शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मीरारोडच्या शांतीनगरमध्ये फेरीवाल्यांना बसण्यास पालिकेची मनाई; कारवाई वरून पुन्हा तणाव

By धीरज परब | Updated: December 10, 2023 14:48 IST

Mira Road News: मीरारोडच्या शांती नगर मधील अरुंद रस्ते व नाक्यांवर बसलेल्या फेरीवाल्यांना सदर परिसर हा ना फेरीवाला क्षेत्र असल्याने तेथे धंदे लावू नये असे पत्र पालिकेने जारी केले . मात्र त्या नंतर देखील फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने पालिकेच्या कारवाई वरून तणाव होत आहे .

- धीरज परब मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर मधील अरुंद रस्ते व नाक्यांवर बसलेल्या फेरीवाल्यांना सदर परिसर हा ना फेरीवाला क्षेत्र असल्याने तेथे धंदे लावू नये असे पत्र पालिकेने जारी केले . मात्र त्या नंतर देखील फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने पालिकेच्या कारवाई वरून तणाव होत आहे . तर प्रतिबंधित क्षेत्रातील फेरीवाल्यांवर कारवाई न करता महापालिका केवळ शांती नगर मध्येच कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी फेरीवाल्यांच्या संघटनेने पालिकेवर केला आहे . 

शांती नगर ह्या जुन्या वसाहतीच्या ले आउट मधील असलेले रस्ते हे अरुंद असताना येथील प्रमुख चौक व रस्त्यांवर बसणाऱ्या फेरीवाल्यां मुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी व लोकांना चालण्यास जागाच नसते . इमारतींचे प्रवेशद्वार सुद्धा अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत . त्यातच चोऱ्या , छेडछाड , दादागिरी व गुंडगिरी चालत असल्याने फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी होत आहे . 

काही दिवसं पूर्वी फेरीवाल्यांनी एका दुकानदारास मारहाण केल्याच्या घटने नंतर असंतोषाचा भडका उडाला . आमदार गीता जैन व प्रताप सरनाईक सह बहुतांश  राजकीय पक्षांनी देखील फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली . महापालिकेने मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई सुरु केली . मध्यंतरी दिवाळी निमित्त फेरीवाल्यांना काही दिवस धंदा करण्यास मोकळीक देण्यात आली होती . 

सदर परिसर हा पूर्वी पासूनच महापालिकेने ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केलेला असल्याने त्याठिकाणी फेरीवाल्यांना बसता येणार नाही असे पत्र पालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी फेरीवाला संघटना व फेरीवाल्यांना दिले . 

मात्र त्या नंतर देखील फेरीवाले येऊन बसत असल्याने शुक्रवारी रात्री पालिकेने कारवाई करण्यास घेतली असता फेरीवाल्यांनी कारवाईला विरोध करत अरेरावी - दादागिरी चालविल्याने तणाव निर्माण झाल्याचे रहिवाश्यांनी सांगितले . शनिवारी रात्री सुद्धा फेरीवाले मोठ्या संख्येने बसले होते . तर पोलिसांचा बंदोबस्त न मिळाल्याने पालिकेला फेरीवाल्यांवर कारवाई करता आली नाही असे सांगितले जाते.

दरम्यान फेरीवाला संघटनेच्या नेत्याने मात्र , रेल्वे स्थानक , शाळा , धार्मिक स्थळे आदी परिसरात फेरीवाले बसत असताना तिकडे पालिका कारवाई करत नाही असा आरोप केला . केवळ शांती नगर मधीलच फेरीवाले पालिकेला दिसतात का ? असा सवाल करत मुंबई सह शहरातील सर्व फेरीवाल्यांना शांती नगर मध्ये बसवून आंदोलन करू असा इशारा देखील पालिका व पोलिसांना दिला आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरmira roadमीरा रोड