शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पाच मेपासून सुरूवात होणार नालेसफाईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 5:29 AM

कंत्राटदारांची संख्या होणार कमी : पालिका झोपडपट्टीत जाऊन गोळा करणार कचरा, १० कोटींची तरतूद

ठाणे : शहरातील ११९ किमीच्या ३०६ नाल्यांच्या सफाईस येत्या ५ मे पासून सुरुवात होणार आहे. ती झाल्यानंतरही बाजूच्या झोपडपट्टींतून पुन्हा कचरा टाकण्यात येत असल्याने आता यावर उपाय म्हणून या भागात घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भात घरांचा सर्व्हे केला जाणार असून त्यानंतर घरोघरी जाण्यासाठी कचरावेचकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नाल्यामध्ये प्लास्टिक टाकण्यात येत असल्याने ते तुंबण्याचे प्रकार होत होते. मात्र, आता प्लास्टिक बंदी नंतर काही प्रमाणात ते तुंबण्याचे प्रकार थांबणार असल्याचा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे. यावर्षीदेखील नालेसफाईसाठी १० कोटींची तरतूद केली आहे. परंतु, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ठेकेदारांची संख्या कमी झाली आहे.प्रभाग समिती निहाय नालेसफाईच्या कामाचे नियोजन केले असून यासाठी गेल्यावर्षी ६५ ठेकेदारांची नियुक्ती केली होती. यंदा मात्र, ठेकेदारांची संख्या कमी केली आहे. गुढी पाडव्यापासून प्लास्टिक बंदी केल्याने आता यावर्षी नाले तुंबण्याचे प्रमाण कमी होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, याचा परिणाम पुढच्या नालेसफाईमध्ये दिसेल असेही स्पष्ट केले आहे. आता नाल्यांमध्ये आहे ते प्लास्टिक काढल्यानंतर पुढच्या नालेसफाईमध्ये मात्र हा त्रास कमी होणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.नालेसफाईनंतर येणारी मुख्य समस्या म्हणजे सफाई झाल्यानंतर झोपडपट्टीमधील नागरिक विशेष करून नाल्याच्या बाजूला असलेले नागरिक पुन्हा कचरा टाकत असल्याने सफाई करूनही नाल्यात कचरा साचतो. परिणामी नालेसफाईसाठी खर्च केलेला निधी वाया जातो. यावर उपाय म्हणून कचरावेचकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन तो गोळा केला जाणार आहे. ज्या परिसरात घंटागाडी जाऊ शकत नाही अशा भागातूनच कचरा टाकला जात असल्याने आता स्वत: कचरावेचक तो गोळा करणार आहेत. त्यामुळे आता नाल्यात पडणाºया कचºयाची समस्या निकाली निघणार आहे.महापालिका हद्दीमधील नालेसफाईची कामे करण्यासाठी निविदा प्रक्रि येच्या कामाला सुरु वात झाली आहे. येत्या आठवडाभरात निविदा काढण्यात येतील, अशी माहिती घनकचरा विभागाने दिली. गेल्यावर्षी नालेसफाईसाठी ६५ ठेकेदारांची नियुक्ती केली होती. यावर्षी मात्र ही संख्या कमी करण्यात येणार आहे.काही परिसरामध्ये ५ ते १० लाखांची नालेसफाईसाठी ठेकेदारांची नियुक्ती करावी लागत होती. यासाठी प्रक्रि या देखील करावी लागत होती. ती टाळण्यासाठी छोट्या कामांचा समावेश मोठ्या कामातच करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.खाडीचे प्रवाहही होणार साफयावर्षी नालेसफाईबरोबरच खाडीचे प्रवाहदेखील साफ केले जाणार आहेत. शहरातील पाच सहा ठिकाणी असे प्रवाह आहेत जे नाल्यांना जोडले गेले आहेत. पूर्वी केवळ खाडी किनारी असलेल्या नाल्यांचे मुख महापालिका साफ करीत होती. मात्र, खाडीपर्यंत जाणारा त्यांचा संपूर्ण प्रवाह साफ न झाल्याने मुख साफ करूनही या प्रवाहामार्गे कचरा पुन्हा नाल्यामध्ये येत होता. यासाठी आता खाडीचे प्रवाहदेखील साफ करण्यात येणार असून यासाठी भरती ओहोटीच्या वेळापत्रकाचा अभ्यास केला जाणार आहे. भरतीच्या वेळी हे प्रवाह साफ करणे शक्य नसल्याने या वेळापत्रकावरच प्रवाहाची सफाई करणे शक्य होणार असल्याचे घनकचरा विभागाने स्पष्ट केले.नालेसफाईवर जीपीएस आणि कॅमेºयाचा वॉच : गेल्या वर्षीप्रमाणेच ६२ झोन तयार केले आहेत. जीपीएस प्रणाली तसेच कॅमेराचा वॉच यावर्षीदेखील असणार आहे. सफाईनंतरही नाल्यामध्ये कचरा असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी चित्रीकरण करण्यात येणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस