शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

भिवंडीत वाहनतळ उभारण्यात मनपा प्रशासन अपयशी; टोईंग व्हॅन व रोजच्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

By नितीन पंडित | Updated: February 23, 2024 19:37 IST

रस्त्यावर होणाऱ्या व्हॅन पार्किंगमुळे शहरात टोईंग व्हॅन वलीनकडून करवी करण्यात येते मात्र य टोईंग व्हॅनच्या मध्यमतून मोठी आर्थिक वसुली होत असल्याने टोईंग व्हॅनवाले वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्या ऐवजी फक्त वसुलीकडे लक्ष देत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

भिवंडी: शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून वंजारपट्टी नाका ते अंजुर फाटा तसेच कल्याण भिवंडी रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी प्रवाशांसह नागरिकांसाठी रोजची डोकेदुखी ठरली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून ही अतिक्रमणे मनपा प्रशासनाकडून दुर्लक्षित केली जात असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त वाहन तळ उभारण्यात मनपा प्रशासनास अपयश आल्याने शहरात कामानिमित्त अथवा वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या गाड्यांवर व दुचाकींवर वाहतूक पोलिसांकडून तसेच टोइंग व्हॅन वाले उचलून घेऊन जात असल्याने चालकांसह नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

भिवंडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मनपा मुख्यालय,उपजिल्हा रुग्णालय,बँक,तहसीलदार कार्यालय,प्रांत कार्यालय,पंचायत समिती कार्यालय,तालुका पोलीस ठाणे,एसीपी व डीसीपी कार्यालय,भिवंडी न्यायालय,बस आगार,सिनेमागृह,राजकीय नेते व आमदार खासदार यांची कार्यालये आहेत.त्यामुळे येथे रोजच हजारो नागरिकांसह प्रवाशांची ये जा असते मात्र या ठिकाणी मनपाने कोणतेही वाहन तळ उभारले नसल्याने नागरिकांना आपल्या गाड्या रस्त्यावरच पार्क कराव्या लागतात.उड्डाणपुलाखाली वाहन पार्किंग करू शकत नसल्याचा शासकीय आदेशकडे बोट दखवून येथील उड्डाणपुलांखाली सुशोभीकरणाच्या नावाखाली उड्डाणपुलाखालील जागा बंदिस्त करण्यात आली आहे.त्यामुळे नगरिकांना आपली वाहने पार्क करतांना मोठी अडचण निर्मण झली आहे.

रस्त्यावर होणाऱ्या व्हॅन पार्किंगमुळे शहरात टोईंग व्हॅन वलीनकडून करवी करण्यात येते मात्र य टोईंग व्हॅनच्या मध्यमतून मोठी आर्थिक वसुली होत असल्याने टोईंग व्हॅनवाले वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्या ऐवजी फक्त वसुलीकडे लक्ष देत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. वाहन तळाच्या नावाने मनपा प्रशासनाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आरक्षित जागेवर वाहन तळ उभारले आहे.नोव्हेंम्बर २०२१ मध्ये या वाहन तळाचे उदघाटन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील त्यांच्या हस्ते झाले होते.मात्र हे वाहन तळ शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी उपयोगी नसल्याने उदघाटना नंतर अवघ्या काही दिवसांमध्येच बंद पडले.ते आजपर्यंत बंदच आहे.त्यामुळे भिवंडीत वाहतूक कोंडी व वाहन पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी