शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

भिवंडीत वाहनतळ उभारण्यात मनपा प्रशासन अपयशी; टोईंग व्हॅन व रोजच्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

By नितीन पंडित | Updated: February 23, 2024 19:37 IST

रस्त्यावर होणाऱ्या व्हॅन पार्किंगमुळे शहरात टोईंग व्हॅन वलीनकडून करवी करण्यात येते मात्र य टोईंग व्हॅनच्या मध्यमतून मोठी आर्थिक वसुली होत असल्याने टोईंग व्हॅनवाले वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्या ऐवजी फक्त वसुलीकडे लक्ष देत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

भिवंडी: शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून वंजारपट्टी नाका ते अंजुर फाटा तसेच कल्याण भिवंडी रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी प्रवाशांसह नागरिकांसाठी रोजची डोकेदुखी ठरली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून ही अतिक्रमणे मनपा प्रशासनाकडून दुर्लक्षित केली जात असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त वाहन तळ उभारण्यात मनपा प्रशासनास अपयश आल्याने शहरात कामानिमित्त अथवा वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या गाड्यांवर व दुचाकींवर वाहतूक पोलिसांकडून तसेच टोइंग व्हॅन वाले उचलून घेऊन जात असल्याने चालकांसह नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

भिवंडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मनपा मुख्यालय,उपजिल्हा रुग्णालय,बँक,तहसीलदार कार्यालय,प्रांत कार्यालय,पंचायत समिती कार्यालय,तालुका पोलीस ठाणे,एसीपी व डीसीपी कार्यालय,भिवंडी न्यायालय,बस आगार,सिनेमागृह,राजकीय नेते व आमदार खासदार यांची कार्यालये आहेत.त्यामुळे येथे रोजच हजारो नागरिकांसह प्रवाशांची ये जा असते मात्र या ठिकाणी मनपाने कोणतेही वाहन तळ उभारले नसल्याने नागरिकांना आपल्या गाड्या रस्त्यावरच पार्क कराव्या लागतात.उड्डाणपुलाखाली वाहन पार्किंग करू शकत नसल्याचा शासकीय आदेशकडे बोट दखवून येथील उड्डाणपुलांखाली सुशोभीकरणाच्या नावाखाली उड्डाणपुलाखालील जागा बंदिस्त करण्यात आली आहे.त्यामुळे नगरिकांना आपली वाहने पार्क करतांना मोठी अडचण निर्मण झली आहे.

रस्त्यावर होणाऱ्या व्हॅन पार्किंगमुळे शहरात टोईंग व्हॅन वलीनकडून करवी करण्यात येते मात्र य टोईंग व्हॅनच्या मध्यमतून मोठी आर्थिक वसुली होत असल्याने टोईंग व्हॅनवाले वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्या ऐवजी फक्त वसुलीकडे लक्ष देत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. वाहन तळाच्या नावाने मनपा प्रशासनाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आरक्षित जागेवर वाहन तळ उभारले आहे.नोव्हेंम्बर २०२१ मध्ये या वाहन तळाचे उदघाटन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील त्यांच्या हस्ते झाले होते.मात्र हे वाहन तळ शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी उपयोगी नसल्याने उदघाटना नंतर अवघ्या काही दिवसांमध्येच बंद पडले.ते आजपर्यंत बंदच आहे.त्यामुळे भिवंडीत वाहतूक कोंडी व वाहन पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी