शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

अर्जुन काळेची हत्या की अपघात? उल्हासनगरात कलानी व गंगोत्री पुन्हा आमने-सामने

By सदानंद नाईक | Updated: May 23, 2023 15:53 IST

 उल्हासनगर कॅम्प नं-४ भाटिया चौकात १७ मे रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान अर्जुन काळे नावाचा तरुण जखमी अवस्थेत पडलेला होता

सदानंद नाईक उल्हासनगर : गंगोत्री यांच्या बंगल्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावर गंभीररीत्या जखमी अवस्थेत पडलेल्या अर्जुन काळे नावाच्या तरुणांचा २० मे रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृत्यूला गंगोत्री कारणीभूत असल्याचा आरोप ओमी कलानी यांनी केल्याने, कलानी व भारत गंगोत्री यांच्यात सामना रंगला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-४ भाटिया चौकात १७ मे रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान अर्जुन काळे नावाचा तरुण जखमी अवस्थेत पडलेला होता. राष्ट्रवादी पक्षाचे नेते भारत गंगोत्री यांना याबाबत माहिती मिळाल्यावर, त्यांनी घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्जुन काळे याला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तब्येत खालावल्याने, पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. २० मे रोजी सकाळी अर्जुन यांचा मृत्यू झाला. मयत अर्जुन काळे याच्या नातेवाईकांनी अर्जुनला गंगोत्री यांच्या माणसांनी मारहाण केल्याने, मृत्यू झाला. असा आरोप झाला. तर अर्जुन यांनी कोणाचा तरी मोबाईल हिसकावून पळून जात असतांना भाटिया चौकात अपघात होऊन त्यामध्ये अर्जुन जखमी झाल्याचे, भारत गंगोत्री यांचे म्हणणे आहे. 

दरम्यान भारत गंगोत्री यांचे एकाच पक्षातील राजकीय विरोधक ओमी कलानी यांनी मात्र गंगोत्री यांच्यावर अर्जुन काळे प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली. मयत अर्जुन काळे यांचे आई-वडील, गर्भवती पत्नी यांनी कलानी यांच्याकडे न्यायाची व कारवाईची मागणी केली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी अर्जुन याचा अपघात आहे की दुसरा प्रकार त्याच्या सोबत घडला याचा तपास करीत असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे यांची तपासणी केली जात असल्याची माहिती पोलीस अधिकारी गायकवाड यांनी दिली. एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा गंगोत्री व कलानी सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे.  

अर्जुन काळे याची हत्या अर्जुन काळे याला मारहाण झाल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पत्नी व आई-वडिलांनी केला. जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही. तो पर्यंत अर्जुनवर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. तर अर्जुन याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे गंगोत्री यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात