शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

मीरा-भाईंदरच्या मोबदल्यात राष्ट्रवादी करणार ठाणे विधानसभेवर दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:25 IST

लोकसभा निवडणुकीच्या सोयीसाठी मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने पाणी सोडले आहे. हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडल्याची घोषणाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गुरुवारी केली.

- अजित मांडकेठाणे : लोकसभा निवडणुकीच्या सोयीसाठी मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने पाणी सोडले आहे. हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडल्याची घोषणाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गुरुवारी केली. आता त्या मोबदल्यात ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने चालवली आहे. युतीपाठोपाठ आता आघाडीतही देवाणघेवाण सुरू झाल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.ठाणे लोकसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शिवसेनेने भाजपाच्या नाराज नगरसेवकांची समजूत काढण्यात यश मिळवले असले, तरी त्यातील २१ नगरसेवकांचे अद्यापही मनोमिलन झालेले नाही. एकेक अडचण दूर करून शिवसेना आपली रणनीती आखत असताना, राष्टÑवादीनेसुद्धा हम भी आपसे कम नही, असे म्हणत निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यानुसार, गुरुवारी मीरा-भार्इंदरमध्ये राष्टÑवादीने पत्रकार परिषद घेत, मीरा-भार्इंदरची संपूर्ण जबाबदारी ही काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन यांच्यावर सोपवली असल्याचे स्पष्ट केले. राष्टÑवादीचे नेते गणेश नाईक यांनी हुसेन यांच्या पाठिंब्याच्या बदल्यात मीरा-भार्इंदर मतदारसंघ काँग्रेसला सोडत असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी हा मतदारसंघ राष्टÑवादीकडे होता. परंतु, गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी राष्टÑवादीचे घड्याळ काढत शिवसेनेचे बंधन हाती घेतले. त्यामुळे राष्टÑवादीची तशीही या भागातील ताकद कमी झाली आहे. शिवाय, काँग्रेसकडे येथे १२ नगरसेवकांचे संख्याबळ असून, तब्बल ७० हजारांच्या आसपास मतदार या पक्षाजवळ आहेत. त्यामुळे याचा फायदा घेण्यासाठी राष्टÑवादीने ही शक्कल लढवल्याचे बोलले जात आहे. मीरा-भार्इंदरमध्ये ही रणनीती आखत असतानाच आगामी विधानसभा निवडणूकही आघाडी करूनच लढवण्याची तयारी काँग्रेस आणि राष्टÑवादीने केली आहे. त्यामुळे ठाणे विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे वळवण्यासाठी राष्टÑवादीकडून हालचाली होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्टÑवादी स्वतंत्र लढले होते. त्यावेळी राष्टÑवादीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना २४ हजार ३२० मते मिळाली होती. काँग्रेसचे नारायण पवार यांना १५ हजार ८८३ मते मिळाली होती. परंतु, आता या दोघांनीही भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे ही जागा आता कोण लढवणार, असा प्रश्न उभा ठाकला आहे. तत्पूर्वी २००९ मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. त्यावेळी सुभाष कानडे यांना ३६ हजार २८८ मते मिळाली होती. परंतु, आता काँग्रेसची ताकद ठाण्यात कमी झाली असून राष्टÑवादीची ताकद बऱ्यापैकी असल्याने येत्या काळात ठाणे शहर विधानसभा क्षेत्रावर राष्टÑवादी दावा ठोकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. किंबहुना, मीरा-भार्इंदरच्या बदल्यात ठाणे असे समीकरणसुद्धा निश्चित झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.मुझफ्फर हुसेनांनी दिला घड्याळाला हातमीरा रोड - मोदी सरकारवर शेतकरी, महिला, तरुण, कामगार, व्यापारी आदी सर्वच घटक नाराज असून, या निवडणुकीत जनता आपला क्रोध व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी मीरा रोड येथे पत्रकार परिषदेत केली. मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडला असून, प्रचाराची धुरा काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्यावर सोपवल्याचेही नाईक यांनी जाहीर केले.न केलेल्या कामांचा ढोल वाजवत मोदी सरकार स्टंटबाजी करत आहे. जनतेची फसवणूक करून संविधान आणि लोकशाहीच नेस्तनाबूत केली जात आहे. नोटाबंदीमुळे रोजगार-व्यापार बुडाल्याचेही नाईक म्हणाले. भार्इंदर रेल्वे टर्मिनस बनवणे, दहिसर-मीरा-भार्इंदर रस्ता आदी अनेक कामेच झाली नसल्याचा आरोप आनंद परांजपे यांनी केला.धर्म व जातीच्या नव्हे, तर गणेश नाईक, संजीव नाईक, मुझफ्फर हुसेन आदींनी केलेल्या कामांच्या बळावर मते मागणार असल्याचे आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यावेळी म्हणाले. शहरात टीडीआर, आरक्षण घोटाळा १० हजार कोटींचा असून हे घोटाळे लवकरच बाहेर काढू, असा इशारा आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, राष्ट्रवादीचे दिनकर तावडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthaneठाणे