शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

राष्ट्रवादी महिला काँग्रेसने ठाण्यात जाळली ईव्हीएम आणि मनुस्मृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:53 IST

राष्ट्रवादी काँग्रेससह १७ राजकीय पक्षांनी ईव्हीएम हटाओची मागणी केली आहे. निवडणूक आयोग मात्र ती मान्य करायला तयार नाही. निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या हातचे बाहुले झाले आहे, असा घाणाघाती आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान यांनी ठाण्यात केला.

ठळक मुद्देनिवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुलेमाजी मंत्री फौजिया खान यांचा आरोपठाण्यातील महिला मेळाव्याला उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मतदानाच्या ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करूनच भाजप सत्तेमध्ये येत आहे. जिथे इव्हीमचे घोटाळे तिथेच भाजपाची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह १७ राजकीय पक्षांनी ईव्हीएम हटाओची मागणी केली आहे. निवडणूक आयोग मात्र ती मान्य करायला तयार नाही. निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या हातचे बाहुले झाले आहे, असा घाणाघाती आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान यांनी ठाण्यात केला. खान यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी ईव्हीएम आणि मनुस्मृतीच्या प्रतींचे दहन केले.येत्या ५ डिसेंबर रोजी रोहा येथे संविधान बचाओ परिषद आयोजित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी कळवा येथे राष्टÑवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना फौजिया खान यांनी हा आरोप केला. यावेळी आमदार विद्या चव्हाण, सुरेखा ठाकरे, राजश्री भोसले, ऋता आव्हाड, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, सरचिटणीस प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.खान म्हणाल्या की, या देशामध्ये आराजकता माजली आहे. कितीही मोर्चा-आंदोलने केली, तरी हे सरकार कोणाचेही ऐकत नाही. मराठा समाजापुढे हे सरकार झुकले असले तरी सबका साथ, सबका विकास असे म्हणणारे मोदी-फडणवीस हे धनगर आणि मुस्लीम समाजावर अन्याय करीत आहेत. संविधानाने समताधिष्ठीत व्यवस्था लागू केली आहे. तरीही आरक्षणाच्या बाबतीत हे सरकार दोन समाजांवर अन्याय करीत आहे. या सरकारला हिंदुत्वाच्या नावाखाली मनुवादी व्यवस्था आणायची आहे. दोन धर्मियांमध्ये दंगे घडवायचे आहेत, असाही आरोप त्यांनी केला. हुकूमशाही लादून संविधान संपवायचे आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही. ज्या मनुस्मृतीने येथे वर्णव्यवस्था लादली होती, ती मनुस्मृती दूर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचे राज्य आणले होते. मात्र आताच्या सरकारला हे राज्य नको आहे. मंदिर- मस्जिद आणि शहरांची नावे बदलवून मूळ विकासाचे मुद्दे बाजूला सारत आहेत. त्यामुळे आता हे सरकार बदलण्याची जबाबदारी आपली आहे. आता आपण नोकरी, आरोग्य , शिक्षण याबाबत प्रश्न विचारले पाहिजेत. त्यासाठी महिलांनी आक्रमक होण्याची गरज आहे, असेही त्यांनी आवाहन केले.आमदार विद्या चव्हाण यांनीं, देवेंद्र -नरेंद्र यांच्यामुळे या देशाच्या संविधानाला धोका निर्माण झाल्याचा आरोप केला. जंतर मंतरवर संविधान जाळण्यापर्यंत लोकांची मजल जाते .हे सरकार त्यांना अभय देत आहे. संविधानामुळे या देशातील महिलांना स्वातंत्र्य मिळाले आहे. पण हे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. सनातन, आर एस एस आणि भाजप यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली. हे लोक अधिवेशन सोडून अयोध्येत मंदिर बांधायला जात आहेत. पण, आम्ही त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.राष्टÑवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि ऋता आव्हाड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.या मेळाव्यास नगरसेविका राधाबाई जाधवर, वहिदा खान, अंकिता शिंदे, वनिता घोगरे, अपर्णा साळवी, प्रमिला केणी, वर्षा मोरे, आरती गायकवाड, आशरीन राऊत, अनिता किणे, फरजाना शेख, सुनिता सातपुते, मनाली पाटील, सुजाता घाग, युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्षा रिनी रजिवी, शहर उपाध्यक्ष वंदना जाधव, महिला पदाधिकारी मेहरबानो पटेल यांच्यासह शेकडो महिला यावेळी उपस्थित होत्या.दरम्यान, हा मेळावा संपल्यानंतर महिलांनी सत्ताधा-यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करीत ईव्हीएमच्या प्रतिकांचे आणि मनुस्मृतीच्या प्रतींचे दहन केले.

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस