शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत वाहनतळ उभारण्यात मनपा प्रशासन अपयशी; टोईंग व्हॅन व रोजच्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

By नितीन पंडित | Updated: February 23, 2024 19:37 IST

रस्त्यावर होणाऱ्या व्हॅन पार्किंगमुळे शहरात टोईंग व्हॅन वलीनकडून करवी करण्यात येते मात्र य टोईंग व्हॅनच्या मध्यमतून मोठी आर्थिक वसुली होत असल्याने टोईंग व्हॅनवाले वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्या ऐवजी फक्त वसुलीकडे लक्ष देत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

भिवंडी: शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून वंजारपट्टी नाका ते अंजुर फाटा तसेच कल्याण भिवंडी रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी प्रवाशांसह नागरिकांसाठी रोजची डोकेदुखी ठरली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून ही अतिक्रमणे मनपा प्रशासनाकडून दुर्लक्षित केली जात असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त वाहन तळ उभारण्यात मनपा प्रशासनास अपयश आल्याने शहरात कामानिमित्त अथवा वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या गाड्यांवर व दुचाकींवर वाहतूक पोलिसांकडून तसेच टोइंग व्हॅन वाले उचलून घेऊन जात असल्याने चालकांसह नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

भिवंडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मनपा मुख्यालय,उपजिल्हा रुग्णालय,बँक,तहसीलदार कार्यालय,प्रांत कार्यालय,पंचायत समिती कार्यालय,तालुका पोलीस ठाणे,एसीपी व डीसीपी कार्यालय,भिवंडी न्यायालय,बस आगार,सिनेमागृह,राजकीय नेते व आमदार खासदार यांची कार्यालये आहेत.त्यामुळे येथे रोजच हजारो नागरिकांसह प्रवाशांची ये जा असते मात्र या ठिकाणी मनपाने कोणतेही वाहन तळ उभारले नसल्याने नागरिकांना आपल्या गाड्या रस्त्यावरच पार्क कराव्या लागतात.उड्डाणपुलाखाली वाहन पार्किंग करू शकत नसल्याचा शासकीय आदेशकडे बोट दखवून येथील उड्डाणपुलांखाली सुशोभीकरणाच्या नावाखाली उड्डाणपुलाखालील जागा बंदिस्त करण्यात आली आहे.त्यामुळे नगरिकांना आपली वाहने पार्क करतांना मोठी अडचण निर्मण झली आहे.

रस्त्यावर होणाऱ्या व्हॅन पार्किंगमुळे शहरात टोईंग व्हॅन वलीनकडून करवी करण्यात येते मात्र य टोईंग व्हॅनच्या मध्यमतून मोठी आर्थिक वसुली होत असल्याने टोईंग व्हॅनवाले वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्या ऐवजी फक्त वसुलीकडे लक्ष देत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. वाहन तळाच्या नावाने मनपा प्रशासनाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आरक्षित जागेवर वाहन तळ उभारले आहे.नोव्हेंम्बर २०२१ मध्ये या वाहन तळाचे उदघाटन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील त्यांच्या हस्ते झाले होते.मात्र हे वाहन तळ शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी उपयोगी नसल्याने उदघाटना नंतर अवघ्या काही दिवसांमध्येच बंद पडले.ते आजपर्यंत बंदच आहे.त्यामुळे भिवंडीत वाहतूक कोंडी व वाहन पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी