शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

रात्रीतल्या काजव्यांनी सूर्याबद्दल बोलू नये; राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा टोला

By अजित मांडके | Updated: January 2, 2024 16:16 IST

अजित पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील सूर्य आहेत. लवकरच मकरसंक्रांत येते आहे, सूर्याचे उत्तरायण सुरु होईल आणि सूर्याचे तेजदेखील वाढेल.

ठाणे :अजित पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील सूर्य आहेत. लवकरच मकरसंक्रांत येते आहे, सूर्याचे उत्तरायण सुरु होईल आणि सूर्याचे तेजदेखील वाढेल. त्यामुळे रात्रीतल्या काजव्यांनी सूर्याबद्दल जास्त बोलू नये, असा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला. तसेच डॉ. जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थी, आत्मकेंद्रित असल्याने त्यांना अजित पवारांचा स्वभाव पचनी पडत नसल्याची टीका देखील त्यांनी केली.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नुकतेच बेछूट, बेलगाम आरोप केले. त्याचा अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी समाचार घेतला. 

श्रद्धेय शरदचंद्र पवार यांचे योगदान, मग ते समाजकारणातील असेल, राजकारणातील असेल, ते नाकारण्याचे कुठलेही कारण नाही. ज्यावेळेला अजित पवार १९९१ मध्ये बारामती लोकसभा लढण्याची संधी दिली. त्यानंतर सातत्याने होणाऱ्या प्रत्येक विधानसभेची निवडणूक, बारामती विधानसभेतुन वाढत्या मताधिक्य्याने अजितदादा जिंकत आले आहेत. २०१९ च्या विधानसभेत अजित १ लाख ९५ हजार ६४१ मते मिळाली होती. एकूण मतदानाच्या ८३. २४ टक्के मते ही अजितदादांना मिळाली होती.

यावेळी सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. महाराष्ट्रातल्या २८८ विधानसभा मतदार संघातील सर्वात जास्त मताधिक्य १ लाख ६५ हजार २६५ मतांनी अजितदादा विजयी झाले. त्यामुळे अजितदादांनी केवळ आपले कर्तृत्व बारामती पुरते न मर्यादित ठेवता आपले कर्तृत्व आणि नेतृत्व हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रस्थपित केलेले आहे. पुढे जाऊन डाॅ. जितेंद्र आव्हाड हे देखील बोलले की, अजितदादा हे कायम दादागिरी करतात, अनेक वर्षे ते पक्षामध्ये दादागिरी करत आले आहेत. अजित दादांचा स्वभाव हा रोखठोक आहे. खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे ते स्पष्टपणे सांगतात. एखादे काम जर होणार नसेल तर ते तोंडावर सांगतात की हे काम माझ्याच्याने होणारे नाही.

पण डाॅ जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थी, आत्मकेंद्रित असल्याने कदाचित त्यांना अजितदादांचा स्वभाव पचनी पडत नसल्याची टीका देखील परांजपे यांनी केली. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी देखील कधीतरी आत्मचिंतन करावे की, ठाणे जिल्ह्यातील अनेक चांगली माणसे राष्ट्रवादी काँग्रेस का सोडून गेली. आव्हाडांच्या स्वार्थी राजकारणाला, आत्मकेंद्रित राजकारणाला कंटाळून ठाणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले असल्याचा आरोप देखील परांजपे यांनी यावेळी केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार