शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

रात्रीतल्या काजव्यांनी सूर्याबद्दल बोलू नये; राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा टोला

By अजित मांडके | Updated: January 2, 2024 16:16 IST

अजित पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील सूर्य आहेत. लवकरच मकरसंक्रांत येते आहे, सूर्याचे उत्तरायण सुरु होईल आणि सूर्याचे तेजदेखील वाढेल.

ठाणे :अजित पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील सूर्य आहेत. लवकरच मकरसंक्रांत येते आहे, सूर्याचे उत्तरायण सुरु होईल आणि सूर्याचे तेजदेखील वाढेल. त्यामुळे रात्रीतल्या काजव्यांनी सूर्याबद्दल जास्त बोलू नये, असा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला. तसेच डॉ. जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थी, आत्मकेंद्रित असल्याने त्यांना अजित पवारांचा स्वभाव पचनी पडत नसल्याची टीका देखील त्यांनी केली.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नुकतेच बेछूट, बेलगाम आरोप केले. त्याचा अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी समाचार घेतला. 

श्रद्धेय शरदचंद्र पवार यांचे योगदान, मग ते समाजकारणातील असेल, राजकारणातील असेल, ते नाकारण्याचे कुठलेही कारण नाही. ज्यावेळेला अजित पवार १९९१ मध्ये बारामती लोकसभा लढण्याची संधी दिली. त्यानंतर सातत्याने होणाऱ्या प्रत्येक विधानसभेची निवडणूक, बारामती विधानसभेतुन वाढत्या मताधिक्य्याने अजितदादा जिंकत आले आहेत. २०१९ च्या विधानसभेत अजित १ लाख ९५ हजार ६४१ मते मिळाली होती. एकूण मतदानाच्या ८३. २४ टक्के मते ही अजितदादांना मिळाली होती.

यावेळी सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. महाराष्ट्रातल्या २८८ विधानसभा मतदार संघातील सर्वात जास्त मताधिक्य १ लाख ६५ हजार २६५ मतांनी अजितदादा विजयी झाले. त्यामुळे अजितदादांनी केवळ आपले कर्तृत्व बारामती पुरते न मर्यादित ठेवता आपले कर्तृत्व आणि नेतृत्व हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रस्थपित केलेले आहे. पुढे जाऊन डाॅ. जितेंद्र आव्हाड हे देखील बोलले की, अजितदादा हे कायम दादागिरी करतात, अनेक वर्षे ते पक्षामध्ये दादागिरी करत आले आहेत. अजित दादांचा स्वभाव हा रोखठोक आहे. खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे ते स्पष्टपणे सांगतात. एखादे काम जर होणार नसेल तर ते तोंडावर सांगतात की हे काम माझ्याच्याने होणारे नाही.

पण डाॅ जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थी, आत्मकेंद्रित असल्याने कदाचित त्यांना अजितदादांचा स्वभाव पचनी पडत नसल्याची टीका देखील परांजपे यांनी केली. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी देखील कधीतरी आत्मचिंतन करावे की, ठाणे जिल्ह्यातील अनेक चांगली माणसे राष्ट्रवादी काँग्रेस का सोडून गेली. आव्हाडांच्या स्वार्थी राजकारणाला, आत्मकेंद्रित राजकारणाला कंटाळून ठाणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले असल्याचा आरोप देखील परांजपे यांनी यावेळी केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार