शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका बरखास्त करण्याची राष्ट्रवादीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 17:32 IST

स्थायी समिती सदस्यांची निवड चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याच्या विरोधात राष्ट्रवादीने आवाज उठविला आहे. या विरोधात आता न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तर महापालिका बरखास्त करतांनाच उपमहापौरांचे पदही रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देउपमहापौरांचे पद रद्द कराप्रशासन सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले

ठाणे - स्थायी समितीमध्ये पुन्हा सत्ताधारी शिवसेनेने चुकीच्या पध्दतीने सदस्यांची निवड केली आहे. यामध्ये भाजपने सुध्दा त्यांना साथ दिली आहे. परंतु हे केवळ आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच जाणून बुजुन ही निवड करण्यात येऊन यातून केवळ निवडणुकीसाठी पैसा गोळा करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी आखला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच या निवडीबाबत उपमहापौरांनीसुध्दा आक्षेप घेतला नसल्याने त्यांचे पद रद्द करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. मागील २०१२ पासून शिवसेनेकडून अशा पध्दतीने चुकीचा कारभार केला जात असल्याने महापालिकाच बरखास्त करण्यात यावी अशी मागणीही शासनाकडे केली जाणार असून याविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.              ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश सरचिटणीस सुहास देसाई, शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील उपस्थित होते. स्थायी समिती सदस्यांची निवड मागील आठवड्यात करण्यात आली. परंतु शिवसेनेने पुन्हा चुकीच्या पध्दतीने ही निवड केली असल्याचा आरोप करीत यामध्ये प्रशासनसुध्दा सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. २०१२ पासून सत्ताधारी चुकीच्या पध्दतीने कायद्याची पायमल्ली करीत असून शासनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता ज्या पध्दतीने स्थायी समिती गठीत करण्यात आली आहे, त्याविरोधात आम्ही आवाज उठविणार हे सुध्दा सत्ताधाऱ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे स्थायी समितीचे घोंगडे भिजत ठेवून सर्व प्रस्ताव महासभेच्या पटलावर नेऊन तेसुध्दा गाई गडबडीत, गोंधळात मंजुर करण्याचा घाट टेंभी नाक्यावरील आदेशावरुन केला जाणार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे स्थायीचा जो चुकीचा ठराव झालेला आहे, तो मंजूर करायचा की नाही, याबाबतची भुमिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना घ्यायची असून त्यांनी सत्ताधाऱ्यांचा हा डाव उधळून लावला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान स्थायी समिती सदस्यांची निवड करतांना, उपमहापौरांनी चुकीच्या पध्दतीने नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे त्यांचे पद रद्द करण्यात यावे आणि सत्ताधाऱ्यांकडून जी काही कायद्याची पायमल्ली केली जात आहे, त्यानुसार महापालिकाच बरखास्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस