शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

पराभवाच्या भीतीने नाईक, आव्हाडांनी सोडले मैदान - एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 03:20 IST

एकनाथ शिंदे : ठाण्यातील मेळाव्याचे आयोजन; कार्यकर्त्यांना एकत्रित काम करण्याचा सल्ला

ठाणे : ठाणे आणि कल्याणमध्ये ज्यांनी निवडणूक लढवणे गरजेचे होते, त्यांनी आधीच मैदान सोडले आणि आता म्हणे बोहल्यावर चढविलेल्या उमेदवारांना निवडणूक जिंकण्याचा कानमंत्र दिला जात आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांना आपला पराभव दिसल्यानेच त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली असल्याचा टोला शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचा नामोल्लेख न करता लगावला.

ठाण्यात शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. आत्मविश्वास असावा मात्र फाजील आत्मविश्वास नसावा असा सल्ला त्यांनी राष्टÑवादीला दिला. मात्र आपणही गाफील राहून चालणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या दोघांनी मैदान सोडल्याने, जबरदस्तीने कल्याण आणि ठाण्यात नको त्यांना बोहल्यावर चढविले आहे. परंतु ते ९ एप्रिलपर्यंत राहतात की नाही याचाही पत्ता नसल्याचा टोला त्यांनी लगावला. मागील वेळेस लोकसभेत युती झाली होती, परंतु विधानसभेत दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. त्यानंतर ज्या काही चुका झाल्या असतील त्या विसरुन कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे असा सल्लाही त्यांनी दिला.एकदिलाने काम करा - रवींद्र चव्हाणपूर्वीपासून हा मतदारसंघ युतीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मधल्या काळात काही चुका झाल्या असतील. परंतु आता त्या सुधारण्यात आल्या असल्याचे मत रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता धनुष्यबाणाला मत म्हणजेच मोदींना मत असल्याचे सांगून विचारेंसाठी काम करण्याचा सल्ला त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे