शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

पवईत १५० फूट उंचीवर राष्ट्रध्वज, नागरीवस्तीतील पहिलाच उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 02:15 IST

राष्ट्रध्वजाविषयी जनजागृती करण्यासाठी गुरुवारी स्वातंत्र्यदिनी मुंबईतील पवई येथे १५० फूट उंचीवर तिरंगा फडकावण्यात येणार आहे.

- जान्हवी मोर्येडोंबिवली : राष्ट्रध्वजाविषयी जनजागृती करण्यासाठी गुरुवारी स्वातंत्र्यदिनी मुंबईतील पवई येथे १५० फूट उंचीवर तिरंगा फडकावण्यात येणार आहे. ६० बाय ४० फुटांचा हा राष्ट्रध्वज दोन इमारतींच्या मध्यभागी फडकणार आहे. नागरीवस्तीत अशाप्रकारे प्रथमच घडणार असल्याचा दावा आयोजक राजेश बक्षी यांनी केला आहे.बक्षी हे पूर्वी अंबरनाथमध्ये राहत होते. त्यामुळे त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अंबरनाथ येथेच झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एमएससी केली. २००६ मध्ये ते पवई येथे राहायला गेले. बदलापूर येथे त्यांची औषधनिर्मिती कंपनी आहे. २०१५ मध्ये ते तुर्कस्तानमध्ये इस्तंबूलला गेले होते. तेथे अनेक ठिकाणी त्यांनी राष्टÑध्वज फडकत असल्याचे पाहिले. तेव्हा आपला राष्टÑध्वजही भारतात सर्व ठिकाणी असावा, असे मनात आले. त्यानंतर त्यांनी राष्टÑध्वजाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली. त्यांनी बी. के. फ्लॅग फाउंडेशनची स्थापना केली. बक्षी यांचे वडील भारतीय सैन्यात असल्याने राष्ट्रप्रेम त्यांच्या अंगी भिनले होते. त्यामुळे राष्ट्रासाठी काहीतरी करावे असे सतत त्यांच्या मनात येत होते. त्यातूनच त्यांनी जनजागृतीचे काम हाती घेतले.सर्वप्रथम त्यांनी अंबरनाथ येथे हुतात्मा चौकात १०० फूट उंचीवर ध्वज फडकवला. त्यानंतर राजभवन येथे १५० फुटांवर, मुंबई विद्यापीठात १०० फूट उंचीवर राष्ट्रध्वज लावला आहे. ठाण्यात माजीवाडा, सीएसटीला हजहाउस येथेही राष्ट्रध्वज फडकावला आहे. हजहाउस ही इमारत २० मजली असून ६० फूट उंचीवर ध्वज लावणारी ही देशातील सर्वात उंच इमारत ठरली आहे.राष्ट्रध्वज फाटल्यास तो लगेच बदलावा, १०० फुटांच्या वर राष्ट्रध्वज संपूर्ण वर्षभर ठेवू शकतो. राष्ट्रध्वज कधी काढावा, फाटलेला राष्ट्रध्वजांचे काय करावे याबाबत बक्षी जनजागृती करीत असतात. अनेक जण फोन करून त्यांचे मार्गदर्शन घेतात. अनेक संस्था, शाळा आणि महाविद्यालयातून ते मार्गदर्शन करतात.गेटवेलाही फडकणारसर्वोच्च न्यायालयाने २००२ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार सोसायटी, घर, कार्यालय येथेही राष्ट्रध्वज लावू शकतो, असे बक्षी यांनी सांगितले. प्रत्येक गल्लीबोळात राष्ट्रध्वज फडकावा आणि प्रत्येक भारतीयांनी त्याला सलाम करावा, हाच बक्षी यांचा ध्यास आहे. लहान मुलांनाही राष्ट्रध्वजाविषयी माहिती असावी असे ते म्हणाले. लवकरच गेट वे आॅफ इंडिया येथेही राष्ट्रध्वज फडकवणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन