शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

मीरारोडच्या शांतीनगरमध्ये फेरीवाल्यांना बसण्यास पालिकेची मनाई; कारवाई वरून पुन्हा तणाव

By धीरज परब | Updated: December 10, 2023 14:48 IST

Mira Road News: मीरारोडच्या शांती नगर मधील अरुंद रस्ते व नाक्यांवर बसलेल्या फेरीवाल्यांना सदर परिसर हा ना फेरीवाला क्षेत्र असल्याने तेथे धंदे लावू नये असे पत्र पालिकेने जारी केले . मात्र त्या नंतर देखील फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने पालिकेच्या कारवाई वरून तणाव होत आहे .

- धीरज परब मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर मधील अरुंद रस्ते व नाक्यांवर बसलेल्या फेरीवाल्यांना सदर परिसर हा ना फेरीवाला क्षेत्र असल्याने तेथे धंदे लावू नये असे पत्र पालिकेने जारी केले . मात्र त्या नंतर देखील फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने पालिकेच्या कारवाई वरून तणाव होत आहे . तर प्रतिबंधित क्षेत्रातील फेरीवाल्यांवर कारवाई न करता महापालिका केवळ शांती नगर मध्येच कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी फेरीवाल्यांच्या संघटनेने पालिकेवर केला आहे . 

शांती नगर ह्या जुन्या वसाहतीच्या ले आउट मधील असलेले रस्ते हे अरुंद असताना येथील प्रमुख चौक व रस्त्यांवर बसणाऱ्या फेरीवाल्यां मुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी व लोकांना चालण्यास जागाच नसते . इमारतींचे प्रवेशद्वार सुद्धा अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत . त्यातच चोऱ्या , छेडछाड , दादागिरी व गुंडगिरी चालत असल्याने फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी होत आहे . 

काही दिवसं पूर्वी फेरीवाल्यांनी एका दुकानदारास मारहाण केल्याच्या घटने नंतर असंतोषाचा भडका उडाला . आमदार गीता जैन व प्रताप सरनाईक सह बहुतांश  राजकीय पक्षांनी देखील फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली . महापालिकेने मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई सुरु केली . मध्यंतरी दिवाळी निमित्त फेरीवाल्यांना काही दिवस धंदा करण्यास मोकळीक देण्यात आली होती . 

सदर परिसर हा पूर्वी पासूनच महापालिकेने ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केलेला असल्याने त्याठिकाणी फेरीवाल्यांना बसता येणार नाही असे पत्र पालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी फेरीवाला संघटना व फेरीवाल्यांना दिले . 

मात्र त्या नंतर देखील फेरीवाले येऊन बसत असल्याने शुक्रवारी रात्री पालिकेने कारवाई करण्यास घेतली असता फेरीवाल्यांनी कारवाईला विरोध करत अरेरावी - दादागिरी चालविल्याने तणाव निर्माण झाल्याचे रहिवाश्यांनी सांगितले . शनिवारी रात्री सुद्धा फेरीवाले मोठ्या संख्येने बसले होते . तर पोलिसांचा बंदोबस्त न मिळाल्याने पालिकेला फेरीवाल्यांवर कारवाई करता आली नाही असे सांगितले जाते.

दरम्यान फेरीवाला संघटनेच्या नेत्याने मात्र , रेल्वे स्थानक , शाळा , धार्मिक स्थळे आदी परिसरात फेरीवाले बसत असताना तिकडे पालिका कारवाई करत नाही असा आरोप केला . केवळ शांती नगर मधीलच फेरीवाले पालिकेला दिसतात का ? असा सवाल करत मुंबई सह शहरातील सर्व फेरीवाल्यांना शांती नगर मध्ये बसवून आंदोलन करू असा इशारा देखील पालिका व पोलिसांना दिला आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरmira roadमीरा रोड