शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

मध्यमवर्गीयच आता रेल्वेला धडा शिकवतील: डॉ. जितेंद्र आव्हाड

By अजित मांडके | Updated: September 7, 2022 16:11 IST

प्रवाशांसमोर बंदूकधारी पोलीस निशस्त्र लोकांना घाबरवतात, हे आता जनता सहन करणार नाही,  असा इशारा डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : रेल्वे हा देशातील ऐतिहासिक ‘गेंडा’ आहे. त्यांना ऊन, वारापाऊस, इंजेक्शन वगैरे काही चालत नाही. त्यांच्यावर असरच होत नाही. पुढील आंदोलन हे आपल्या हातात नाही. तर ते जनतेच्या हातात आहे. मध्यमवर्गीयांच्या मनात आता रेल्ेवच्या बाबतीत राग पेटतोय; ते आता रेल्वेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. जर, सकाळच्या वेळी सर्व प्रवाशी अर्धा तास आधी येऊन रेल्वेस्थानकात फलाटावरच मांडी घालून बसले तर काय होईल?  प्रवाशांसमोर बंदूकधारी पोलीस निशस्त्र लोकांना घाबरवतात, हे आता जनता सहन करणार नाही,  असा इशारा डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला.  

एसी लोकलच्या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. ते म्हणाले की, एसी लोकलच्या विरोधातील पहिले आंदोलन हे कळव्यातून सुरु झाले. त्यानंतर बदलापूर आणि ठाण्यात झाले. पण, सर्वाधिक प्रतिसाद हा ठाण्यातून मिळत आहे. ठाण्यातून सुटणारी 9 वाजून 3 मिनिटांची एक लोकल रद्द केली आहे. या लोकलमधून सर्व मंत्रालयीन कर्मचारी मुंबईला जायचे. त्याच लोकलच्या वेळेवर आता एसी लोकल चालविली जात आहे. आमचं हेच म्हणणं आहे की एसीच्या 100 गाड्या चालवा; पण, ज्या गरीबांच्या, नोकरदार वर्गाच्या लोकल आहेत त्या साध्या लोकलवर अन्याय का करता? यामुळे शांत असलेले वातावरण अधिक पेटवले जात आहे. एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याच्या बातम्या रेल्वेकडून प्रसारीत केल्या जात आहेत. पण, एसी लोकलमध्ये नृत्य करता येईल, एवढी ती लोकल रिकामी असते. रेल्वेकडून केला जाणारा चांगल्या प्रतिसादाचा दावा खोटा आहे. 

कारण, आपण जेव्हा रेल्वेच्या अधिकार्‍यांची भेट घेतली तेव्हा त्यांनीच सांगितले होते की एका एसी लोकलमधून केवळ 570 प्रवाशी प्रवास करतात. लोकांची मागणी असेल तर त्या एसी लोकल चालवा. पण, आमच्या साध्या लोकल तुम्हाला बंद करता येणार नाहीत. कळवा कारशेडमधून निघणार्‍या या प्रत्येक लोकल या साध्या होत्या. त्या आता बंद करुन त्यांच्या जागी एसी लोकल चालविल्या जात आहेत. ठाणे स्टेशनवर एकाचवेळी सुमारे 5 ते 6 हजार लोक उभे असतात. ते एसी लोकलमध्ये चढत नाहीत. मग, ते कोणत्या लोकलमध्ये चढणार, याचे उत्तर रेल्वे प्रशासनाने द्यायला हवे. हा मुद्दा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा कळवा- मुंब्रापुरता मर्यादीत नाही. 

याविषयी आता प्रत्येक स्टेशनवर चीड निर्माण होताना दिसत आहे. गर्दीमुळे मृत्युचे प्रमाण वाढत आहे. माणुसकीशी होणारा हा खेळ आता जर शांतपणे बघणार असू तर आपण राजकारणात राहू नये, असे आपले मत आहे. त्यामुळेच आपण पक्षीय राजकारण न करता केवळ रेल्वे प्रवाशांच्या भुमिका मांडतोय; त्यात आपली राजकीय भूमिका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे