शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जीसीसी ठेक्याच्या विरोधात राष्टÑवादी जाणार न्यायलयात, तिकीट दरवाढ केवळ ठेकेदारासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 17:57 IST

ठाणे परिवहन सेवेमार्फत तिकीट दरवाढ करण्याचे प्रस्तावित केल्यानंतर परिवहन समितीने ती दरवाढ फेटाळली आहे. परंतु केवळ इलेक्शन फंड गोळा करण्यासाठी आणि ठेकेदाराची झोळी भरण्यासाठी ही दरवाढ करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

ठळक मुद्देउत्पन्नापेक्षा खर्च जास्तपरिवहनच्या बसेसपोटी १४ लाखांचे उत्पन्न

ठाणे - ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरवाढ करण्याचा घेतला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे या जीसीसी ठेक्याच्या विरोधात आता उच्च न्यायालयात धाव घेतली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.              ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, शहर अध्यक्ष आनंद परांजपे, नगरसेवक नजीब मुल्ला, सुहास देसाई, मुकुंद केणी आदी उपस्थित होते. ठाणे परिवहनने सादर केलेला अर्थसंकल्प हा तुटीचा असून ठेकेदाराची तुट भरुन काढण्यासाठीच हा तिकीट दरवाढीचा फंडा पुढे आणण्यात आल्याचा आरोपही यावेळी आव्हाडांनी केला. ठेकेदाराची झोळी भरुन काढतांना केवळ इलेक्शन फंड गोळा करण्याची तयारी शिवसेनेने या माध्यमातून केली असल्याचेही त्यांनी सांगितले. नवी मुंबईतही याच पध्दतीने कंत्राट देण्यात आले आहे. परंतु ठाणे महापालिकेने ठेकेदाराला वाढीव दर दिले असून ते चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या विरोधात आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.          यापूर्वी नवीन बसेस जीसीसीवर देण्यात आल्या आहेत. आता पुन्हा परिवहनच्या ताफ्यातील बसेस दुरुस्त करुन त्या खाजगी ठेकेदाराला देण्याचा घाट घातला जात आहे. एकीकडे जीसीसीच्या १७५ बसेसच्या माध्यमातून परिवहनला १५ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. तर परिवहनच्या ताफ्यात असलेल्या १२० बसेसच्या माध्यमातून १४ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे परिवहनच्या बसेस दुरुस्त करुन त्या स्वत:च चालविल्या तरी परिवहनचा फायदा होणार असल्याचे मत यावेळी नजीब मुल्ला यांनी व्यक्त केले. जीसीसीला देण्यासाठी परिवहनकडे पैसे आहेत, परंतु स्वत:च्या बसेस दुरुस्तीसाठी पैसे का नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यातही जीसीसीच्या माध्यमातून परिवहनला १५ लाखांचे उत्पन्न मिळत असले तरी दुरुस्तीचा खर्च २३ लाख आहे, त्यामुळे दिवसाला परिवहनचे ८ लाखांचे नुकसान होत असतांनाही केवळ गोल्डन ठेकेदार आणि प्रशासनामध्ये असलेल्या लागेबांधेमुळेच हा प्रकार घडत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे तिकीट दरवाढ रद्द करावी, आणि जीसीसीच्या प्रस्तावाचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड