शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

चिखलोली धरणाच्या काठावर आढळलेल्या तरुणाची हत्या? गणपत गायकवाड यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 04:59 IST

अंबरनाथच्या चिखलोली धरणाच्या काठावर धुळवडीच्या दिवशी आढळलेल्या आनंद मुकुंदे या तरुणाच्या मृतदेहाचा पंचनामा करुन पोलिसांनी बुडून मृत्यू झाल्याची नोंद केली.

अंबरनाथ : अंबरनाथच्या चिखलोली धरणाच्या काठावर धुळवडीच्या दिवशी आढळलेल्या आनंद मुकुंदे या तरुणाच्या मृतदेहाचा पंचनामा करुन पोलिसांनी बुडून मृत्यू झाल्याची नोंद केली. या तरुणाची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला असतानाच पोलिसांनी खोटा पंचनामा करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजप आ. गणपत गायकवाड यांनी केला आहे.मुकुंदे हा कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा परिसरात राहणारा आहे. २९ मार्च रोजी मित्रांसोबत अंबरनाथच्या धरणावर जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला. मात्र, तो घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्या कुटुंबीयांनी मिसिंगची तक्रार नोंदविली. मात्र, त्यानंतर त्याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. मुकुंदे याचा मृतदेह पाहिला असता त्यावर मारहाणीच्या खुणा असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. मात्र, पोलिसांच्या पंचनाम्यात आणि पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये याचा उल्लेख नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा हत्येचा प्रकार असला तरी पोलीस आणि डॉक्टर्स मिळून तो दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे, २९ मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजता मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता पोस्टमॉर्टेम उरकण्यात आले. वास्तविक ज्या मृतदेहाची ओळख पटली नसेल त्याचे पोस्टमॉर्टेम तीन दिवसांनी केले जाते, असा कुटुंबीयांचा दावा आहे. ही बाब  आ. गायकवाड यांच्या कानावर कुटुंबीयांनी घातली असता गायकवाड यांनी मध्यवर्ती रुग्णालयात जाऊन डॉक्टर्स आणि पोलिसांची हजेरी घेतली. परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली. ज्या मित्रांसोबत आनंद हा चिखलोली धरणावर गेला त्या तीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मृत मुकुंदे याचं मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा पोस्टमॉर्टेम करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून मृतदेह मुंबईला पाठविला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीambernathअंबरनाथthaneठाणे