शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मारहाणीच्या घटनेशी संबंधच नाही: हल्लेखोरांनीच रचले कुभांड, नगरसेवक विकास रेपाळे यांचा दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 22:41 IST

कशिश पार्कच्या गेटवर रविवारी रात्री घडलेल्या हाणामारीच्या घटनेशी आपला कोणत्याही प्रकारे संबंध नाही. याऊलट, सागर मेटकरी आणि प्रशांत जाधव यांनीच हल्ला झाल्याचे कुभांड रचले. राजकीय सूड आणि वैयक्तिक आकसातून त्यांनीच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केला.

ठाणे, दि. २६ -  कशिश पार्कच्या गेटवर रविवारी रात्री घडलेल्या हाणामारीच्या घटनेशी आपला कोणत्याही प्रकारे संबंध नाही. याऊलट, सागर मेटकरी आणि प्रशांत जाधव यांनीच हल्ला झाल्याचे कुभांड रचले. राजकीय सूड आणि वैयक्तिक आकसातून त्यांनीच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केला. सागर मेटकरीने कसे स्वत:च डोके आपटून घेतले, याचा भंडाफोडही त्यांनी एका सीसीटीव्हीद्वारे यावेळी केला.रविवारी रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास कशिश पार्कच्या गेटसमोर वागळे इस्टेट विभागाचे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सागर मेटकरी आणि धनंजय कावळे यांच्यावर पूर्व राजकीय वैमनस्यातून सोनू पाल आणि त्याच्या काही साथीदारांनी हल्ला केल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल आहे. हा हल्ला रेपाळे यांच्या इशाºयाने केल्याचा संशय व्यक्त करून त्यांच्या अटकेची मागणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाºयांनी वागळे इस्टेट पोलिसांकडे केली होती.याच पार्श्वभूमीवर रेपाळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. मुळात, २४ सप्टेंबर रोजी रात्री ज्यावेळी हा मारहाणीचा प्रकार घडला त्यावेळी आपण अंधेरी येथे होतो. आपण घरी नसल्याचा फायदा घेऊन आपल्या वृद्ध आईवडिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात सागर मेटकरी, प्रशांत जाधव, गणेश, योगेश सदावर्ते आदींच्याविरुद्ध २४ सप्टेंबर रोजी रात्री तक्रार दाखल केली. ती दाखल होताच मेटकरी आणि धनंजय कावळे यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचा कांगावा केला. प्रत्यक्षात मेटकरी आणि त्याच्या सहकाºयांमध्येच आपसात वाद होऊन त्यांनी हाणामारी केल्याचा आरोप करून तसे सीसीटीव्ही फूटेजही रेपाळे यांनी दिले. त्यानंतर कशिश पार्कच्या आवारातही मेटकरीने चार वेळा स्वत:च भिंतीवर कशा प्रकारे डोके आपटले याचेही सीसीटीव्हीतील चित्रण त्यांनी यावेळी दाखविले. जीमच्या विरोधाचा वादजीमच्या विराधामुळे हा मूळ वाद असल्याचे रेपाळे यांनी यावेळी सांगितले. आपण प्रभागामध्ये नागरिकांसाठी जीमचे बांधकाम केले आहे. त्याला प्रशांत जाधव यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांचा विरोध आहे. ती बांधली जाऊ नये आणि तिला वापर परवाना देऊ नये, अशी त्यांची मागणी आहे. हा वाद न्यायालयातही सुरू आहे. ठाणे न्यायालयाने या बांधकामाला १२ एप्रिल २०१७ ला स्थगितीही दिली. पण, उच्च न्यायालयाने जून २०१७ मध्ये आणि सर्वोच्च न्यायालयाने २० जुलै २०१७ रोजी स्थगिती आदेश रद्द केला. त्यामुळेच वैफल्यग्रस्त होऊन प्रशांत जाधव आणि त्याचे साथीदार कोणत्या ना कोणत्या मार्गे वाद घडवून आणत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Crimeगुन्हा