शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

'स्मार्ट सिटीज : द रोड अहेड' या विषयावर ठाण्यात राष्ट्रीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 16:30 IST

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उदघाटन हिवरेबाजार गावचे सरपंच व स्वयंपूर्ण गाव चळवळीचे प्रणेते पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्दे'स्मार्ट सिटीज : द रोड अहेड' या विषयावर राष्ट्रीय परिषदपरिषदेत सादर होणाऱ्या शोधनिबंधाच्या पुस्तिकेचे प्रकाशन पोपटराव पवार यांच्या हस्तेशहरे व खेड्यांनी एकत्र स्मार्ट बनण्याची गरज : पोपटराव पवार

ठाणे : विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य  महाविद्यालयात 'स्मार्ट सिटीज : द रोड अहेड' या विषयावर राष्ट्रीय परिषदचे उद्धघाटन हिवरेबाजार गावचे सरपंच व स्वयंपूर्ण गाव चळवळीचे प्रणेते पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ विजय बेडेकर यांच्या संदेशाचे ध्वनिचित्रण सुरुवातीला दाखविण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी परिषदेची तात्विक पृष्ठभूमी विशद केली. परिषदेच्या समन्वयिका प्रा. नीलम शेख यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या परिषदेत सादर होणाऱ्या शोधनिबंधाच्या पुस्तिकेचे प्रकाशन पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले.     आपल्या बीजभाषणात पोपटराव पवार म्हणाले की गाव सोडून शहरात आल्यामुळे भारतात इंडिया, भारत ,इंडो भारत या तीन जमाती तयार झाल्या. महात्मा गांधीनी दिलेल्या "गावाकडे चला" या महत्वाच्या संदेशाचा दाखला देत पवार म्हणाले की गावाकडून शहरामध्ये स्थलांतरीत होणाऱ्या वाढत्या प्रमाणामुळे शहरांवर मोठा ताण येत आहे. शहरांना लागणाऱ्या वाढत्या पाण्यामुळे गावाकडील शेतीला पाणी मिळत नाही व म्हणूनच महागाई वाढते. निसर्गाची काळजी आपण तल्याशिवाय निसर्ग आपली काळजी घेणार नाही हा सल्ला त्यांनी दिला. हिवरे बाजार गावात सरपंच झाल्यानंतर केलेल्या विधायक कामांची माहिती देत ग्राम संसद, शाश्वत विकास-शाश्वत आनंद, जलसंधारण, पुतळा विरहित गाव, व्यसनमुक्ती, विवाहपूर्व एचआयव्ही तपासणी इत्यादी आदर्श योजना गावात आणून दुष्काळी उजाड गावचं नंदनवन फुलवतानाची कृतार्थ भावना पोपटराव पवारांनी व्यक्त केली. तंत्रज्ञान व अध्यात्म यांची सांगड आपल्या लोकसंस्कृतीमध्ये होती,आपल्या सणवारांची योजना त्या रीतीने आपल्या पूर्वजांनी केली होती मात्र आधुनिकतेच्या नादात आपण निसर्गाला विसरत आहोत. पुराणातील सगर राजांची गँगावतरणाची कथा सांगत सर्वात पहिली जलसंधारणाची योजना भगवान शिवांनी कैलास मानसरोवर येथे राबवली. 150 देशात पाण्यासाठी टोकाचा संघर्ष सुरू आहे , चीन , पाकिस्तान व भारत यांच्या संघर्षाच्या मुळाशी पाण्याची भेडसावणारी समस्या आहे. या समस्येवर विद्यार्थी दशेपासूनच आपण सजग व्हायला हवे, अशा अनेक उदबोधक गोष्टी सांगत उपस्थितांना त्यांनी मंत्रमुग्ध केलं.     शहरांनी पाणी वाचवायला शिकलं पाहिजे व गावांनी पाणी जिरवायला शिकलं पाहिजे हा संदेश पवारांनी दिला.  विद्यार्थ्यांच्या सामाजिक व अध्यात्मिक जाणीवा प्रगल्भ करणाऱ्या अभ्यास सक्रमाची नितांत गरज आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले. विद्या प्रसारक मंडळाने दूरदृष्टी दाखवत अत्यंत महत्वाच्या विषयावर ही परिषद भरवली हे कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले. महाविद्यालयात ने दत्तक घेतलेल्या शहापुर मधील टाकी पठार गावची पाहणी करण्यासाठी येण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. या परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेश पाठवला होता त्याचेही वाचन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुजा रॉय अब्राहम यांनी केले, पाहुण्यांचा परिचय प्रा विमुक्ता राजे यांनी केला तर प्रा मृन्मयी थत्ते यांनी उपस्थितांचे अभार मानले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकcollegeमहाविद्यालय