शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

महापालिका बरखास्त करण्याची राष्ट्रवादीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 17:32 IST

स्थायी समिती सदस्यांची निवड चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याच्या विरोधात राष्ट्रवादीने आवाज उठविला आहे. या विरोधात आता न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तर महापालिका बरखास्त करतांनाच उपमहापौरांचे पदही रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देउपमहापौरांचे पद रद्द कराप्रशासन सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले

ठाणे - स्थायी समितीमध्ये पुन्हा सत्ताधारी शिवसेनेने चुकीच्या पध्दतीने सदस्यांची निवड केली आहे. यामध्ये भाजपने सुध्दा त्यांना साथ दिली आहे. परंतु हे केवळ आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच जाणून बुजुन ही निवड करण्यात येऊन यातून केवळ निवडणुकीसाठी पैसा गोळा करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी आखला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच या निवडीबाबत उपमहापौरांनीसुध्दा आक्षेप घेतला नसल्याने त्यांचे पद रद्द करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. मागील २०१२ पासून शिवसेनेकडून अशा पध्दतीने चुकीचा कारभार केला जात असल्याने महापालिकाच बरखास्त करण्यात यावी अशी मागणीही शासनाकडे केली जाणार असून याविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.              ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश सरचिटणीस सुहास देसाई, शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील उपस्थित होते. स्थायी समिती सदस्यांची निवड मागील आठवड्यात करण्यात आली. परंतु शिवसेनेने पुन्हा चुकीच्या पध्दतीने ही निवड केली असल्याचा आरोप करीत यामध्ये प्रशासनसुध्दा सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. २०१२ पासून सत्ताधारी चुकीच्या पध्दतीने कायद्याची पायमल्ली करीत असून शासनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता ज्या पध्दतीने स्थायी समिती गठीत करण्यात आली आहे, त्याविरोधात आम्ही आवाज उठविणार हे सुध्दा सत्ताधाऱ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे स्थायी समितीचे घोंगडे भिजत ठेवून सर्व प्रस्ताव महासभेच्या पटलावर नेऊन तेसुध्दा गाई गडबडीत, गोंधळात मंजुर करण्याचा घाट टेंभी नाक्यावरील आदेशावरुन केला जाणार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे स्थायीचा जो चुकीचा ठराव झालेला आहे, तो मंजूर करायचा की नाही, याबाबतची भुमिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना घ्यायची असून त्यांनी सत्ताधाऱ्यांचा हा डाव उधळून लावला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान स्थायी समिती सदस्यांची निवड करतांना, उपमहापौरांनी चुकीच्या पध्दतीने नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे त्यांचे पद रद्द करण्यात यावे आणि सत्ताधाऱ्यांकडून जी काही कायद्याची पायमल्ली केली जात आहे, त्यानुसार महापालिकाच बरखास्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस