शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

लसीकरणात ठाणेसह नवी मुंबईची आघाडी तर उल्हासनगर, भिवंडी पिछाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:06 IST

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे लसीकरण केंद्र बंद करून ...

सुरेश लोखंडे

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे लसीकरण केंद्र बंद करून प्रत्येक शहरात फक्त एक लसीकरण केंद्र सुरू ठेवले आहे. सोमवारपर्यंत जिल्ह्यात फक्त १५ हजार ६४० लसींचा साठा शिल्लक असून केवळ १२ लाख ३४ हजार ५६८ जणांचे जिल्हाभरात लसीकरण झाले आहे. यात ठाणेसह नवी मुंबई आघाडीवर असून उल्हासनगर, भिवंडी पिछाडीवर आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा कहर लक्षात घेऊन नागरिकांनी लसीकरणासाठी जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर प्रचंड गर्दी केल्यामुळे लसींचा तुटवडा झाला आहे. जिल्ह्यातील २५८ लसीकरण केंद्रांपैकी प्रत्येक शहरात केवळ एक केंद्र सुरू ठेवण्याचा प्रसंग ओढावला आहे. सहा महापालिकांमध्ये फक्त सात लसीकरण केंद्र व पाच तालुक्यांच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे अवघे सात केंद्र सुरू आहे. सध्या ठिकठिकाणी फक्त १५ हजार ६४० लसींचा साठा शिल्लक असून यामध्ये कोविशिल्डच्या आठ हजार ९१० व सहा हजार ७३० कोव्हॅक्सिनचा समावेश आहे.

स्मार्ट सिटीच्या ठाणे शहरात सर्वात कमी म्हणजे कोविशिल्डचा ४० लसी आणि कोव्हॅक्सिनच्या ८० लसींचा साठा शिल्लक आहे. ठाण्यात केवळ एक लसीकरण केंद्र सुरू आहे. या शहरातील तीन लाख सहा हजार ३७ ठाणेकरांनी लसीकरण केले आहे. यामध्ये ६४ हजार ३८१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. याप्रमाणे सायबर सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत कोव्हॅक्सिनच्या ७७० कोविशिल्डच्या ६३० लसींचा साठा आहे. मीरा-भाईंदरला चार हजार ७६० तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांमध्ये तीन हजार ५६० लसीचा साठा आहे. कल्याण-डोंबिवली शहरात एक हजार ४८० लस आहेत. उल्हासनगरला दोन हजार ४८० लस शिल्लक आहेत. भिवंडीला एक हजार ८४० लस आहेत.

आतापर्यंत कोणत्या शहरात किती जणांचे लसीकरण

१) जिल्ह्याच्या ग्रामीण भागात- १,९४,९७९

२) केडीएमसी - १,७५,२७४

३) उल्हासनगर - ३६,६०६

४) भिवंडी - ३५,०८१

५) ठाणे मनपा- ३,०६,०३७

७) मीरा-भाईंदर- १,९५,४०४

८) नवी मुंबई - २,८८,०९५

------------------