शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पवईत १५० फूट उंचीवर राष्ट्रध्वज, नागरीवस्तीतील पहिलाच उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 02:15 IST

राष्ट्रध्वजाविषयी जनजागृती करण्यासाठी गुरुवारी स्वातंत्र्यदिनी मुंबईतील पवई येथे १५० फूट उंचीवर तिरंगा फडकावण्यात येणार आहे.

- जान्हवी मोर्येडोंबिवली : राष्ट्रध्वजाविषयी जनजागृती करण्यासाठी गुरुवारी स्वातंत्र्यदिनी मुंबईतील पवई येथे १५० फूट उंचीवर तिरंगा फडकावण्यात येणार आहे. ६० बाय ४० फुटांचा हा राष्ट्रध्वज दोन इमारतींच्या मध्यभागी फडकणार आहे. नागरीवस्तीत अशाप्रकारे प्रथमच घडणार असल्याचा दावा आयोजक राजेश बक्षी यांनी केला आहे.बक्षी हे पूर्वी अंबरनाथमध्ये राहत होते. त्यामुळे त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अंबरनाथ येथेच झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एमएससी केली. २००६ मध्ये ते पवई येथे राहायला गेले. बदलापूर येथे त्यांची औषधनिर्मिती कंपनी आहे. २०१५ मध्ये ते तुर्कस्तानमध्ये इस्तंबूलला गेले होते. तेथे अनेक ठिकाणी त्यांनी राष्टÑध्वज फडकत असल्याचे पाहिले. तेव्हा आपला राष्टÑध्वजही भारतात सर्व ठिकाणी असावा, असे मनात आले. त्यानंतर त्यांनी राष्टÑध्वजाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली. त्यांनी बी. के. फ्लॅग फाउंडेशनची स्थापना केली. बक्षी यांचे वडील भारतीय सैन्यात असल्याने राष्ट्रप्रेम त्यांच्या अंगी भिनले होते. त्यामुळे राष्ट्रासाठी काहीतरी करावे असे सतत त्यांच्या मनात येत होते. त्यातूनच त्यांनी जनजागृतीचे काम हाती घेतले.सर्वप्रथम त्यांनी अंबरनाथ येथे हुतात्मा चौकात १०० फूट उंचीवर ध्वज फडकवला. त्यानंतर राजभवन येथे १५० फुटांवर, मुंबई विद्यापीठात १०० फूट उंचीवर राष्ट्रध्वज लावला आहे. ठाण्यात माजीवाडा, सीएसटीला हजहाउस येथेही राष्ट्रध्वज फडकावला आहे. हजहाउस ही इमारत २० मजली असून ६० फूट उंचीवर ध्वज लावणारी ही देशातील सर्वात उंच इमारत ठरली आहे.राष्ट्रध्वज फाटल्यास तो लगेच बदलावा, १०० फुटांच्या वर राष्ट्रध्वज संपूर्ण वर्षभर ठेवू शकतो. राष्ट्रध्वज कधी काढावा, फाटलेला राष्ट्रध्वजांचे काय करावे याबाबत बक्षी जनजागृती करीत असतात. अनेक जण फोन करून त्यांचे मार्गदर्शन घेतात. अनेक संस्था, शाळा आणि महाविद्यालयातून ते मार्गदर्शन करतात.गेटवेलाही फडकणारसर्वोच्च न्यायालयाने २००२ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार सोसायटी, घर, कार्यालय येथेही राष्ट्रध्वज लावू शकतो, असे बक्षी यांनी सांगितले. प्रत्येक गल्लीबोळात राष्ट्रध्वज फडकावा आणि प्रत्येक भारतीयांनी त्याला सलाम करावा, हाच बक्षी यांचा ध्यास आहे. लहान मुलांनाही राष्ट्रध्वजाविषयी माहिती असावी असे ते म्हणाले. लवकरच गेट वे आॅफ इंडिया येथेही राष्ट्रध्वज फडकवणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन