शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

अवनीची हत्या करणार्‍यांची नार्को टेस्ट करा, युवक काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 20:25 IST

अवनी वाघिणीला पकडण्यात अपयश आल्याने खोट्या चकमकीत तिला ठार मारल्याचा आरोप ठाणे शहर विधानसभा युवक काँग्रेसने केला आहे.

ठाणे: अवनी वाघिणीला पकडण्यात अपयश आल्याने खोट्या चकमकीत तिला ठार मारल्याचा आरोप ठाणे शहर विधानसभा युवक काँग्रेसने केला आहे. गोळ्या घालणार्‍या त्या वनअधिकार्‍यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणीही करण्यात आली आहे. या प्रसंगी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी येउर येथील जंगलात जाऊन वाघाचे रक्षण करण्याची शपथ घेतली.यवतमाळमध्ये अवनी वाघिणीला नरभक्षक म्हणून गोळ्या घालून ठार करण्यात आले. या घटनेवरून भाजपा सरकारविरोधात सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. वन्यजीवांचे रक्षण आणि त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून त्याबाबत कठोर कायदे करण्यात आले आहेत. अवनी वाघिणीला पिंजरा लावून किंवा गुंगीचे औषध देऊन तिला पकडता आले असते, मात्र वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्यात कमी पडले. म्हणूनच खोटी चकमक करत तिला गोळ्या झाडून ठार मारले, असा आरोप ठाणे शहर विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील भोईर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केला आहे. ठाणे जिल्हाधिकारी, वनसंरक्षक आणि वनमंत्री यांनाही शिष्टमंडळाने निवेदन देत वनकर्मचार्‍यांची नार्कोे टेस्ट करण्याची मागणी केली आहे. या शिष्टमंडळात शहर काँग्रेस सरचिटणीस सचिन शिंदे, महेश पाटील, युवा नेते झिया शेख, आपण सारे संस्थेचे अध्यक्ष राकेश पूर्णेकर, विनित तिवारी, विशाल वाघ, मेहेर चौपाने, अल्ताफ चौधरी, तेजस घोलप, यज्ञेश वाडेकर, तेजस फारूक शेख, विष्णू घाडगे, समीर शेख, बिलाल कुरेशी, तेजस पाटील, जयेश पाटील यांचा समावेश होता. या प्रकरणाची योग्य चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत शिष्टमंडळाने वन्यजीवांची हत्या करणार्‍या भाजपा सरकारचा जाहीर निषेध केला.

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीण