शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

अर्जुन काळेची हत्या की अपघात? उल्हासनगरात कलानी व गंगोत्री पुन्हा आमने-सामने

By सदानंद नाईक | Updated: May 23, 2023 15:53 IST

 उल्हासनगर कॅम्प नं-४ भाटिया चौकात १७ मे रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान अर्जुन काळे नावाचा तरुण जखमी अवस्थेत पडलेला होता

सदानंद नाईक उल्हासनगर : गंगोत्री यांच्या बंगल्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावर गंभीररीत्या जखमी अवस्थेत पडलेल्या अर्जुन काळे नावाच्या तरुणांचा २० मे रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृत्यूला गंगोत्री कारणीभूत असल्याचा आरोप ओमी कलानी यांनी केल्याने, कलानी व भारत गंगोत्री यांच्यात सामना रंगला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-४ भाटिया चौकात १७ मे रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान अर्जुन काळे नावाचा तरुण जखमी अवस्थेत पडलेला होता. राष्ट्रवादी पक्षाचे नेते भारत गंगोत्री यांना याबाबत माहिती मिळाल्यावर, त्यांनी घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्जुन काळे याला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तब्येत खालावल्याने, पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. २० मे रोजी सकाळी अर्जुन यांचा मृत्यू झाला. मयत अर्जुन काळे याच्या नातेवाईकांनी अर्जुनला गंगोत्री यांच्या माणसांनी मारहाण केल्याने, मृत्यू झाला. असा आरोप झाला. तर अर्जुन यांनी कोणाचा तरी मोबाईल हिसकावून पळून जात असतांना भाटिया चौकात अपघात होऊन त्यामध्ये अर्जुन जखमी झाल्याचे, भारत गंगोत्री यांचे म्हणणे आहे. 

दरम्यान भारत गंगोत्री यांचे एकाच पक्षातील राजकीय विरोधक ओमी कलानी यांनी मात्र गंगोत्री यांच्यावर अर्जुन काळे प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली. मयत अर्जुन काळे यांचे आई-वडील, गर्भवती पत्नी यांनी कलानी यांच्याकडे न्यायाची व कारवाईची मागणी केली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी अर्जुन याचा अपघात आहे की दुसरा प्रकार त्याच्या सोबत घडला याचा तपास करीत असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे यांची तपासणी केली जात असल्याची माहिती पोलीस अधिकारी गायकवाड यांनी दिली. एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा गंगोत्री व कलानी सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे.  

अर्जुन काळे याची हत्या अर्जुन काळे याला मारहाण झाल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पत्नी व आई-वडिलांनी केला. जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही. तो पर्यंत अर्जुनवर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. तर अर्जुन याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे गंगोत्री यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात