शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आरोपीच्या सुटकेसाठी मायलेकींचा धुडगूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 01:24 IST

चक्क पोलीस ठाण्यात घडला प्रकार : कागदं फेकून एपीआयला दिली धमकी

जितेंद्र कालेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दुचाकी जाळल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यापैकी आशीष गिरी याच्या सुटकेसाठी नौपाडा पोलीस ठाण्यात त्याच्या आईने आणि बहिणीने गोंधळ घातल्याचा प्रकार नुकताच घडला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ज्योती सतीश गिरी (४३) आणि दिशा (२२) या मायलेकींविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टेकडी बंगला परिसरातील ‘ठाणेदर्शन’ सोसायटीसमोरील सुनील चव्हाण (२२) यांची मोटारसायकल कोणीतरी जाळल्याची तक्रार त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात १२ आॅक्टोबर रोजी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास केली. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चौकशीमध्ये काहीच निष्पन्न झाले नाही. मात्र, शहरात वाहने जळीतकांडाचे अनेक प्रकार घडलेले असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पथकाने खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांमध्येच शक्ती ऊर्फ चंकी म्हात्रे आणि आशीष गिरी या दोघांना त्याच दिवशी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. मद्यप्राशन केल्यानंतर सिगारेट मोटारसायकलच्या सीटवर विझवताना दारूच्या नशेत त्यांच्याकडून हा प्रकार झाल्याची कबुली या दोघांनीही पोलिसांना दिली. या दोघांनाही पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ आशीषची आई ज्योती आणि बहीण दिशा यांनी पोलीस ठाण्यात येऊन गोंधळ घातला. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक आवारे यांच्यासमोरील कागदांची फेकाफेक केली.‘आम्हाला विनाकारण त्रास का देता, तुम्हाला बघून घेऊ’, असे म्हणून आरोपीची आई ज्योती आणि बहिण दिशा यांनी सहायक पोलीस निरीक्षक आवारे यांना धमकीही दिली. याप्रकरणी या दोघींविरुद्ध कलम १८६ नुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या दोघींनाही समज देऊन नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.