शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

महापालिका बरखास्त करण्याची राष्ट्रवादीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 17:32 IST

स्थायी समिती सदस्यांची निवड चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याच्या विरोधात राष्ट्रवादीने आवाज उठविला आहे. या विरोधात आता न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तर महापालिका बरखास्त करतांनाच उपमहापौरांचे पदही रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देउपमहापौरांचे पद रद्द कराप्रशासन सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले

ठाणे - स्थायी समितीमध्ये पुन्हा सत्ताधारी शिवसेनेने चुकीच्या पध्दतीने सदस्यांची निवड केली आहे. यामध्ये भाजपने सुध्दा त्यांना साथ दिली आहे. परंतु हे केवळ आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच जाणून बुजुन ही निवड करण्यात येऊन यातून केवळ निवडणुकीसाठी पैसा गोळा करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी आखला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच या निवडीबाबत उपमहापौरांनीसुध्दा आक्षेप घेतला नसल्याने त्यांचे पद रद्द करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. मागील २०१२ पासून शिवसेनेकडून अशा पध्दतीने चुकीचा कारभार केला जात असल्याने महापालिकाच बरखास्त करण्यात यावी अशी मागणीही शासनाकडे केली जाणार असून याविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.              ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश सरचिटणीस सुहास देसाई, शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील उपस्थित होते. स्थायी समिती सदस्यांची निवड मागील आठवड्यात करण्यात आली. परंतु शिवसेनेने पुन्हा चुकीच्या पध्दतीने ही निवड केली असल्याचा आरोप करीत यामध्ये प्रशासनसुध्दा सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. २०१२ पासून सत्ताधारी चुकीच्या पध्दतीने कायद्याची पायमल्ली करीत असून शासनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता ज्या पध्दतीने स्थायी समिती गठीत करण्यात आली आहे, त्याविरोधात आम्ही आवाज उठविणार हे सुध्दा सत्ताधाऱ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे स्थायी समितीचे घोंगडे भिजत ठेवून सर्व प्रस्ताव महासभेच्या पटलावर नेऊन तेसुध्दा गाई गडबडीत, गोंधळात मंजुर करण्याचा घाट टेंभी नाक्यावरील आदेशावरुन केला जाणार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे स्थायीचा जो चुकीचा ठराव झालेला आहे, तो मंजूर करायचा की नाही, याबाबतची भुमिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना घ्यायची असून त्यांनी सत्ताधाऱ्यांचा हा डाव उधळून लावला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान स्थायी समिती सदस्यांची निवड करतांना, उपमहापौरांनी चुकीच्या पध्दतीने नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे त्यांचे पद रद्द करण्यात यावे आणि सत्ताधाऱ्यांकडून जी काही कायद्याची पायमल्ली केली जात आहे, त्यानुसार महापालिकाच बरखास्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस