शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

पराभवाच्या भीतीने नाईक, आव्हाडांनी सोडले मैदान - एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 03:20 IST

एकनाथ शिंदे : ठाण्यातील मेळाव्याचे आयोजन; कार्यकर्त्यांना एकत्रित काम करण्याचा सल्ला

ठाणे : ठाणे आणि कल्याणमध्ये ज्यांनी निवडणूक लढवणे गरजेचे होते, त्यांनी आधीच मैदान सोडले आणि आता म्हणे बोहल्यावर चढविलेल्या उमेदवारांना निवडणूक जिंकण्याचा कानमंत्र दिला जात आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांना आपला पराभव दिसल्यानेच त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली असल्याचा टोला शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचा नामोल्लेख न करता लगावला.

ठाण्यात शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. आत्मविश्वास असावा मात्र फाजील आत्मविश्वास नसावा असा सल्ला त्यांनी राष्टÑवादीला दिला. मात्र आपणही गाफील राहून चालणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या दोघांनी मैदान सोडल्याने, जबरदस्तीने कल्याण आणि ठाण्यात नको त्यांना बोहल्यावर चढविले आहे. परंतु ते ९ एप्रिलपर्यंत राहतात की नाही याचाही पत्ता नसल्याचा टोला त्यांनी लगावला. मागील वेळेस लोकसभेत युती झाली होती, परंतु विधानसभेत दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. त्यानंतर ज्या काही चुका झाल्या असतील त्या विसरुन कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे असा सल्लाही त्यांनी दिला.एकदिलाने काम करा - रवींद्र चव्हाणपूर्वीपासून हा मतदारसंघ युतीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मधल्या काळात काही चुका झाल्या असतील. परंतु आता त्या सुधारण्यात आल्या असल्याचे मत रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता धनुष्यबाणाला मत म्हणजेच मोदींना मत असल्याचे सांगून विचारेंसाठी काम करण्याचा सल्ला त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे