शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

ठाण्यात महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी; मलिकांच्या समर्थनार्थ आंदोलनाला शिवसेनेची दांडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 14:09 IST

मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचे आंदोलन, आजचे आंदोलन हे भाजपच्या दडपशाहीच्या विरोधातील आंदोलन आहे. त्यामुळे आम्ही सर्व खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरलो आहोत

रणजीत इंगळे 

ठाणे - आघाडीत सगळं काही सुरळीत असल्याचं बोललं जात असलं तरी ठाण्यात मात्र आघाडीत बिघाडी झाल्याचं पुन्हा एकदा दिसून आल आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना  अटक झाल्यानंतर ठाण्यात महाविकास आघाडीने आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेली शिवसेना मात्र कुठेही दिसली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आल आहे. शिवसेनेच्या प्रश्नाबद्दल राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता आम्ही त्यांना माहिती दिली होते तरीदेखील ते आले नसल्याचे सांगितले. त्यामुळे आघाडीत पुन्हा बिघाडी झाल्याची चर्चा आहे. 

राष्ट्रवादी आणि काँग्रेस या  पक्षांच्यावतीने शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईडी आणि केंद्र सरकारच्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारकडन विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सीबीआय,  एनआयए,  आयकर विभाग, आणि ईडी या तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केली. मोदी सरकार हा हाय हाय, ईडी झाली येडी, मोदी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. 

यावेळी आनंद परांजपे म्हणाले की, आता लढा सुरु झालेला आहे. महविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले आहेत.  ज्यावेळी इडी अस्तित्वात नव्हती त्यावेळी घडलेल्या कृतीला आता लक्ष्य केले जात असेल तर त्यामध्ये राजकारण नाही का? ईडीच्या धाडी कोणाच्या घरावर पडणार आहेत हे भाजपावाल्यांना आधीच कळते. म्हणजेच ईडी ही भाजपाकडूनच चालविली जाते. हेच स्पष्ट होत आहे. गुरुवारी भाजपवाल्यांनी नवाब मलिक यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करुन त्यांचा अपमान केला आहे. हा आरोप करणार्‍या भाजपने आधी उत्तर द्यावे की,  नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाला बिर्याणी खायला पाकिस्तानात पंतप्रधान का गेले होते? नांदेड-मालेगावमधील बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग या भाजपच्या खासदार कशा झाल्या?  कर्नल पुरोहितशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तांदोलन का केले?  याची उत्तरे आधी भाजपवाल्यांनी द्यावीत नंतर मोदी सरकारचा कारभार देशहितासाठी एक्स्पोज करणार्‍या मलिक यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करावे? असा टोला परांजपे यांनी लगावला.

विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की, आजचे आंदोलन हे भाजपच्या दडपशाहीच्या विरोधातील आंदोलन आहे. त्यामुळे आम्ही सर्व खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरलो आहोत. सर्व सेक्युलर पक्ष रस्त्यावर  उतरले आहेत. दाऊदला फरफटत आणू, असे म्हणणारे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत बैठक करतात; या बैठकीला स्वत: दाऊद उपस्थित होता. असे असताना 30 वर्षांपूर्वीच्या काही घटना समोर धरुन नवाब मलिकांना खोट्या आरोपांखाली अडकविण्यात आले आहे. वास्तविक, दाऊद आणि आयएसआयसोबत भाजपनेच हातमिळविणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गटनेते नजीब मुल्ला यांनीही यावेळी भाजपवर जोरदार टीका केली. जे लोक विरोधात बोलतात त्यांना टार्गेट केले जात आहे. निवडणुकीला सामोरे जात असताना पराभव दिसत असल्यानेच हे घाणेरडे राजकारण भाजपने केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरु केले आहे.  जो पर्यंत भाजप संपणार नाही; तोचपर्यंत हा लढा सुरुच राहणार आहे; नवाब मलिक हे निर्दोष असूनते मुस्लीम असल्यानेच त्यांना दाऊदचे नाव जोडण्यात आले आहे. प्रत्येकवेळी मुस्लीम नेतृत्व पुढे आले की त्यांना अडकविण्याचा भाजपचा हा प्रयत्न नेहमी असतो, अशी टीका मुल्ला यांनी केली.

टॅग्स :nawab malikनवाब मलिक