शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

रात्रीतल्या काजव्यांनी सूर्याबद्दल बोलू नये; राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा टोला

By अजित मांडके | Updated: January 2, 2024 16:16 IST

अजित पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील सूर्य आहेत. लवकरच मकरसंक्रांत येते आहे, सूर्याचे उत्तरायण सुरु होईल आणि सूर्याचे तेजदेखील वाढेल.

ठाणे :अजित पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील सूर्य आहेत. लवकरच मकरसंक्रांत येते आहे, सूर्याचे उत्तरायण सुरु होईल आणि सूर्याचे तेजदेखील वाढेल. त्यामुळे रात्रीतल्या काजव्यांनी सूर्याबद्दल जास्त बोलू नये, असा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला. तसेच डॉ. जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थी, आत्मकेंद्रित असल्याने त्यांना अजित पवारांचा स्वभाव पचनी पडत नसल्याची टीका देखील त्यांनी केली.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नुकतेच बेछूट, बेलगाम आरोप केले. त्याचा अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी समाचार घेतला. 

श्रद्धेय शरदचंद्र पवार यांचे योगदान, मग ते समाजकारणातील असेल, राजकारणातील असेल, ते नाकारण्याचे कुठलेही कारण नाही. ज्यावेळेला अजित पवार १९९१ मध्ये बारामती लोकसभा लढण्याची संधी दिली. त्यानंतर सातत्याने होणाऱ्या प्रत्येक विधानसभेची निवडणूक, बारामती विधानसभेतुन वाढत्या मताधिक्य्याने अजितदादा जिंकत आले आहेत. २०१९ च्या विधानसभेत अजित १ लाख ९५ हजार ६४१ मते मिळाली होती. एकूण मतदानाच्या ८३. २४ टक्के मते ही अजितदादांना मिळाली होती.

यावेळी सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. महाराष्ट्रातल्या २८८ विधानसभा मतदार संघातील सर्वात जास्त मताधिक्य १ लाख ६५ हजार २६५ मतांनी अजितदादा विजयी झाले. त्यामुळे अजितदादांनी केवळ आपले कर्तृत्व बारामती पुरते न मर्यादित ठेवता आपले कर्तृत्व आणि नेतृत्व हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रस्थपित केलेले आहे. पुढे जाऊन डाॅ. जितेंद्र आव्हाड हे देखील बोलले की, अजितदादा हे कायम दादागिरी करतात, अनेक वर्षे ते पक्षामध्ये दादागिरी करत आले आहेत. अजित दादांचा स्वभाव हा रोखठोक आहे. खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे ते स्पष्टपणे सांगतात. एखादे काम जर होणार नसेल तर ते तोंडावर सांगतात की हे काम माझ्याच्याने होणारे नाही.

पण डाॅ जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थी, आत्मकेंद्रित असल्याने कदाचित त्यांना अजितदादांचा स्वभाव पचनी पडत नसल्याची टीका देखील परांजपे यांनी केली. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी देखील कधीतरी आत्मचिंतन करावे की, ठाणे जिल्ह्यातील अनेक चांगली माणसे राष्ट्रवादी काँग्रेस का सोडून गेली. आव्हाडांच्या स्वार्थी राजकारणाला, आत्मकेंद्रित राजकारणाला कंटाळून ठाणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले असल्याचा आरोप देखील परांजपे यांनी यावेळी केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार