शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरच्या मोबदल्यात राष्ट्रवादी करणार ठाणे विधानसभेवर दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:25 IST

लोकसभा निवडणुकीच्या सोयीसाठी मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने पाणी सोडले आहे. हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडल्याची घोषणाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गुरुवारी केली.

- अजित मांडकेठाणे : लोकसभा निवडणुकीच्या सोयीसाठी मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने पाणी सोडले आहे. हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडल्याची घोषणाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गुरुवारी केली. आता त्या मोबदल्यात ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने चालवली आहे. युतीपाठोपाठ आता आघाडीतही देवाणघेवाण सुरू झाल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.ठाणे लोकसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शिवसेनेने भाजपाच्या नाराज नगरसेवकांची समजूत काढण्यात यश मिळवले असले, तरी त्यातील २१ नगरसेवकांचे अद्यापही मनोमिलन झालेले नाही. एकेक अडचण दूर करून शिवसेना आपली रणनीती आखत असताना, राष्टÑवादीनेसुद्धा हम भी आपसे कम नही, असे म्हणत निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यानुसार, गुरुवारी मीरा-भार्इंदरमध्ये राष्टÑवादीने पत्रकार परिषद घेत, मीरा-भार्इंदरची संपूर्ण जबाबदारी ही काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन यांच्यावर सोपवली असल्याचे स्पष्ट केले. राष्टÑवादीचे नेते गणेश नाईक यांनी हुसेन यांच्या पाठिंब्याच्या बदल्यात मीरा-भार्इंदर मतदारसंघ काँग्रेसला सोडत असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी हा मतदारसंघ राष्टÑवादीकडे होता. परंतु, गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी राष्टÑवादीचे घड्याळ काढत शिवसेनेचे बंधन हाती घेतले. त्यामुळे राष्टÑवादीची तशीही या भागातील ताकद कमी झाली आहे. शिवाय, काँग्रेसकडे येथे १२ नगरसेवकांचे संख्याबळ असून, तब्बल ७० हजारांच्या आसपास मतदार या पक्षाजवळ आहेत. त्यामुळे याचा फायदा घेण्यासाठी राष्टÑवादीने ही शक्कल लढवल्याचे बोलले जात आहे. मीरा-भार्इंदरमध्ये ही रणनीती आखत असतानाच आगामी विधानसभा निवडणूकही आघाडी करूनच लढवण्याची तयारी काँग्रेस आणि राष्टÑवादीने केली आहे. त्यामुळे ठाणे विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे वळवण्यासाठी राष्टÑवादीकडून हालचाली होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्टÑवादी स्वतंत्र लढले होते. त्यावेळी राष्टÑवादीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना २४ हजार ३२० मते मिळाली होती. काँग्रेसचे नारायण पवार यांना १५ हजार ८८३ मते मिळाली होती. परंतु, आता या दोघांनीही भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे ही जागा आता कोण लढवणार, असा प्रश्न उभा ठाकला आहे. तत्पूर्वी २००९ मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. त्यावेळी सुभाष कानडे यांना ३६ हजार २८८ मते मिळाली होती. परंतु, आता काँग्रेसची ताकद ठाण्यात कमी झाली असून राष्टÑवादीची ताकद बऱ्यापैकी असल्याने येत्या काळात ठाणे शहर विधानसभा क्षेत्रावर राष्टÑवादी दावा ठोकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. किंबहुना, मीरा-भार्इंदरच्या बदल्यात ठाणे असे समीकरणसुद्धा निश्चित झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.मुझफ्फर हुसेनांनी दिला घड्याळाला हातमीरा रोड - मोदी सरकारवर शेतकरी, महिला, तरुण, कामगार, व्यापारी आदी सर्वच घटक नाराज असून, या निवडणुकीत जनता आपला क्रोध व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी मीरा रोड येथे पत्रकार परिषदेत केली. मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडला असून, प्रचाराची धुरा काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्यावर सोपवल्याचेही नाईक यांनी जाहीर केले.न केलेल्या कामांचा ढोल वाजवत मोदी सरकार स्टंटबाजी करत आहे. जनतेची फसवणूक करून संविधान आणि लोकशाहीच नेस्तनाबूत केली जात आहे. नोटाबंदीमुळे रोजगार-व्यापार बुडाल्याचेही नाईक म्हणाले. भार्इंदर रेल्वे टर्मिनस बनवणे, दहिसर-मीरा-भार्इंदर रस्ता आदी अनेक कामेच झाली नसल्याचा आरोप आनंद परांजपे यांनी केला.धर्म व जातीच्या नव्हे, तर गणेश नाईक, संजीव नाईक, मुझफ्फर हुसेन आदींनी केलेल्या कामांच्या बळावर मते मागणार असल्याचे आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यावेळी म्हणाले. शहरात टीडीआर, आरक्षण घोटाळा १० हजार कोटींचा असून हे घोटाळे लवकरच बाहेर काढू, असा इशारा आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, राष्ट्रवादीचे दिनकर तावडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthaneठाणे