शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

साधू हत्या प्रकरणात नक्षलवादी कनेक्शन?; विवेक विचार मंचचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 04:35 IST

अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी

पालघर : गडचिंचले गावात साधूंची हत्या घडविण्यास कारणीभूत असलेली अफवा कोणी पसरविली याचा शोध घ्यावा आणि यामागे नक्षलवादाचे कनेक्शन असल्यास ते शोधावे, अशी मागणी विवेक विचार मंचने मंगळवारी केली. १६ एप्रिलला गडचिंचले या गावातील हल्ल्यात दोन साधूंसह एका वाहनचालकाचा मृत्यू झाला होता.आदिवासी समाज क्रूर कसा झाला? त्यांनी साधूंची निर्घृण हत्या कशी केली? त्यांना हिंदू परंपरांपासून तोडण्याचे षड्यंत्र आहे का, ख्रिश्चन मिशनरींचाही हात आहे का?, याचा शोध घ्यावा असा मुद्दा त्यांनी मांडला. हिंदूंच्या देवी-देवता, परंपरा आपल्या नाहीत, असा प्रचार या भागात केला जातो, असा मुद्दा मंचाने मांडला आहे.वेब पत्रकार परिषदेत मंचाच्या सत्यशोधन समितीचा अहवाल मांडण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अ‍ॅड. समीर कांबळे, अ‍ॅड. प्रवर्तक पाठक, पत्रकार किरण शेलार, आदिवासी कार्यकर्ते संतोष जनाठे, निवृत्त पोलीस अधिकारी लक्ष्मण खरपडे यांचा समावेश होता. या समितीचा अहवाल राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री व राज्याचे पोलीस महासंचालक यांना देण्यात आला आहे.‘सातत्याने खोटे आरोप’गेले दोन महिने सातत्याने खोटे आरोप केले जात आहेत. आजही कोणतेच नवे पुरावे मांडलेले दिसून येत नाही. या समितीतील निवृत्त न्यायाधीश स्वत: जिल्ह्यात फिरल्याचा स्पष्ट उल्लेख नाही. आरोप केलेल्या संघटनांचा या घटनेशी संबंध असल्याचे कुठेही स्पष्ट म्हटलेले नाही.- ब्रायन लोबो, कष्टकरी संघटना

टॅग्स :Lynchingलीचिंग