शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

कल्याण, ठाणे, भार्इंदरदरम्यान होणार जलवाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 2:47 AM

ठाणे खाडीचा वापर करून जलवाहतूक सुरू करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने अखेर मान्यता दिली.

ठाणे : ठाणे खाडीचा वापर करून जलवाहतूक सुरू करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने अखेर मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-मुंबई-भार्इंदर अशी जलवाहतूक सुरू करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली.खासदार राजन विचारे यांच्यासह कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत गडकरी यांच्यासमोर या प्रकल्पाची व्यवहार्यता तसेच प्राथमिक सविस्तर प्रकल्प अहवालाचे सादरीकरण सोमवारी करण्यात आले. त्यानंतर गडकरी यांनी मदतीचा हात पुढे करत या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील ४५३ कोटीपैकी ५० टक्के वाटा उचलण्यास मान्यता दिली.ठाणे आणि त्यापुढील रहिवाशांना किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक सुरू व्हावी, या दृष्टीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. त्याला मंजुरी मिळावी, यासाठी शिंदे आणि विचारे यांनी दिल्लीत सातत्याने पाठपुरावा केला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात गडकरी यांच्याकडे झालेल्या बैठकीनंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त जयस्वाल यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेऊन व्यवहार्यता अहवाल आणि प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार केला. त्याचे सादरीकरण सोमवारी गडकरी यांच्यासमोर केले. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-वसई-मीरा भार्इंदर हा जलमार्ग विकसित करण्यात येणार असून त्यासाठी ४५३ कोटी रु पयांचा खर्च अपेक्षित आहे. या अंतर्गत कल्याण, डोंबिवली, दिवा, कळवा, काल्हेर, कोलशेत, नागला बंदर, घोडबंदर रोड, मीरा-भार्इंदर, वसई किल्ला या ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहेत. गडकरी यांनी ठाणे महापालिकेला अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याचे निर्देश देताना प्रकल्पातील खर्चाचा ५० टक्के वाटा उचलण्यास तयारी दर्शविली.