शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
4
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
5
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
6
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
7
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
8
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
9
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
10
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
11
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
12
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
13
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
14
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
15
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
16
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
17
Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!
18
Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : रिझवानची 'उचलबांगडी'; आफ्रिदीच्या डोईवर 'कॅप्टन्सीचा ताज'
19
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
20
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी

२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका हवी; पवारांकडे मागणी; आव्हाडांना दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 01:08 IST

राष्ट्रवादी काँग्रेसनेही वेधले लक्ष

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, या मागणीसाठी सरकारदरबारी आपण आग्रही असल्याचे मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतलेल्या जाहीर सभेत स्पष्ट केले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते डॉ. वंडार पाटील आणि राष्ट्रवादी युवक काँग्र्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनीही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना गावे वगळण्याबाबत निवेदन पाठविले आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले.

कल्याण तालुक्यातील २७ गावांचा विकास करण्यासाठी ही गावे केडीएमसीत समाविष्ट करण्यात आली. परंतु, महापालिकेचा नियोजनशून्य कारभार, भ्रष्टाचार, मालमत्ता वाढीव कर व शेतजमिनींवरील आरक्षणाच्या मुद्यावर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर १२ जुलै २००२ ला ही गावे महापालिकेतून वगळून ग्रामपंचायती स्थापन झाल्या. परंतु, राज्य सरकारच्या १४ मे २०१५ च्या अधिसूचनेनुसार ही २७ गावे कुणाचीही मागणी नसताना पुन्हा केडीएमसीत समाविष्ट करण्यात आली. तत्पूर्वी २७ गावांतील ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी ठरावांद्वारे या महापालिकेस कडाडून विरोध केला होता, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी, यासाठी ७ सप्टेंबर २०१५ ला अधिसूचना प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी हजारोंच्या संख्येने सूचना प्राप्त झाल्या होत्या. मात्र, विभागीय आयुक्तांनी आजपर्यंत सुनावणी न घेतल्यामुळे स्वतंत्र नगरपालिकेचा विषय प्रलंबित राहिला आहे. या अधिसूचनेच्या हरकती, सूचनांनुसार सुनावणी होत नाही, याविषयी विधिमंडळ अधिवेशन काळातही सभागृहात चर्चा झाल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. केवळ राजकीय स्वार्थापायी गावांना केडीएमसीत समाविष्ट केल्याचा आरोप पाटील यांचा आहे. २७ गावांच्या विकासासाठी ही गावे या महापालिकेतून वेगळी करणे अनिवार्य आहे, अशी मागणी पाटील यांनी निवेदनात केली आहे.

पाटील यांनी आव्हाड यांना निवेदन दिले. त्यावेळी माजी खासदार व राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि आ. जगन्नाथ शिंदे उपस्थित होते. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठविली आहे.

आव्हाड यांचा केला सत्कार

गृहनिर्माणमंत्रीपदी आव्हाड यांची निवड झाल्याबद्दल वंडार पाटील आणि सुधीर पाटील यांच्या वतीने पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारRaju Patilराजू पाटीलdombivaliडोंबिवली