शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

'आमचं ठरलंय..'; एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाडांचे एकमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 08:05 IST

आपला प्रमुख प्रतिस्पर्धी भाजप असून, त्याचा पाडाव करण्याकरिता महाविकास आघाडी आवश्यक : जितेंद्र आव्हाड

ठाणे  : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाआघाडी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी शनिवारी बैठकीत केली. जिल्ह्यातील परिस्थिती पाहता महाविकास आघाडी व्हावी, अशीच सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे यापुढे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांविरोधात कोणीही बोलू नये, असे आमचे ठरले आहे. समोरुन कोणी काही बोलले तरी प्रत्युत्तर द्यायलाच हवे, असे नाही. आपला प्रमुख प्रतिस्पर्धी भाजप असून, त्याचा पाडाव करण्याकरिता महाविकास आघाडी आवश्यक आहे, असे प्रतिपादन जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केले.         

आघाडीचा निर्णय घेण्यास आव्हाड यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर ते बोलत होते. महाराष्ट्रात एकत्र येऊन राज्य पातळीवर एकमेकाला साह्य करत भाजपविरुद्ध आपण लढत आहोत. जसे संजय राऊत यांच्या बाजूने सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या आहेत किंवा शरद पवार हे जसे वारंवार सर्वच नेत्यांची बाजू लढवत आहेत. त्याचधर्तीवर राज्यभर पक्षविरहीत वातावरण राज्यात निर्माण व्हायला हवे, ही सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. 

शिवसेनेशी चर्चा करणार का, या प्रश्नावर आव्हाड म्हणाले की, आम्ही आमची भूमिका मांडली आहे. आमच्यातर्फे ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे हे चर्चा करणार आहेत. शिवाय, या चर्चेसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर तीन ते चार जणांची समिती नेमण्यात आली आहे. तीन ते चार दिवसांपासून एकनाथ शिंदे ज्या मुलाखती देत आहेत; त्याकडे पाहता, ते महाविकास आघाडीकरिता सकारात्मक भूमिका घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

दोन्ही पक्षांत हवे सामंजस्य - शिंदेराज्यात महाविकास आघाडी आहे, त्यामुळे महापालिका निवडणुकीत आम्ही आघाडीच्याच बाजूने आहोत. आमच्याकडून टीकेला सुरुवात केली गेली नव्हती. समोरुन टीका होत असेल तर त्याला प्रत्युत्तर द्यावे लागते. त्यामुळे सर्वांनी सांभाळून बोलावे, सामंजस्याची भूमिका घ्यावी, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडMahavikas Aghadiमहाविकास आघाडी