शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

भिवंडीत वाहनतळ उभारण्यात मनपा प्रशासन अपयशी; टोईंग व्हॅन व रोजच्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

By नितीन पंडित | Updated: February 23, 2024 19:37 IST

रस्त्यावर होणाऱ्या व्हॅन पार्किंगमुळे शहरात टोईंग व्हॅन वलीनकडून करवी करण्यात येते मात्र य टोईंग व्हॅनच्या मध्यमतून मोठी आर्थिक वसुली होत असल्याने टोईंग व्हॅनवाले वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्या ऐवजी फक्त वसुलीकडे लक्ष देत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

भिवंडी: शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून वंजारपट्टी नाका ते अंजुर फाटा तसेच कल्याण भिवंडी रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी प्रवाशांसह नागरिकांसाठी रोजची डोकेदुखी ठरली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून ही अतिक्रमणे मनपा प्रशासनाकडून दुर्लक्षित केली जात असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त वाहन तळ उभारण्यात मनपा प्रशासनास अपयश आल्याने शहरात कामानिमित्त अथवा वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या गाड्यांवर व दुचाकींवर वाहतूक पोलिसांकडून तसेच टोइंग व्हॅन वाले उचलून घेऊन जात असल्याने चालकांसह नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

भिवंडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मनपा मुख्यालय,उपजिल्हा रुग्णालय,बँक,तहसीलदार कार्यालय,प्रांत कार्यालय,पंचायत समिती कार्यालय,तालुका पोलीस ठाणे,एसीपी व डीसीपी कार्यालय,भिवंडी न्यायालय,बस आगार,सिनेमागृह,राजकीय नेते व आमदार खासदार यांची कार्यालये आहेत.त्यामुळे येथे रोजच हजारो नागरिकांसह प्रवाशांची ये जा असते मात्र या ठिकाणी मनपाने कोणतेही वाहन तळ उभारले नसल्याने नागरिकांना आपल्या गाड्या रस्त्यावरच पार्क कराव्या लागतात.उड्डाणपुलाखाली वाहन पार्किंग करू शकत नसल्याचा शासकीय आदेशकडे बोट दखवून येथील उड्डाणपुलांखाली सुशोभीकरणाच्या नावाखाली उड्डाणपुलाखालील जागा बंदिस्त करण्यात आली आहे.त्यामुळे नगरिकांना आपली वाहने पार्क करतांना मोठी अडचण निर्मण झली आहे.

रस्त्यावर होणाऱ्या व्हॅन पार्किंगमुळे शहरात टोईंग व्हॅन वलीनकडून करवी करण्यात येते मात्र य टोईंग व्हॅनच्या मध्यमतून मोठी आर्थिक वसुली होत असल्याने टोईंग व्हॅनवाले वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्या ऐवजी फक्त वसुलीकडे लक्ष देत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. वाहन तळाच्या नावाने मनपा प्रशासनाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आरक्षित जागेवर वाहन तळ उभारले आहे.नोव्हेंम्बर २०२१ मध्ये या वाहन तळाचे उदघाटन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील त्यांच्या हस्ते झाले होते.मात्र हे वाहन तळ शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी उपयोगी नसल्याने उदघाटना नंतर अवघ्या काही दिवसांमध्येच बंद पडले.ते आजपर्यंत बंदच आहे.त्यामुळे भिवंडीत वाहतूक कोंडी व वाहन पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी