शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

'स्मार्ट सिटीज : द रोड अहेड' या विषयावर ठाण्यात राष्ट्रीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 16:30 IST

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उदघाटन हिवरेबाजार गावचे सरपंच व स्वयंपूर्ण गाव चळवळीचे प्रणेते पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्दे'स्मार्ट सिटीज : द रोड अहेड' या विषयावर राष्ट्रीय परिषदपरिषदेत सादर होणाऱ्या शोधनिबंधाच्या पुस्तिकेचे प्रकाशन पोपटराव पवार यांच्या हस्तेशहरे व खेड्यांनी एकत्र स्मार्ट बनण्याची गरज : पोपटराव पवार

ठाणे : विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य  महाविद्यालयात 'स्मार्ट सिटीज : द रोड अहेड' या विषयावर राष्ट्रीय परिषदचे उद्धघाटन हिवरेबाजार गावचे सरपंच व स्वयंपूर्ण गाव चळवळीचे प्रणेते पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ विजय बेडेकर यांच्या संदेशाचे ध्वनिचित्रण सुरुवातीला दाखविण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी परिषदेची तात्विक पृष्ठभूमी विशद केली. परिषदेच्या समन्वयिका प्रा. नीलम शेख यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या परिषदेत सादर होणाऱ्या शोधनिबंधाच्या पुस्तिकेचे प्रकाशन पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले.     आपल्या बीजभाषणात पोपटराव पवार म्हणाले की गाव सोडून शहरात आल्यामुळे भारतात इंडिया, भारत ,इंडो भारत या तीन जमाती तयार झाल्या. महात्मा गांधीनी दिलेल्या "गावाकडे चला" या महत्वाच्या संदेशाचा दाखला देत पवार म्हणाले की गावाकडून शहरामध्ये स्थलांतरीत होणाऱ्या वाढत्या प्रमाणामुळे शहरांवर मोठा ताण येत आहे. शहरांना लागणाऱ्या वाढत्या पाण्यामुळे गावाकडील शेतीला पाणी मिळत नाही व म्हणूनच महागाई वाढते. निसर्गाची काळजी आपण तल्याशिवाय निसर्ग आपली काळजी घेणार नाही हा सल्ला त्यांनी दिला. हिवरे बाजार गावात सरपंच झाल्यानंतर केलेल्या विधायक कामांची माहिती देत ग्राम संसद, शाश्वत विकास-शाश्वत आनंद, जलसंधारण, पुतळा विरहित गाव, व्यसनमुक्ती, विवाहपूर्व एचआयव्ही तपासणी इत्यादी आदर्श योजना गावात आणून दुष्काळी उजाड गावचं नंदनवन फुलवतानाची कृतार्थ भावना पोपटराव पवारांनी व्यक्त केली. तंत्रज्ञान व अध्यात्म यांची सांगड आपल्या लोकसंस्कृतीमध्ये होती,आपल्या सणवारांची योजना त्या रीतीने आपल्या पूर्वजांनी केली होती मात्र आधुनिकतेच्या नादात आपण निसर्गाला विसरत आहोत. पुराणातील सगर राजांची गँगावतरणाची कथा सांगत सर्वात पहिली जलसंधारणाची योजना भगवान शिवांनी कैलास मानसरोवर येथे राबवली. 150 देशात पाण्यासाठी टोकाचा संघर्ष सुरू आहे , चीन , पाकिस्तान व भारत यांच्या संघर्षाच्या मुळाशी पाण्याची भेडसावणारी समस्या आहे. या समस्येवर विद्यार्थी दशेपासूनच आपण सजग व्हायला हवे, अशा अनेक उदबोधक गोष्टी सांगत उपस्थितांना त्यांनी मंत्रमुग्ध केलं.     शहरांनी पाणी वाचवायला शिकलं पाहिजे व गावांनी पाणी जिरवायला शिकलं पाहिजे हा संदेश पवारांनी दिला.  विद्यार्थ्यांच्या सामाजिक व अध्यात्मिक जाणीवा प्रगल्भ करणाऱ्या अभ्यास सक्रमाची नितांत गरज आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले. विद्या प्रसारक मंडळाने दूरदृष्टी दाखवत अत्यंत महत्वाच्या विषयावर ही परिषद भरवली हे कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले. महाविद्यालयात ने दत्तक घेतलेल्या शहापुर मधील टाकी पठार गावची पाहणी करण्यासाठी येण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. या परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेश पाठवला होता त्याचेही वाचन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुजा रॉय अब्राहम यांनी केले, पाहुण्यांचा परिचय प्रा विमुक्ता राजे यांनी केला तर प्रा मृन्मयी थत्ते यांनी उपस्थितांचे अभार मानले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकcollegeमहाविद्यालय