शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'आमचं ठरलंय..'; एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाडांचे एकमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 08:05 IST

आपला प्रमुख प्रतिस्पर्धी भाजप असून, त्याचा पाडाव करण्याकरिता महाविकास आघाडी आवश्यक : जितेंद्र आव्हाड

ठाणे  : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाआघाडी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी शनिवारी बैठकीत केली. जिल्ह्यातील परिस्थिती पाहता महाविकास आघाडी व्हावी, अशीच सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे यापुढे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांविरोधात कोणीही बोलू नये, असे आमचे ठरले आहे. समोरुन कोणी काही बोलले तरी प्रत्युत्तर द्यायलाच हवे, असे नाही. आपला प्रमुख प्रतिस्पर्धी भाजप असून, त्याचा पाडाव करण्याकरिता महाविकास आघाडी आवश्यक आहे, असे प्रतिपादन जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केले.         

आघाडीचा निर्णय घेण्यास आव्हाड यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर ते बोलत होते. महाराष्ट्रात एकत्र येऊन राज्य पातळीवर एकमेकाला साह्य करत भाजपविरुद्ध आपण लढत आहोत. जसे संजय राऊत यांच्या बाजूने सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या आहेत किंवा शरद पवार हे जसे वारंवार सर्वच नेत्यांची बाजू लढवत आहेत. त्याचधर्तीवर राज्यभर पक्षविरहीत वातावरण राज्यात निर्माण व्हायला हवे, ही सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. 

शिवसेनेशी चर्चा करणार का, या प्रश्नावर आव्हाड म्हणाले की, आम्ही आमची भूमिका मांडली आहे. आमच्यातर्फे ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे हे चर्चा करणार आहेत. शिवाय, या चर्चेसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर तीन ते चार जणांची समिती नेमण्यात आली आहे. तीन ते चार दिवसांपासून एकनाथ शिंदे ज्या मुलाखती देत आहेत; त्याकडे पाहता, ते महाविकास आघाडीकरिता सकारात्मक भूमिका घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

दोन्ही पक्षांत हवे सामंजस्य - शिंदेराज्यात महाविकास आघाडी आहे, त्यामुळे महापालिका निवडणुकीत आम्ही आघाडीच्याच बाजूने आहोत. आमच्याकडून टीकेला सुरुवात केली गेली नव्हती. समोरुन टीका होत असेल तर त्याला प्रत्युत्तर द्यावे लागते. त्यामुळे सर्वांनी सांभाळून बोलावे, सामंजस्याची भूमिका घ्यावी, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडMahavikas Aghadiमहाविकास आघाडी