शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना अल्झायमर झालाय; राष्ट्रवादीची टीका 

By रणजीत इंगळे | Updated: September 30, 2022 19:30 IST

ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी टीका केली आहे.

ठाणे- खासदार सुप्रियाताई सुळे यांची स्मरणशक्ती वाढविण्याच्या गप्पा मारणाऱ्या नरेश म्हस्के यांनाच स्मृतीभ्रंश झालेला आहे. कारण, त्यांनी सन 2005 मध्ये नारायण राणेंसोबत जाताना  केलेली गद्दारी आणि आपल्याच पक्षाचे रवींद्र फाटक यांना 2014 मध्ये पराभूत करण्यासाठी केलेल्या कुरापती म्हस्के विसरले आहेत. त्यांना अल्झायमर झाला आहे. त्यामुळेच त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचारांची गरज आहे,  असा प्रतिटोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला. 

सुप्रियाताई सुळे यांची स्मरणशक्ती कमजोर झाली असून त्यांना टाॅनिक पाठवू, अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली होती. त्याचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला. परांजपे यांनी, म्हस्के यांचा उल्लेख फुटीर शिंदे गटाचे प्रवक्ते , असा उल्लेख करून सुप्रियाताई सुळे यांची स्मरणशक्ती किती दांडगी आहे, याचा पुरावा संसदेत जाऊन म्हस्के यांनी शोधावा. आपल्या 13 वर्षाच्या कारकीर्दीत त्यांना आठवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावरच लोकांचे सर्वात जास्त प्रश्न संसदेत  मांडणाऱ्या,  सर्वात जास्त चर्चेत सहभागी झालेल्या सुप्रियाताई या महाराष्ट्रातील एकमेव खासदार आहेत. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविला आहे. त्यामुळेच सुप्रियाताई यांच्यावर टीका करणार्‍या नरेश म्हस्के यांच्या बुद्धीची कीव येते, असा टोला परांजपे यांनी हाणला. 

म्हस्के यांना विस्मृतीचा आजार म्हणजेच अल्झायमर झाला आहे, त्यामुळे मला म्हस्केंबद्दल सहानुभूती आहे.  सन 2005 मध्ये नारायण राणे यांच्यासोबत जाऊन म्हस्के यांनी गद्दारी केली होती. ही गद्दारी ते विसरत चालले आहेत. पण, त्यावेळेस राष्ट्रवादीचे नेते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनीच त्यांना क्षणभर विश्रांती या हाॅटेलातून परत आणले. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हस्केंना पुन्हा शिवसेनेत घेतले होते.  त्यानंतर , सन 2014 च्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने म्हस्के हे रुसून घरात बसले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत काढली असली तरी त्यांना जे करायचे होते तेच केले. अन् म्हस्केंनी  शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांना पराभूत केले.   हा सर्व गद्दारीचा इतिहास ते विसरले आहेत. पण, ठाणेकर नागरिक त्यांचा हा इतिहास विसरलेले नाहीत. त्यामुळे म्हस्केंचा अल्झायमर बरा करण्यासाठी आता त्यांना टाॅनिकची नाही तर बड्या मानसोपचारतज्ज्ञाकडून वस्तूनिष्ठ उपचारांची गरज आहे. आपण मागेही आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना विनंती करून एक बेड राखीव ठेवण्याची विनंती केली होती. आता पुन्हा एकदा हात जोडून बेड राखीव ठेवण्याची विनंती करतो, असे परांजपे म्हणाले. 

दरम्यान, राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये आपला नंबर लागावा,  यासाठीच ते शरद पवार, अजित पवार आणि सुप्रियाताई यांच्यावर बेछूट आरोप करीत आहेत. त्यांचा हा सूर्यावर थुंकण्याचा केविलवाना प्रयत्न  होत आहे. सुप्रियाताई योग्यच बोलल्या आहेत. हे सरकार पन्नास खोक्यांचे आहे. या सरकारचा मुंबई ते सुरत ते गुवाहाटी ते गोवा आणि नंतर शपथविधी हा प्रवास महाराष्ट्रालाच नव्हे तर सबंध देशाला माहित आहे. त्यामुळे राज्यपालनियुक्त आमदारकीसाठीचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न पाहता, नरेश म्हस्के यांची तब्येत ठिक व्हावी, हीच सदिच्छा व्यक्त करतो, असेही परांजपे म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेthaneठाणेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदे