शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीतल्या काजव्यांनी सूर्याबद्दल बोलू नये; राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा टोला

By अजित मांडके | Updated: January 2, 2024 16:16 IST

अजित पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील सूर्य आहेत. लवकरच मकरसंक्रांत येते आहे, सूर्याचे उत्तरायण सुरु होईल आणि सूर्याचे तेजदेखील वाढेल.

ठाणे :अजित पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील सूर्य आहेत. लवकरच मकरसंक्रांत येते आहे, सूर्याचे उत्तरायण सुरु होईल आणि सूर्याचे तेजदेखील वाढेल. त्यामुळे रात्रीतल्या काजव्यांनी सूर्याबद्दल जास्त बोलू नये, असा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला. तसेच डॉ. जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थी, आत्मकेंद्रित असल्याने त्यांना अजित पवारांचा स्वभाव पचनी पडत नसल्याची टीका देखील त्यांनी केली.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नुकतेच बेछूट, बेलगाम आरोप केले. त्याचा अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी समाचार घेतला. 

श्रद्धेय शरदचंद्र पवार यांचे योगदान, मग ते समाजकारणातील असेल, राजकारणातील असेल, ते नाकारण्याचे कुठलेही कारण नाही. ज्यावेळेला अजित पवार १९९१ मध्ये बारामती लोकसभा लढण्याची संधी दिली. त्यानंतर सातत्याने होणाऱ्या प्रत्येक विधानसभेची निवडणूक, बारामती विधानसभेतुन वाढत्या मताधिक्य्याने अजितदादा जिंकत आले आहेत. २०१९ च्या विधानसभेत अजित १ लाख ९५ हजार ६४१ मते मिळाली होती. एकूण मतदानाच्या ८३. २४ टक्के मते ही अजितदादांना मिळाली होती.

यावेळी सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. महाराष्ट्रातल्या २८८ विधानसभा मतदार संघातील सर्वात जास्त मताधिक्य १ लाख ६५ हजार २६५ मतांनी अजितदादा विजयी झाले. त्यामुळे अजितदादांनी केवळ आपले कर्तृत्व बारामती पुरते न मर्यादित ठेवता आपले कर्तृत्व आणि नेतृत्व हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रस्थपित केलेले आहे. पुढे जाऊन डाॅ. जितेंद्र आव्हाड हे देखील बोलले की, अजितदादा हे कायम दादागिरी करतात, अनेक वर्षे ते पक्षामध्ये दादागिरी करत आले आहेत. अजित दादांचा स्वभाव हा रोखठोक आहे. खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे ते स्पष्टपणे सांगतात. एखादे काम जर होणार नसेल तर ते तोंडावर सांगतात की हे काम माझ्याच्याने होणारे नाही.

पण डाॅ जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थी, आत्मकेंद्रित असल्याने कदाचित त्यांना अजितदादांचा स्वभाव पचनी पडत नसल्याची टीका देखील परांजपे यांनी केली. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी देखील कधीतरी आत्मचिंतन करावे की, ठाणे जिल्ह्यातील अनेक चांगली माणसे राष्ट्रवादी काँग्रेस का सोडून गेली. आव्हाडांच्या स्वार्थी राजकारणाला, आत्मकेंद्रित राजकारणाला कंटाळून ठाणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले असल्याचा आरोप देखील परांजपे यांनी यावेळी केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार