शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'माझा रस्ता माझी जबाबदारी'; श्रमजीवी कार्यकर्त्यांनी श्रमदानाने भरले महामार्गावरील खड्डे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 19:01 IST

गेल्या वर्षी डॉ.नेहा शेख या तरुणीचा या महामार्गावर अपघाती मृत्यू झाल्यावर तरुणांनी आंदोलन करीत या रस्त्यावरील कवाड येथील टोल नाका बंद केला

भिवंडी - श्रमजीवी संघटनेचे जिल्हा युवक प्रमुख यांनी सोशल मीडियावर आवाहन करून क्रांतिकारक स्व.वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मदिनी स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन बुधवारी "माझा रस्ता माझी जबाबदारी"हा उपक्रम राबवून हे खड्डे बुजविण्याचे केलेले आवाहन यशस्वी झाले आहे . भिवंडी तालुक्यातील तरुणांनी व श्रमजीवींच्या कार्यकर्त्यांनी पुढे येऊन स्वतः रस्त्यावर उतरून भिवंडी-वाडा, मनोर महामार्गावरील खड्डे श्रमदानाने भरून नवा आदर्श निर्माण करून पुढारी, नेते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला चांगलीच चपराक लगावली असल्याचे बोलले जाते.

भिवंडी वाडा महामार्ग हा रस्ता सुरुवातीपासूनच काही ना काही कारणांमुळे वादातच राहिला आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने या रस्त्यावर सुरुवातीपासूनच खड्डे पडले असून रस्त्याची जबाबदारी असलेल्या संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे या महामार्गाकडे पुरता दुर्लक्ष असल्याने संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या जीवघेण्या खडयांमुळे अनेक अपघात होऊन निष्पाप जीव मृत्युमुखी पडले आहेत, तर हजारो नागरिक वाहनचालक आपला जीव मुठीत घेऊन या धोकादायक महामार्गावरून रोज प्रवास करीत आहेत.या महामार्गाच्या विरोधात यापूर्वीही श्रमजीवी संघटना आणि स्थानिक तरुणांनी अनेक आंदोलने केली आहेत .          गेल्या वर्षी डॉ.नेहा शेख या तरुणीचा या महामार्गावर अपघाती मृत्यू झाल्यावर तरुणांनी आंदोलन करीत या रस्त्यावरील कवाड येथील टोल नाका बंद केला परंतु आजपर्यंतही परिस्थिती बदलली नसून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि येथील लोकप्रतिनिधीनी याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केले असल्याने श्रमजीवी संघटनेचे जिल्हा युवा प्रमुख प्रमोद पवार यांनी आणि संपूर्ण महामार्गावरील स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन बुधवारी युवा क्रांतिकारक स्व. वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मदिवशी या महामार्गावरील आपल्या आपल्या गावाशेजारील रस्ता "माझा रस्ता माझी जबाबदारी" अश्या प्रकारचे आगळेवेगळे धोरण ठरवून श्रमदान करून या महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. आज डाकीवली पुलापासून थेट महापोली गावापर्यंत मालबिडी, महापोली, अंबाडी नाका, पालखाने, वारेट, रेवदी, धोंडवडली दुगाड, इत्यादी भागातील तरुणांनी या भागात साहित्य जमा करून स्वतः कुदळ फावडे हातात घेऊन खड्डे भरले.            यावेळी श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार, भूषण घोडविंदे, असगर पटेल, आर्यन ग्रुपचे कल्पेश (बाळू) जाधव, पालखने माजी सरपंच रमाकांत पाटील,रुपेश जाधव, भुषण जाधव, अकलोली भागातील श्रमजीवी कार्यकर्ते जयेश पाटील, नारायण जोशी, नवनाथ भोये, तसेच महेश ठाकरे, नईम शेख, अल्पेश जाधव, सतीश जाधव, मालबिडीचे सागर डी.जाधव, युवक काँग्रेसचे कल्पेश पाटील, राकेश जाधव, आणि अजय तनपुरे, अंकुश तनपुरे,  संजय पाटील ,रामदास पाटील इत्यादी तरुणांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीroad safetyरस्ते सुरक्षा