनींवरील आरक्षणाच्या मुद्यावर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर १२ जुलै २००२ ला ही गावे महापालिकेतून वगळून ग्रामपंचायती स्थापन झाल्या. परंतु, राज्य सरकारच्या १४ मे २०१५ च्या अधिसूचनेनुसार ही २७ गावे कुणाचीही मागणी नसताना पुन्हा केडीएमसीत समाविष्ट करण्यात आली. तत्पूर्वी २७ गावांतील ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी ठरावांद्वारे या महापालिकेस कडाडून विरोध केला होता, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी, यासाठी ७ सप्टेंबर २०१५ ला अधिसूचना प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी हजारोंच्या संख्येने सूचना प्राप्त झाल्या होत्या. मात्र, विभागीय आयुक्तांनी आजपर्यंत सुनावणी न घेतल्यामुळे स्वतंत्र नगरपालिकेचा विषय प्रलंबित राहिला आहे. या अधिसूचनेच्या हरकती, सूचनांनुसार सुनावणी होत नाही, याविषयी विधिमंडळ अधिवेशन काळातही सभागृहात चर्चा झाल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. केवळ राजकीय स्वार्थापायी गावांना केडीएमसीत समाविष्ट केल्याचा आरोप पाटील यांचा आहे. २७ गावांच्या विकासासाठी ही गावे या महापालिकेतून वेगळी करणे अनिवार्य आहे, अशी मागणी पाटील यांनी निवेदनात केली आहे.

पाटील यांनी आव्हाड यांना निवेदन दिले. त्यावेळी माजी खासदार व राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि आ. जगन्नाथ शिंदे उपस्थित होते. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठविली आहे.

आव्हाड यांचा केला सत्कार

गृहनिर्माणमंत्रीपदी आव्हाड यांची निवड झाल्याबद्दल वंडार पाटील आणि सुधीर पाटील यांच्या वतीने पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारRaju Patilराजू पाटीलdombivaliडोंबिवली