शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम ग्रामीण भागात फसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 1:12 AM

दोन लाख अंगणवाडी सेविकांचे असहकार्य । बालकांचा जीव धोक्यात येण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ अभियान हाती घेतले आहे. मात्र, या अभियानाचे काम करण्यास राज्यातील दोन लाखांपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी नकार दिला आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री, महिला बालविकास मंत्र्यांना निवेदनाद्वारे सूचित केले आहे, अशी माहिती येथील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. एम.ए. पाटील यांनी दिली. यामुळे ग्रामीण भागात हे अभियान फसल्यात जमा असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.या अभियानातील पथकामधील अंगणवाडी कार्यकर्तीने दररोज ५० घरांना भेटी देऊन तापाची तपासणी करणे, गरज पडल्यास इतर सुविधा देणे याबरोबरच घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रोकोविड, कोविड व पोस्टकोविड आदींचे मार्गदर्शन करावयाचे सूचित केले आहे.सुमारे ४० दिवस चालणाऱ्या या अभियानाचे काम करून अंगणवाडी सेविकांना त्यांचे रोजचे नियमित आहारवाटप, लसीकरण, वजन घेणे, गृहभेटी, पालकांच्या ग्रुपवरून मार्गदर्शन, शक्य तिथे मुलांशी संवाद, सीएएसवर फोटो, माहिती अपलोड करणे आणि दहा दिवस पोषण महिना साजरा करणे आदी कामे करावी लागणार आहेत. याशिवाय सॅम या कुपोषित बालकांच्या घरी प्राधान्याने भेटी द्याव्या लागणार आहेत. पण अंगणवाडी कर्मचारी या माणूस आहेत, रोबोट नाहीत, त्यांनाही स्वत:चे कुटुंब आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना वेळ द्यावाच लागतो. याकडे महिला व बालकल्याण विभागाने दुर्लक्ष केलेले आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.दैनंदिन काम सांभाळून १२ तास तपासणी कशी करणार?अंगणवाडी सेविकांत ५० ते ५५ वयोगटातील संख्या मोठी आहे. ब्लडप्रेशर, मधुमेहाने त्या त्रस्तही असू शकतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी, सौम्य झालेली असू शकते. त्यांना या अभियानाद्वारे रोज ५० गृहभेटींना पाठवून कसे चालेल? इतर सर्व विभागांनी ५५ वर्षांवरील व आजारी व्यक्तींना कोविडसंबंधी कामांतून वगळलेले आहे. मग महिला बालकल्याण विभाग याचा विचार करणार की नाही? अंगणवाडी सेविकांना ५० गृहभेटी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. एका गृहभेटीसाठी सुमारे २० मिनिटे म्हणजेच ५० गृहभेटी पूर्ण करण्यासाठी एक हजार मिनिटे लागतील. म्हणजे, त्यांना नित्याचे काम व पोषण आहाराचे काम सांभाळून, सुमारे १० ते १२ तास विनामूल्य काम करावे लागेल, त्यामुळे या अभियानाचे काम करणे हे त्यांच्यासाठी अव्यवहार्य व अशक्य असल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.५० घरांना भेटी दिल्यानंतर बालकांना संसर्गाची भीतीकोरोना संसर्ग वाढत चालला आहे. कंटेनमेंट झोन रोज वाढत आहेत, अशा कठीण जोखमीच्या अवस्थेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ५० घरांना भेटी दिल्यावर पुन्हा अंगणवाडीत नियमित कामे करावयाची म्हटले तर छोटी मुले, गरोदर व स्तनदा माता या अतिसंवेदनशील गटात त्यांना मिसळावे लागेल. जर या गटाला अंगणवाडी कर्मचाºयांमुळे संसर्ग लागलाच तर जबाबदार कोण? स्थानिक जनतेच्या रोषाचा पहिला बळी अंगणवाडी कर्मचारी ठरतील, अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस