शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या नेत्यांची झाडाझडती, शरद पवार घेणार शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 01:25 IST

सध्या ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार आहेत. मात्र, या लोकसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा वगळता उल्हासनगर, ऐरोली आणि शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पीछेहाट झालेली आहे.

ठाणे : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभांवर आता लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी शनिवारी मुंबई येथील कार्यालयात ते आढावा बैठक घेणार असून लोकसभेतील पराभवावर कारणमीमांसा करण्यासह आगामी विधानसभेच्या मोर्चेबांधणीबाबत पदाधिकाऱ्यांची शाळा घेणार आहेत. या वृत्तास पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी दुजोरा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची ठाणे जिल्ह्यातील कामगिरी सुधारण्यासाठी पवार यांनी आता स्वत: लक्ष देण्याचे ठरवले आहे. यास अनुसरून त्यांनी मंगळवारी हिंदुराव यांच्याकडून जिल्ह्यातील विधानसभानिहाय पक्षाच्या कामकाजाची, राजकीय स्थितीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर, त्यांनी शनिवारी आढावा बैठक घेऊन त्यात सर्वांची झाडाझडती घेत त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामांची जबाबदारी दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाने ठाणे व कल्याण जागा लढवल्या आहेत. त्यांचाही समाचार घेतला जाणार आहे.जिल्ह्यातील १८ मतदारसंघांवर लक्षसध्या ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार आहेत. मात्र, या लोकसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा वगळता उल्हासनगर, ऐरोली आणि शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पीछेहाट झालेली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारालाही पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे पवार यांनी येथे लक्ष केंद्रित केले आहे.यासाठी शनिवारी आढावा बैठकीत जिल्हा कार्यकारिणीची झाडाझडती घेतली जाणार आहे. यानुसार, जिल्ह्यात मोठे यश मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी पक्षाकडून करण्यात येणाºया उपाययोजनांसह प्राथमिक चर्चेवर या बैठकीत भर दिला जाणार असल्याचे हिंदुराव यांनी सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार