शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील विवाहितेवर सामुहिक लैंगिक अत्याचारानंतर खून: तिघांना अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: July 12, 2024 17:41 IST

डायघर पाेलिसांची कामगिरी: मंदिरातील सेवेकऱ्यांचे घृणास्पद कृत्य

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: सासूसह पतीशी झालेल्या काैटुंबिक वादातून नवी मुंबईतील घरातून बाहेर पडून डायघरमधील मंदिरात थांबलेल्या एका ३० वषीर्य विवाहितेवर सामुहिक बलात्कार करुन तिचा खून करणाऱ्या श्यामसुंदर प्यारचंद शर्मा (६२, कोटा, राजस्थान) याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती ठाण्याचे पाेलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी शुक्रवारी दिली. तिघांनाही १० जुलैपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

शिळगाव येथील घोळ गणपती मंदिराच्या मागे या महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत ९ जुलै २०२४ रोजी डायघर पाेलिसांना मिळाला हाेता. तिच्या शरीरावर जखमा असल्याने तिचा खून झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली हाेती. त्यानुसार शिळडायघर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम १०३(१) नुसार खूनाचा गुन्हा दाखल झाला.चाैकशीमध्ये नवी मुंबईच्या एनआरआय पोलीस ठाण्यात बेलापूर गावातून एक महिला बेपत्ता असल्याची माहिती समाेर आली. ती बेपत्ता असल्याची तिच्या वडिलांनी एनआरआय पाेलिस ठाण्यात ६ जुलै २०२४ राेजी तक्रारही दाखल केली हाेती. ओळख पटल्यानंतर याप्रकरणी डायघर पाेलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला हाेता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पाेलिस निरीक्षक महेश काळे, अब्दुल मलीक, उपनिरीक्षक संकेत शिंदे आदींची तीन पथके बनवून आरोपींचा शोध सुरू केला.

घटनास्थळी मिळालेले सीसीटीव्हीतील फुटेज पडताळल्यानंतर डायघर भागातील घोळ गणपती मंदिर आणि गौशाला परिसरातील संताेषकुमार मिश्रा (४५, रा. प्रतापगड, उत्तरप्रदेश) राजकुमार पांडे (५४, रा. उत्तरप्रदेश) या दोघांना मंदिर परिसरातूनच ताब्यात घेतले. त्यांना ‘बाेलते’ केल्यानंतर त्यांनी तिच्या खूनाची कबूली दिली. त्यांचा साथीदार श्यामसुंदर शर्मा या तिघांनी मिळून रात्रीच्या वेळी मंदिरात थांबलेल्या या महिलेला चहामध्ये भांगेच्या गाेळया टाकून गुंगीमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचीही कबूली दिली. शुद्ध आल्यावर तिने आरडाओरडा केल्यामुळे, तिने या प्रकाराची वाच्यता करु नये म्हणून मंदिरामागील दरीत नेऊन दगडाने तिची हत्या केल्याचेही या चाैकशीत त्यांनी सांगितले. तिसरा आरोपी शर्मा याला मानखुर्द भागातून अटक केली.

घोळ गणपती परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीचे केबल तोडून आराेपींनी पुरावाही नष्ट केला हाेता. मात्र, तांत्रिक तपासाच्या आधारावर त्यांना पाेलिसांनी अटक केली.

मानसिक तणावामुळे विवाहिता मंदिरात थांबली-

काैटुंबिक वादातून मानसिक तणावाखाली असल्याने ही महिला नवी मुंबईतून ६ जुलै राेजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील शीळगाव मधील घाेळगणपती परिसरात आली हाेती. दरम्यान, या मंदिराचे पुरारी हे काही कामानिमित्त ५ जुलै राेजी गावी गेले. जाण्यापूवीर् त्यांनी श्यामसुंदरसह तिघांना त्याठिकाणी मंदिराच्या सेवेसाठी ठेवले हाेते. त्यांनी मात्र, एकटया महिलेला गाठून तिला आसरा देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर शुद्ध आल्यानंतर तिने आरडाओरड करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा या तिघांनीही तिचे डोके जमिनीवर आपटून गळा दाबून तिचा खून केल्याचे उघड झाले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी