शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

निसर्ग संरक्षण हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य - न्या. अभय ओक

By सुरेश लोखंडे | Updated: August 22, 2022 15:06 IST

डोंबिवलीच्या खोणी येथील 'घरकुल' संस्थेमार्फत रविवारी पाणवठा' या संस्थेच्या परिवारातील २५ स्वयंसेवकांचा सत्कार न्या. ओक यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला.

- सुरेश लोखंडे

ठाणे : राज्य घटनेने नेमुन दिलेल्या संविधानात निसर्ग संरक्षण हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य दिले आहे. प्राणी क्षेत्रात काम करायला धैर्य लागते. त्यातही अपंग प्राण्यांसाठी काम करणे अधीक त्रासदायक आहे. त्यामुळे 'पाणवठा' या संस्थेचे कार्य खरच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी कल्याण तालुक्यातील डोंबिवलीच्या खोणी येथील कार्यक्रमात काढले. यावेळी अनेक प्राण्यांबाबत याचिकांवर दिलेल्या निकालांचा उल्लेखही यावेळी केला.

डोंबिवलीच्या खोणी येथील 'घरकुल' संस्थेमार्फत रविवारी पाणवठा' या संस्थेच्या परिवारातील २५ स्वयंसेवकांचा सत्कार न्या. ओक यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी राज्य घटनेने नेमुन दिलेल्या संविधानात निसर्ग संरक्षण हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी 'पाणवठा' या मुक्या प्राण्यांची सेवा करणार्या संस्थेचे प्रा. गणराज जैन आणि डाॅ. अर्चना जैन यांच्यासह २५ स्वयंसेवकांचा गौरव करून त्यांना सौर कंदील, सन्मानचिन्ह दिले आणि पाणवठाचे कार्य खरच कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाला कल्याणच्या तहसिलदार सुषमा बांगर, स्पेशल मुलांच्या 'घरकुल' आश्रमच्या अमेय पालक संघटनेचे अविनाश बर्वे आदी उपस्थित होते.   बदलापूर आणि वांगणी दरम्यान चामकोली गावालगत  जैन यांचे मुक्या प्राण्यांसाठी पाणवठा संस्थेचा पाण्याचा आश्रम आहे. सध्या या आश्रमात ११० मोकाट,बेवारस प्राण्यांवर उपचार सुरू आहेत. अपंग प्राण्यांचा अनाथाश्रमात कायमस्वरुपी अपंग झालेल्या प्राण्यांचे संगोपन केले जाते. या अपंग प्राण्यांची माऊली डाॅ. अर्चना जैन व त्यांचे पती गणराज जैन या अनोख्या दांपत्याने पाणवठा या अंपग प्राण्यांच्या आश्रमाची स्थापना केली. हे दांपत्य गेली अनेक वर्षे प्राणी क्षेत्रात कार्यरत आहे. हजारो प्राण्यांना नवे सुखकर आयुष्य देण्यात त्यांना यश मिळाले आहे. 

आश्रमाची सर्वात अधोरेखीत करण्यासारखी बाब आहे स्वच्छता. शंभरहून अधीक अपंग, अंध प्राणी आजही आश्रमात दाखल आहेत. परंतु तरीही साधारणपणे प्राण्यांच्या शेल्टर्समधे जाणवणारा कोणताही वास येथे जाणवत नाही. पिल्लांचा निट-नेटका सांभाळ, स्वतःचे विज कनेक्शन नसुनही प्रत्येक पिजर्‍यात असलेली लाईट व्यवस्था, प्रत्येक पिल्लांचे बेड, एसटीएस म्युजीक थेरपी, प्राण्यांची मानसीक व शारीरीक दृष्ट्या घेतली जाणारी काळजी आदी या सर्व बाबी देखील पाणवठा आश्रमाचे वेगळेपण दर्शवते. हे दाम्पत्य गेली १७ वर्षे प्राणी क्षेत्रात कार्यरत असून पाणवठा हा भारतातील पहिला अपंग प्राण्यांचा अनाथाश्रम त्यांनी स्थापन केला आहे.            गेली १० वर्षे सफर नावाचे जखमी प्राण्यांचे मोफत उपचार केंद्र चालवले आहे. आजपर्यंत ४५०० पेक्षा अधिक प्राण्यांवर या केंद्रात मोफत उपचार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या आश्रमात पोपट, माकड, खवले मांजर, निलगाय, सांबर, भेकर तसेच विविध पक्षी इत्यादींचा समावेश आहे. त्याचबरोबर 'सावली गोशाळा' या त्यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून १५० पेक्षा जास्त गाई त्यांनी गरजू शेतकर्‍यांना मोफत दिल्या आहेत.  

टॅग्स :thaneठाणे