गृहविलगीकरणातील रुग्णांनी वाढविली महापालिकेची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:24+5:302021-06-03T04:28:24+5:30

ठाणे : राज्य शासनाने १८ जिल्ह्यांत गृहविलगीकरण बंद केल्याने ठाणे महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील अशा रुग्णांना अलगीकरण केंद्रात ...

Municipal concerns raised by homelessness patients | गृहविलगीकरणातील रुग्णांनी वाढविली महापालिकेची चिंता

गृहविलगीकरणातील रुग्णांनी वाढविली महापालिकेची चिंता

Next

ठाणे : राज्य शासनाने १८ जिल्ह्यांत गृहविलगीकरण बंद केल्याने ठाणे महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील अशा रुग्णांना अलगीकरण केंद्रात दाखल होण्याची विनंती केली आहे. परंतु, घरी योग्य प्रकारच्या सोयीसुविधा आहेत, काम थांबेल, इंटरनेटची सुविधा मिळणार नाही. घरचे जेवण मिळणार नाही, अशी विविध कारणे देऊन ते अलगीकरण केंद्रात जाण्यास टाळाटाळ करीत असल्याने महापालिकेची चिंता वाढली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत एक लाख २८ हजार कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. त्यातील एक लाख पाच हजार ५२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर एक हजार ९१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार ५३७ रुग्णांवर प्रत्यक्ष स्वरुपात उपचार सुरू आहेत. त्यातील ५८२ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. तर ७०७ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. २४८ रुग्ण गंभीर असून, १६७ आयसीयू आणि ८१ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. आजही ५४९ रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. यातील ५० टक्के रुग्ण हे राज्य शासनाचा आदेश होण्यापूर्वीचे असून, उर्वरित नंतरचे आहेत.

काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने राज्यातील १८ जिल्ह्यांत गृहविलगीकरण बंद केल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेनेदेखील ते बंद केले आहे. परंतु, असे असले तरी घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांनी महापालिकेच्या अलगीकरण केंद्रात उपचारासाठी दाखल व्हावे, अशी विनंती महापालिका त्यांना करीत आहे. परंतु, ते जाण्यास तयार नाहीत, आम्ही घरीच बरे होऊ असे सांगत आहेत. घरात असलो तरी आमची खोली वेगळी आहे, वॉशरूम वेगळा आहे, तसेच घरी जे हवे ते वेळेत खाण्यासही मिळत आहे, अशी कारणे ते देत आहेत. यापुढेही जाऊन कोरोना झाला असला तरी लक्षणे नसल्याने घरी बसून काम करता येत आहे, कामाचे खाडे होत नाहीत, कामामुळे इतर कोणत्याही गोष्टींचा विचार मनात येत नाही. काम करण्यासाठी इंटरनेट आणि लॅपटॉपची सुविधादेखील आहे. परंतु, अलगीकरण केंद्रात दाखल झाल्यानंतर खाण्यापिण्याचे हाल ते होतीलच, शिवाय तेथे दिवस काढणेदेखील कठीण होणार आहे. तसेच कपड्यांची बॅग घेऊन पुन्हा घरच्यांपासून वेगळे होऊन त्यांच्याही मनात भीती निर्माण होणार आहे, अशीही कारणे देऊन ते अलगीकरण केंद्रात उपचार घेण्यासाठी दाखल होत नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Web Title: Municipal concerns raised by homelessness patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.